शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

बाळ जन्माला आल्यावर ते रडलेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 23:50 IST

चंद्रकांत जगताप यांची माहिती : महात्मा गांधी जयंती निमित्त कार्यक्रम

मुरुड : गर्भधारणापूर्व व जन्मपूर्व निदान प्रतिबंधक कायदा १९९४ या विषयी माहिती सांगितली, तसेच मुलीच्या लग्नाचे वय २१ असणे खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक मुलगी ही पदवीधर असली पाहिजे. बाळ जन्माला आल्यावर ते रडलेच पाहिजे, त्यावरूनच त्याचा बुद्ध्यांक वाढणार आहे. मुलाचे रडणे म्हणजेच त्याचा गोल्डन टाइम समजला जातो, अशी माहिती मुरुड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत जगताप यांनी दिली.

महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने मुरुड येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातर्फे ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या कार्यक्रमाचे आयोजन मुरुड पंचायत समिती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जगताप बोलत होते. यावेळी मुरुड पंचायत समितीच्या सभापती अशिका ठाकूर यांच्या हस्ते महात्मा गांधी व सावित्री बाई फुले यांच्या तसबिरीला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुरुड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत जगताप, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुभाष वाणी, एकात्मिक बालविकासचे विस्तार अधिकारी संजय शेडगे, पोलीस शिपाई आरती पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आज २१व्या शतकातही मुलींना जन्माला येऊ दिले जात नाही. यासाठीच शासनाकडून असे कार्यक्रम राबवून जनजागृती करावी लागत आहे. स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढत आहे. स्त्रीभ्रूणाचे संरक्षण करणे खूप आवश्यक आहे. रूढी व परंपरेत अडकलेला माणूस महिलांनी फक्त चूल व मूल सांभाळावी, अशी अपेक्षा करीत आहे. यावर मात करण्यासाठी शासनाने मुलींचे जन्मताच स्वागत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखलेल्या असून, त्या पद्धतीने शासकीय पातळीवर कार्यवाही होत असते, असे पर्यवेक्षिका शुभांगी कोतवाल यांनी सांगितले. यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मुरुडतर्फे मुलींविषयी जनजागृती होण्यासाठी निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्ण चांदोरकर, अश्विनी पाटील, विजयता खेऊर, उज्ज्वला भाटकर, कामिनी म्हात्रे, मनीषा ठाकूर आदींनी विशेष मेहनत घेतली.प्रेरणा भगत यांच्या निबंधास प्रथम क्रमांक : मुरुड तहसीलदार कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रेरणा प्रवीण भगत यांनी माझी मुलगी माझा स्वाभिमान या विषयावर सर्वोत्कृष्ट निबंध लिहिला. त्यांना मुरुड तालुक्यामधून प्रथम क्रमांक देण्यात येऊन, त्यांना मुरुड पंचायत समितीच्या सभापती अशिका ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMahatma Gandhiमहात्मा गांधी