शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानके खरोखर स्मार्ट होणार का?

By admin | Updated: December 26, 2016 06:41 IST

कल्याण-डोंबिवलीची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. त्यात, कल्याण-डोंबिवलीबरोबरच टिटवाळा स्थानकाचाही विकास होणार आहे.

कल्याण-डोंबिवलीची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. त्यात, कल्याण-डोंबिवलीबरोबरच टिटवाळा स्थानकाचाही विकास होणार आहे. आज शहरातच धड सुविधा देता येत नाही, तेथे रेल्वे स्थानकांची काय गत? टिटवाळ्यासारख्या शहरात गृहसंकुले उभारली जात आहेत. यामुळे प्रवाशांची संख्या वाढत आहे. पण, येथे सुविधांचा अभाव आहे. शहाडला गर्दी आहे, पण तिला सामावून घेताना यंत्रणा कमी पडते. तीच गत आंबिवलीची. शहरे स्मार्ट करताना स्थानकेही कशी स्मार्ट होतील, याचाही विचार व्हायला हवा.'टिटवाळा व मांडा या गावांच्या नावावरून पडले. माधवराव पेशवे यांच्या काळात उभारलेल्या महागणपती मंदिरामुळे टिटवाळा प्रसिद्ध आहे. कसारा मार्गावरील टिटवाळा हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. कल्याण-डोंबिवलीनंतर टिटवाळा शहराचा आज मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. सर्वसामान्यांची पसंती या शहराला मिळत असल्याने नवे गृहप्रकल्प आणि चाळींचे बांधकाम मोठ्या संख्येने सुरू आहे. त्यामुळे टिटवाळा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकात कल्याणच्या दिशेने पादचारी पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र, कसाऱ्याच्या दिशेने पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना रूळ ओलांडण्याशिवाय गत्यंतरच नाही. फलाट क्रमांक-३ वर अपंगांसाठी स्वच्छतागृहाची सोय केलेली आहे. तसेच पुरुष व महिलांसाठी असलेले स्वच्छतागृह सामाजिक संस्थेला चालवण्याकरिता दिले आहे. त्याच्याशेजारीच एक जुनी पाण्याची टाकी आहे. तिचा लोखंडी पोल व पत्रा इतका गंजला आहे की, तो कधीही डोक्यात पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. फलाट क्रमांक-३ वरील पाणपोईचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी चार नवे नळ बसवले असले, तरी तेथे स्वच्छतेचा अभाव आहे. सतत माश्या घोंगावत असतात. लोकलमधून उतरल्यावर थेट बाहेर पडण्यासाठी कसारा दिशेकडील संरक्षक भिंत प्रवाशांनी तोडली आहे. अर्थात येथे पूल नसल्यामुळेही हे कृत्य प्रवाशांनी केलेले असावे. पूर्वेकडे रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर रिक्षा रांगेत उभ्या नसतात. परिणामी, तेथे नेहमीच वाहतूककोंडी असते. मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या टिटवाळा रेल्वे स्थानकात पाण्याची पुरेशी सोय रेल्वे प्रशासनाने केलेली नाही. स्थानकातील रेल्वे पोलीस कक्षाला भरदुपारी टाळे होते. अशाने प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत दुर्घटना किंवा महिलेवरील अत्याचाराची घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार?