शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

महापालिका निवडणुकीत प्रभाग पद्धत रद्द !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:25 IST

अधिवेशनामध्ये विधेयकाचा समावेश : नवी मुंबईतील आरक्षित प्रभागांची आज होणारी सोडतही केली रद्द

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग (पॅनेल) पद्धत रद्द होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये याविषयी विधेयक मंजूर केले जाणार आहे. यामुळे मंगळवारी होणारी नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडतही स्थगित केली असून त्याविषयी पत्र निवडणूक विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी १७ डिसेंबरला आरक्षित प्रभागांसाठीची सोडत काढली जाणार होती. याविषयी पालिकेने यापूर्वीच वर्तमानपत्रामध्ये जाहीरात प्रसिद्ध केली होती. सकाळी दहा वाजता विष्णूदास भावे नाट्यगृहामध्ये याविषयीची कार्यवाही केली जाणार होती. यानंतर २० डिसेंबरला प्रभाग रचनेचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणारहोते. २० ते ३० डिसेंबर दरम्यान प्रभाग रचनेवर नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यात येणार होत्या. प्रशासनाने आरक्षणासाठीची कार्यवाही सुरू केल्यानंतर प्रभाग पद्धतीनेच निवडणुका होण्याची शक्यता वर्तविण्यास सुरवात झाली होती. काँगे्रस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा प्रभाग पद्धतीला विरोध होता. प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली तर त्याचा लाभ भाजपला होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. यामुळे तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे एकसदस्यीय पद्धतीनेच निवडणूक घेण्याचे आवाहन केले होते. यासाठी निवेदनेही दिली होती व शिष्टमंडळासह नेत्यांची भेटही घेतली होती.राज्यातील इतर महापालिकांमध्येही शिवसेनेसह दोन्ही काँगे्रसच्या पदाधिकाºयांनी प्रभाग पद्धतीला विरोध करण्यास सुरवात केली होती. नवीन सरकारने तातडीने प्रभाग पद्धत रद्द करण्यासाठीची कार्यवाही सुरू करून हिवाळी अधिवेशनामध्ये विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला.राज्य शासनाच्यावतीने याविषयी पत्र निवडणूक विभागाकडेही दिले होते. निवडणूक विभागाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी सोमवारी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना याविषयी पत्र पाठवून आरक्षीत प्रभागांची सोडत पुढे ढकलण्याचे स्पष्ट केले आहे.महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२० करिता सोडत काढणेव प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना मागविण्यासाठीचे वेळापत्रक देण्यात आले आहे. १७ डिसेंबरला नागरीकांचा मागास प्रवर्ग, महिला यांचेकरीता आरक्षित जागा निश्चित करण्याकरीता सोडत काढावयास सुचविले होते.सदर सोडत प्रक्रिया रद्द करण्यात येत असून या संदर्भात पुढील कार्यवाहीबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल असे निवडणूक विभागाने आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये स्पष्ट केले आहे.महाविकास आघाडीमध्ये उत्साहनवी मुंबईमध्ये शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादी एकत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. प्रभाग पद्धत महाआघाडीसाठी डोकेदुखीची ठरणार होती. कारण काही प्रभागामध्ये मतदारांना तीन वेगवेगळ्या चिन्हावर मतदान करावे लागणार होती. हात,घड्याळ व धनुष्यबाण अशा तिन चिन्हावरील उमेदवाराला एकाच वेळी मतदान करताना गोंधळ होण्याची शक्यता आहे. यामुळे तिनही पक्षांनी एकसदस्यीय पद्धतीला पसंती दिली होती. त्यासाठी पाठपुरावाही सुरू केला होता. मंगळवारी होणारी आरक्षण सोडत रद्द होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहेत.भाजपला घेरण्याची रणनीतीनवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला विशेषत: आमदार गणेश नाईक यांना घेरण्याची रणनिती महाविकास आघाडीकडून सुरू आहे. नाईकांच्या ताब्यातून महापालिका मिळवायचीच असा निर्धार करण्यात आला आहे. प्रभाग पद्धत भाजपसाठी लाभदायक असल्यामुळे महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांचा याला विरोध होता. प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली तर भाजप पूर्ण बहुमत मिळवू शकेल असेही खाजगीत काहीजण सांगू लागले होते. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येताच प्रभाग पद्धत रद्द करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.