शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

दहा वर्षांतच ‘ती’ इमारत बनली धोकादायक

By admin | Updated: September 9, 2016 03:24 IST

धोकादायक इमारतीच्या यादीत असलेल्या कोपरखैरणे येथील संगम गृहनिर्माण या इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला.

नवी मुंबई : धोकादायक इमारतीच्या यादीत असलेल्या कोपरखैरणे येथील संगम गृहनिर्माण या इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी खबरदारी म्हणून महापालिकेने पाणी व वीज जोडणी खंडित करून इमारत युद्धपातळीवर रिकामी केली. त्यामुळे ३४ कुटुंबांना रातोरात बेघर व्हावे लागले. विशेष म्हणजे अवघ्या १० वर्षांतच ही इमारत धोकादायक बनल्याने यानिमित्ताने शहरातील शेकडो इमारतींच्या बांधकाम दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.कोपरखैरणे सेक्टर १९ येथील प्लॉट क्रमांक ३५९/३६0 येथे ही एम.जे. डेव्हलपर्स या विकासकाने ही संगम नावाची चार इमारत उभारली आहे. २00१मध्ये या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. या इमारतीत निवासी व व्यावसायिक असे एकूण २४ गाळे आहेत. घरांचा ताबा दिल्यानंतर विकासकाने येथील रहिवाशांकडे पाठ फिरविली. विशेष म्हणजे अवघ्या १० वर्षांत महापालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली आहे. यासंदर्भात सोसायटीला पहिली नोटीस २0१३मध्ये बजावण्यात आली. त्यानंतर मागील तीन वर्षांपासून नियमितपणे घरे खाली करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या जात आहेत. महापालिकेची पहिली नोटीस प्राप्त झाल्यानंतर रहिवाशांनी इमारतीची तात्पुरती डागडुजी केली. परंतु इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने ही डागडुजीही कुचकामी ठरली. याचा परिणाम म्हणून १२ दिवसांपूर्वी या इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग निखळून पडला. या दुर्घटनेची तातडीने दखल घेत महापालिकेने रातोरात ही इमारत रिकामी करण्याचे फर्मान रहिवाशांना सोडले. इतकेच नव्हे, तर इमारतीचा पाणी व विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे येथे राहणाऱ्या ३४ कुटुंबांवर बेघर होण्याची पाळी आली. मुकेश भाटीया, शशी भामेरा, जितू भामेरा व चेतन भामेरा अशी या इमारतीच्या विकासकांची नावे आहेत. घरांचा ताबा दिल्यानंतर हे विकासक परागंदा झाले आहेत. त्यामुळे सोसायटी स्थापण करण्यापासून अभिहस्तांतरणाची प्रक्रिया रहिवाशांनाच पूर्ण करावी लागली. विशेष म्हणजे विकासकाने या इमारतीत अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे सिडको हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली आहे. यातच आता ही इमारत मोडकळीस आल्याने रहिवाशांसमोर तिच्या पुनर्बांधणीचा प्रश्न उभा ठाकला आहे. विकासक दाद देत नाहीत. अशा परिस्थितीत दाद कोणाकडे मागायची, असा सवाल येथील रहिवाशांना सतावत आहे.