शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

महिलांना आरक्षणाबरोबर संरक्षण हवेय

By admin | Updated: October 3, 2015 23:56 IST

केवळ आरक्षण असल्याने निवडणुकीकरता राजकारणात उतरलेल्या महिलांच्या मनस्वास्थाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. प्रस्थापीत राजकारणीकडून ताब्यात राहणारया

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईकेवळ आरक्षण असल्याने निवडणुकीकरता राजकारणात उतरलेल्या महिलांच्या मनस्वास्थाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. प्रस्थापीत राजकारणीकडून ताब्यात राहणारया महिलांनाच राजकारणात पुढे आनले जात आहे. यामुळे आरक्षणाबरोबरच महिलांना संरक्षणाची देखिल गरज व्यक्त होत आहे.नेरुळच्या नगरसेविका शशिकला मालादी यांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघड झाली आहे. अवघ्या पाच महिण्याच्या राजकीय कारकिर्दीत त्यांचे मनस्वास्थ इतके बिघडले की, त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. मालादी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमीक अंदाज असुन त्यामागच्या कारणांचा तपास नेरुळ पोलीस करत आहेत. सहा वर्षापुर्वी अमरावती येथे देखिल अशाच प्रकारे एका महिला लोकप्रतिनिधीने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. त्यानंतर मालादी यांच्यासोबतच्या घटनेमुळे योगायोगाने राजकारणात आलेल्या महिलांच्या मनस्वास्थाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आरक्षणामुळे महिलांसाठी राखीव प्रभागात महिला उमेदवार रिंगणात उतरवल्या जातात. यावेळी तिथले प्रस्थापीत राजकारणी बोलक्या व निर्णयक्षमता असलेल्या महिलांना डावलुन मर्जीतल्या महिलांना पुढे आनतात. सक्षम महिला राजकारणात पुढे आल्यास त्यांना स्वतच्या राजकीय भवितव्याची भिती वाटत असते. यामुळे उमेदवारी देतानाच आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही, अशीच महिला निवडली जाते. याकरिता त्या महिलेला राजकारणाची आवड किंवा पार्श्वभुमी आहे की नाही याचा देखिल विचार होत नाही. तर अशी महिला निवडुन आल्यानंतर मदतीच्या नावाखाली प्रस्थापीत राजकारणी तिच्या कामात हस्तक्षेप करतात. कालांतराने याचा मनस्ताप त्या महिलेसह तिच्या कुटुंबाला होत असतो.अनेकदा संबंधीत निवडणुक लढवण्यास इच्छुक असलेले पुरुष महिला आरक्षणाचा बळी पडतात. परंतु तो प्रभाग दुसरया कोनाच्या हातात जावु नये याकरिता ते स्वतच्या पत्नीला केवळ निवडणुकीकरता राजकारणात ओढतात. पत्नी निवडून आल्यानंतर हेच पुरुष निर्णय अधिकार स्वतकडे ठेवुन पत्नीला केवळ नामधारी ठेवतात. याची खंत त्या महिला लोकप्रतिनिधीच्या मनात कायमच घर करुन राहते. त्यामुळे एकदा राजकारणात आलेल्या अनेक महिला परत राजकारणात फिरकत नाहीत. सर्वच ठिकाणी हि परिस्थीती असुन त्याबाबात राजकीय पक्षांनीच धोरण राबवण्याची आवश्यकता आहे. शिवाय आरक्षणाबरोबरच महिलांना संरक्षणही देने गरजेचे आहे.सर्वच राजकीय पक्षांच्या महिला संघटना असुन त्या कितपत सक्षम आहेत हा देखिल प्रश्नचिन्ह आहे. अशा संघटनांना राजकारणात दुय्यम स्थान देवुन त्यांचा वापर केवळ कार्यक्रमांना गर्दी जमवण्यासाठीच केला जातो. यामुळे समाजानेच महिला आरक्षण समजुन घेण्याची गरज निर्माण झाली आहे.उत्तम घर चालवणारी महिला देखिल निर्णय स्वातंत्र्य दिल्यास राजकारणातही यशस्वी होवू शकते. परंतु निर्णयक्षमता असलेल्या महिलांना डावलुन मर्जीत राहणारया महिलांनाच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आरक्षणाबरोबरच महिलांना संरक्षण हवे आहे. याबाबत राजकीय पक्षांनी योग्य धोरण राबवण्याची गरज आहे.- भीम रासकर, महिला राजसत्ता आंदोलन प्रमुख