शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

पाणी मीटरवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

By admin | Updated: September 29, 2016 03:36 IST

एएमआर मीटरच बसविण्याचा प्रस्ताव महासभेने कधीही मंजूर केलेला नाही. परंतु प्रशासन नागरिकांना सक्तीने मीटर बसविण्यास भाग पाडत आहे. यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा

नवी मुंबई : एएमआर मीटरच बसविण्याचा प्रस्ताव महासभेने कधीही मंजूर केलेला नाही. परंतु प्रशासन नागरिकांना सक्तीने मीटर बसविण्यास भाग पाडत आहे. यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याचे मत महापौर सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केले असून ज्यांचे मीटर सुस्थितीमध्ये आहेत त्यांनी ते बदलण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील मतभेद विकोपाला गेले आहेत. प्रशासनाने एएमआर मीटर बसविण्याची सक्ती केल्यामुळे या वादामध्ये भर पडली आहे. महापालिकेने २०१० मध्ये एएमआर मीटर बसविण्याचा ठराव मंजूर केला असल्याचे सांगून प्रशासनाने सक्ती करण्यास सुरवात केली आहे. अनेक ग्राहकांवर कारवाईही केली आहे. याविषयी माहिती देण्यासाठी महापौर सुधाकर सोनावणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अशा प्रकारे कोणताही ठराव प्रशासनाने मंजूर केला नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले. पाण्याचे १०० टक्के मीटरिंग झाले पाहिजे अशी आमचीही भूमिका आहे. एएमआर मीटरलाही विरोध नाही. परंतु ज्या पद्धतीने सक्ती केली जात आहे ती योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. मीटरची सक्ती करण्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू लागला आहे. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. चुकून नागरिकांनी कायदा हातात घेतल्यास त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेने सक्तीने एएमआर मीटर बसविण्याचा कोणताही ठराव केला नसल्यामुळे नागरिकांनी अगोदर बसविलेले मीटर सुस्थितीमध्ये असल्यास त्यांनी नवीन मीटर बसवू नये असे आवाहनही महापौरांनी केले आहे. महापौरांच्या कडक भूमिकेनंतर आयुक्त तुकाराम मुंढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून भविष्यात प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील संघर्ष अजून विकोपाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.