शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पाणीपुरवठा योजना कागदावरच

By admin | Updated: March 11, 2016 02:39 IST

तालुक्यातील रेवस कोळीवाडा येथील भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत २००८-०९ च्या पाणीपुरवठा योजनेत घोटाळा झाला आहे.

अलिबाग : तालुक्यातील रेवस कोळीवाडा येथील भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत २००८-०९ च्या पाणीपुरवठा योजनेत घोटाळा झाला आहे. त्यातील दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी रेवस ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पाटील यांनी गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचाही इशारा पाटील यांनी दिला आहे.याच प्रकरणी पाटील हे दोन वेळा उपोषणाला बसले होते. मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता आर.एस. माळी यांनी पाटील यांची फक्त आश्वासनावरच बोळवण केल्याचे दिसून येते. रेवस पाणीपुरवठा योजनेसाठी २७ लाख १२ हजार २९९ रुपये खर्च करण्यात आले आहेत. ५ एप्रिल २०११ ला रेवसच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे ती वर्ग करण्यात आल्याचे १८ जुलै २०१३ च्या प्रशासकीय कागदपत्रांवरुन दिसून येते. मात्र असे असतानाही प्रभारी उपअभियंता आर.एस. माळी यांचे ५ जानेवारी २०१६ ला अहवाल मागविण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न पाटील यांनी केला आहे. पाणीपुरवठा योजना सुरु होती, तर एप्रिल-मे २०१५ मध्ये ग्रामपंचायत फंडातून रेवस गावासाठी ५० हजार रुपये खर्च का करावा लागला? या योजनेची कूपनलिका कावेडे येथे असल्याने वास्तविक तेथे पंपघर आणि विद्युत जोडणी असणे आवश्यक होते मात्र तेथे पंपघर आणि विद्युत जोडणीच नाही, अशी सर्व परिस्थिती असताना योजना पूर्ण कशी झाली, असे विविध प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले आहेत. यातील दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे, अन्यथा आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. उपअभियंता आर. एस. माळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.