शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

३० ते ३५ तासांनी पाणी; तेही अनियमित

By admin | Updated: January 20, 2015 00:07 IST

ठाणे महापालिकेचा कर्ज बुडव्यांचा एरीया म्हणून प्रभाग क्रमांक १४ कडे पाहिले जाते. या प्रभागात इमारती कमी असून चाळी आणि अनधिकृत बांधकामांचा भरणा आहे.

अजित मांडके ल्ल ठाणेठाणे महापालिकेचा कर्ज बुडव्यांचा एरीया म्हणून प्रभाग क्रमांक १४ कडे पाहिले जाते. या प्रभागात इमारती कमी असून चाळी आणि अनधिकृत बांधकामांचा भरणा आहे. सोईसुविधांपासून हा प्रभाग वंचित असून आरोग्य केंद्र नाही. रस्ते आहेत, परंतु ते निमुळते असल्याने या प्रभागताही मोठी वाहने जाणे अवघडच आहे. शौचालय, गार्डन, आदींसह इतर सुविधांचीदेखील वानवा आहे.प्रकर्षाने भेडसावणारी समस्या म्हणून, पाण्याच्या समस्येकडे आजही पाहिले जाते. २००२ मध्ये, या भागाला १७ दशलक्षलीटर पाणी मिळत होते. परंतु, आता ५७ दशलक्ष लीटर पाणी मिळूनही आजही येथे उंच भागांना कमी दाबाने पाणी येत आहे. विशेष म्हणजे १० ते २० तासांच्या फरकाने पाणी येणे आवश्यक असतांना येथे, ३० ते ३५ तासांच्या अवधीने पाणीपुरवठा केला जात असून तो देखील अवेळी होत असल्याने येथील रहिवासी हैराण आहेत. महापालिकाच नव्हे अनेक बँकाचे कर्ज घेऊन न फेडणाऱ्यांमध्ये हा प्रभाग आघाडीवर असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे बहुतेक बँकांनी या प्रभागाची ओळख एनपीए एरिया अशीच केली आहे. या प्रभागावर सध्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. या प्रभागाची लोकसंख्या ३० ते ३५ हजार असली तरी येथील मतदारांची संख्या, १९ हजार ८४० एवढी असून येथे ६० टक्के झोपडपट्टी आणि ४० टक्के इमारती येथे आहेत. लोकमान्य पाडा नं. २, मैत्री पार्क, नंदा पार्क, लक्ष्मी पार्क फेज २, शिवकृपा सोसायटी, झांजे नगर, गणपती मंदिर परिसर, गणेश दर्शन अपार्टमेंट, ठाकूर कॉमप्लेक्स, ठाकूर विद्यालय आदी परिसर येथे येतात. दुसरीकडे रस्त्यांची अवस्था देखील फारशी चांगली नसून अतिशय दाटीवाटीने येथे रहिवासी वास्तव्य करतांना दिसतात. रस्ते अरुंद असल्याने टेकडीपर्यंत रिक्षा अथवा इतर वाहने जात नाहीत. त्यात सर्व भागात अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकामे वाढल्याने याठिकाणी मैदान, गार्डन या सुविधांची देखील वानवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था देखील फारशी चांगली नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. शौचालयांच्या दुरुस्ती झाली असली तरी ५० शौचालयांच्या सफाईसाठी केवळ एकच व्यक्ती असल्याने ती वेळेवर होत नाही. त्यात येथे रात्री ८ नंतर महिलांचे रस्त्यावर येण्याचे प्रमाण फारच कमी असून येथे रात्री एकट्या दुकट्या फिरणाऱ्या महिलांना चोरट्यांची भीती वाटते. त्यात येथे पोलीस चौकी देखील नसल्याने चोरांनी देखील येथे आपली दहशत कायम ठेवली आहे. त्यातही येथे स्मशानभूमी नसल्याने येथील नागरिकांना थेट कामगार रुग्णालय परिसरात असलेल्या स्मशानभूमीकडे जावे लागते. रस्ते असले तरी काही भागात सिमेंट रस्ते होणे अपेक्षित आहे. तसेच अरुंद रस्त्यामुळे साधी अ‍ॅम्ब्युलन्स वरपर्यंत जाऊ शकत नाही. रस्ते, गटार, पायवाटा, शौचालयांची कामे केलेली आहेत. पाण्याचीही समस्या सोडविलेली आहे. मात्र, आजही या भागात हवे त्या प्रमाणात पाणी मिळत नाही. १८ ते २० तासांच्या फरकाने पाणी यावे अशी आमची मागणी आहे. परंतु,आजही ती पूर्ण होऊ शकलेली नाही. - हणमंत जगदाळे, स्थानिक नगरसेवक, राष्ट्रवादीया प्रभागाला कर्ज बुडव्यांचा एरिया म्हणून ओळखले जाते. परंतु येथे समस्या अधिक आहेत. पाणी, शौचालय, गार्डन, मैदान आदींसह इतर मुलभूत सुविधांसाठी येथील नागरीकांना झगडावे लागत आहे.- सचिन मोरे, स्थानिक नागरीकरस्ते अरुंद असल्याने मोठी वाहने तर उंच भागात जात नाहीत, त्यात रिक्षावाले देखील लोकमान्य डेपोजवळच सोडत असल्याने, डेपोपासून टेकडीपर्यंत जवळ - जवळ एक ते दिड किमीचे अंतर पायीच कापावे लागत आहे.- किरण वाघ, स्थानिक नागरीक