शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील समस्यांवर हिवाळी अधिवेशनात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 02:43 IST

मंदा म्हात्रेंची मागणी : एपीएमसीतील प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा

नवी मुंबई : शहरातील विविध समस्यांवर प्रकाश टाकत त्या सोडवण्याची मागणी बेलापुरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी हिवाळी अधिवेशनात केली. त्यामध्ये एपीएमसी बाजारपेठेचा विकास करून त्यास आंतराष्ट्रीय दर्जा देण्याच्याही मागणीचा उल्लेख आहे. पुरवणी मागणीद्वारे मंदा म्हात्रे यांनी केलेल्या या मागण्यांवर विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे.

तुर्भे येथील एपीएमसी बाजारपेठ मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासली आहे. आशिया खंडातली सर्वाधिक मोठी बाजारपेठ असूनदेखील त्याकडे विशेष लक्ष दिले जात नाहीये. परिणामी, जीर्ण झालेले बांधकाम ढाळण्याच्या स्थितीत असून, अनेक ठिकाणी सुरू असलेल्या पडझडीत कामगार जखमीदेखील होत आहेत. ही बाब हिवाळी अधिवेशनात मांडून, भविष्यात त्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास जीवितहानीचीही शक्यता आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. त्यामुळे शिल्लक असलेला एफ. एस. आय. मंजुर करून बाजारपेठेच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याकरिता आधुनिक तंत्रज्ञान वापरुन त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट विकसीत करावे असेही त्यांनी सुचवले आहे. त्याशिवाय नवी मुंबईतल्या पोलीस वसाहतींच्याही पुर्नबांधणी करुन पोलिसांच्या कुटुंबियांना मृत्युच्या दाढेतून बाहेर काढण्याचीही मागणी आमदा मंदा म्हात्रे यांनी केली. शहरातील ऐतीहासीक वास्तु असलेल्या बेलापुर किल्याचेही संवर्धन काळाची गरज बनले आहे. आजवर त्याठिकाणी झालेल्या पडझडीमुळे किल्याचे शिल्लक भाग देखिल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे किल्याचे संवर्धन करण्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिराच्या पायरया व परिसराच्या सुशोभिकरणाचाही मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. त्याठिकाणी राज्यभरातुन भाविक येत असल्याने त्यांच्या सुविधांमध्ये भर टाकणे आवश्यक आहे. त्याकरिता पायरयांना संरक्षक कठडा, पुरेसे वाहनतळ, स्वच्छतागृहे व सुलभ दर्शनासाठी वातानुकूलित दर्शनरांगा व पेय जलाची सोय करण्याचीही मागणी त्यांनी केली. त्यांच्या या सर्व मागण्यांबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई