शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

रेल्वे स्थानके खरोखर स्मार्ट होणार का?

By admin | Updated: December 26, 2016 06:41 IST

कल्याण-डोंबिवलीची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. त्यात, कल्याण-डोंबिवलीबरोबरच टिटवाळा स्थानकाचाही विकास होणार आहे.

कल्याण-डोंबिवलीची स्मार्ट सिटीसाठी निवड झाली आहे. त्यात, कल्याण-डोंबिवलीबरोबरच टिटवाळा स्थानकाचाही विकास होणार आहे. आज शहरातच धड सुविधा देता येत नाही, तेथे रेल्वे स्थानकांची काय गत? टिटवाळ्यासारख्या शहरात गृहसंकुले उभारली जात आहेत. यामुळे प्रवाशांची संख्या वाढत आहे. पण, येथे सुविधांचा अभाव आहे. शहाडला गर्दी आहे, पण तिला सामावून घेताना यंत्रणा कमी पडते. तीच गत आंबिवलीची. शहरे स्मार्ट करताना स्थानकेही कशी स्मार्ट होतील, याचाही विचार व्हायला हवा.'टिटवाळा व मांडा या गावांच्या नावावरून पडले. माधवराव पेशवे यांच्या काळात उभारलेल्या महागणपती मंदिरामुळे टिटवाळा प्रसिद्ध आहे. कसारा मार्गावरील टिटवाळा हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. कल्याण-डोंबिवलीनंतर टिटवाळा शहराचा आज मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. सर्वसामान्यांची पसंती या शहराला मिळत असल्याने नवे गृहप्रकल्प आणि चाळींचे बांधकाम मोठ्या संख्येने सुरू आहे. त्यामुळे टिटवाळा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकात कल्याणच्या दिशेने पादचारी पूल बांधण्यात आलेला आहे. मात्र, कसाऱ्याच्या दिशेने पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना रूळ ओलांडण्याशिवाय गत्यंतरच नाही. फलाट क्रमांक-३ वर अपंगांसाठी स्वच्छतागृहाची सोय केलेली आहे. तसेच पुरुष व महिलांसाठी असलेले स्वच्छतागृह सामाजिक संस्थेला चालवण्याकरिता दिले आहे. त्याच्याशेजारीच एक जुनी पाण्याची टाकी आहे. तिचा लोखंडी पोल व पत्रा इतका गंजला आहे की, तो कधीही डोक्यात पडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. फलाट क्रमांक-३ वरील पाणपोईचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी चार नवे नळ बसवले असले, तरी तेथे स्वच्छतेचा अभाव आहे. सतत माश्या घोंगावत असतात. लोकलमधून उतरल्यावर थेट बाहेर पडण्यासाठी कसारा दिशेकडील संरक्षक भिंत प्रवाशांनी तोडली आहे. अर्थात येथे पूल नसल्यामुळेही हे कृत्य प्रवाशांनी केलेले असावे. पूर्वेकडे रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर रिक्षा रांगेत उभ्या नसतात. परिणामी, तेथे नेहमीच वाहतूककोंडी असते. मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या टिटवाळा रेल्वे स्थानकात पाण्याची पुरेशी सोय रेल्वे प्रशासनाने केलेली नाही. स्थानकातील रेल्वे पोलीस कक्षाला भरदुपारी टाळे होते. अशाने प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत दुर्घटना किंवा महिलेवरील अत्याचाराची घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार?