शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

विहूर धरणातील पाणी आटले

By admin | Updated: March 21, 2016 01:43 IST

यंदा पाऊस कमी पडल्याने महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका रायगड जिल्ह्यालाही बसला असून, पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

मेघराज जाधव,  मुरूडयंदा पाऊस कमी पडल्याने महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका रायगड जिल्ह्यालाही बसला असून, पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. विहूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विहूर धरणातील पाणी आटल्याने विहूरसह मोरे, मजगाव, खारदोडकुले, खारीकवाडा, नांदगाव मोहल्ला व कोळीवाडा गावात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. एप्रिल, मे महिन्यात तर तीव्र पाणीटंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागणार आहे. मुरुड तालुक्यात गतवर्षी १३० इंचाहून अधिक पर्जन्यमान होते. यंदा हे प्रमाण जेमतेम ९४ इंचापर्यंत पोहोचले. तालुक्यात ७३ गावे ३७ वाडे पाडे असून, २४ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. मुरुड शहराची लोकसंख्या १२ हजार ७७०, तर उर्वरित गावांची लोकसंख्या ६१ हजार ७४७ एवढी आहे. नळपाणी योजनेंतर्गत भारत निर्माण योजनेतून ११ मंजूर कामांपैकी ८ कामे पूर्ण तर ३ प्रगतिपथावर आहेत. शिवकालीन दोन्ही बंधाऱ्यांचे काम पूर्ण असून, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील ८ पैकी ५ कामे पूर्ण, तर ३ अपूर्ण आहेत. विहूर ग्रामपंचायत हद्दीत असलेले धरण यंदा पर्जन्यमान कमी असल्याने भरले नाही. केवळ ५० टक्केच पाणीसाठा होऊ शकला. धरणाला नदी वा गाणी (नैसर्गिक पाझर) यासारखे अन्य स्रोत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात जेवढा जलसाठा होईल त्यावरच विहूर, मोरे, मजगाव, खारदोडकुले, खारीकपाडा, नांदगाव मोहल्ला, कोळीवाडा व नबाबाच्या पॅलेसला पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने येत्या एप्रिल, मे महिन्यात टँकर वा विंधण विहिरींशिवाय पर्याय नाही. येथील ग्रामस्थ तला कचकोन तसेच एजाज पांगारकर यांच्या मते, विहूर धरणाच्या क्षमतेपेक्षा अधिक गावांना पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे आदेश अव्यवहार्य आहेत. त्याचा पुनर्विचार होण्याची आवश्यकता आहे. तसेच मजगाव ग्रामपंचायतीच्या जलवाहिन्यांची देखभाल नीट होत नसल्याने पाणी वाया जाते, अशीही माहिती मिळाली. विहूर धरणाचा पाणीसाठा जेमतेम १५ ते २० दिवस पुरेल. पाण्यावर नियंत्रण आणले तर ग्रामस्थांचा रोष पत्करावा लागतो. येत्या एप्रिल, मे महिन्यात प्रशासनाने टँकर, विंधण विहीर उपलब्ध करून घ्याव्यात. यापेक्षा अंबोली धरणातून ५ इंचाची जलवाहिनी जोडून द्यावी.- इकरार मोदी, सरपंच, विहूरयंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. विहूर धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. जनतेने गाळ उपसून न्यावा, जेणेकरून धरणाची खोली वाढेल. मात्र त्यांच्याकडून रॉयल्टी न घेण्याचे आवाहन तहसीलदार उमेश पाटील यांनी केले.- पंडित पाटील, आमदार