शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

पाणी मीटरवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

By admin | Updated: September 29, 2016 03:36 IST

एएमआर मीटरच बसविण्याचा प्रस्ताव महासभेने कधीही मंजूर केलेला नाही. परंतु प्रशासन नागरिकांना सक्तीने मीटर बसविण्यास भाग पाडत आहे. यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा

नवी मुंबई : एएमआर मीटरच बसविण्याचा प्रस्ताव महासभेने कधीही मंजूर केलेला नाही. परंतु प्रशासन नागरिकांना सक्तीने मीटर बसविण्यास भाग पाडत आहे. यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याचे मत महापौर सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केले असून ज्यांचे मीटर सुस्थितीमध्ये आहेत त्यांनी ते बदलण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील मतभेद विकोपाला गेले आहेत. प्रशासनाने एएमआर मीटर बसविण्याची सक्ती केल्यामुळे या वादामध्ये भर पडली आहे. महापालिकेने २०१० मध्ये एएमआर मीटर बसविण्याचा ठराव मंजूर केला असल्याचे सांगून प्रशासनाने सक्ती करण्यास सुरवात केली आहे. अनेक ग्राहकांवर कारवाईही केली आहे. याविषयी माहिती देण्यासाठी महापौर सुधाकर सोनावणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अशा प्रकारे कोणताही ठराव प्रशासनाने मंजूर केला नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले. पाण्याचे १०० टक्के मीटरिंग झाले पाहिजे अशी आमचीही भूमिका आहे. एएमआर मीटरलाही विरोध नाही. परंतु ज्या पद्धतीने सक्ती केली जात आहे ती योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. मीटरची सक्ती करण्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू लागला आहे. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. चुकून नागरिकांनी कायदा हातात घेतल्यास त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेने सक्तीने एएमआर मीटर बसविण्याचा कोणताही ठराव केला नसल्यामुळे नागरिकांनी अगोदर बसविलेले मीटर सुस्थितीमध्ये असल्यास त्यांनी नवीन मीटर बसवू नये असे आवाहनही महापौरांनी केले आहे. महापौरांच्या कडक भूमिकेनंतर आयुक्त तुकाराम मुंढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून भविष्यात प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील संघर्ष अजून विकोपाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.