शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पाणी मीटरवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न

By admin | Updated: September 29, 2016 03:36 IST

एएमआर मीटरच बसविण्याचा प्रस्ताव महासभेने कधीही मंजूर केलेला नाही. परंतु प्रशासन नागरिकांना सक्तीने मीटर बसविण्यास भाग पाडत आहे. यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा

नवी मुंबई : एएमआर मीटरच बसविण्याचा प्रस्ताव महासभेने कधीही मंजूर केलेला नाही. परंतु प्रशासन नागरिकांना सक्तीने मीटर बसविण्यास भाग पाडत आहे. यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याचे मत महापौर सुधाकर सोनावणे यांनी व्यक्त केले असून ज्यांचे मीटर सुस्थितीमध्ये आहेत त्यांनी ते बदलण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील मतभेद विकोपाला गेले आहेत. प्रशासनाने एएमआर मीटर बसविण्याची सक्ती केल्यामुळे या वादामध्ये भर पडली आहे. महापालिकेने २०१० मध्ये एएमआर मीटर बसविण्याचा ठराव मंजूर केला असल्याचे सांगून प्रशासनाने सक्ती करण्यास सुरवात केली आहे. अनेक ग्राहकांवर कारवाईही केली आहे. याविषयी माहिती देण्यासाठी महापौर सुधाकर सोनावणे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. अशा प्रकारे कोणताही ठराव प्रशासनाने मंजूर केला नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले. पाण्याचे १०० टक्के मीटरिंग झाले पाहिजे अशी आमचीही भूमिका आहे. एएमआर मीटरलाही विरोध नाही. परंतु ज्या पद्धतीने सक्ती केली जात आहे ती योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. मीटरची सक्ती करण्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू लागला आहे. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. चुकून नागरिकांनी कायदा हातात घेतल्यास त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेने सक्तीने एएमआर मीटर बसविण्याचा कोणताही ठराव केला नसल्यामुळे नागरिकांनी अगोदर बसविलेले मीटर सुस्थितीमध्ये असल्यास त्यांनी नवीन मीटर बसवू नये असे आवाहनही महापौरांनी केले आहे. महापौरांच्या कडक भूमिकेनंतर आयुक्त तुकाराम मुंढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून भविष्यात प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामधील संघर्ष अजून विकोपाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.