शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीवाडी रस्त्यापासून वंचित

By admin | Updated: September 9, 2016 03:11 IST

मुंबईपासून रेल्वेने ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघिणीवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. दळी जमिनीवर वसलेल्या या वाडीच्या चोहोबाजूला वनजमीन असून

विजय मांडे , कर्जतमुंबईपासून रेल्वेने ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघिणीवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. दळी जमिनीवर वसलेल्या या वाडीच्या चोहोबाजूला वनजमीन असून, रस्त्याच्या सोयीपासून ही वाडी वंचित आहे. वनखात्याचे जाचक कायदे आदिवासी वाडीसाठी शिथिल होत नसल्याने, आम्ही पारतंत्र्यात राहतो का? असा उद्विग्न सवाल आदिवासी बांधव विचारत आहेत.वाघिणीवाडी ही कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायतमध्ये असलेली आदिवासीवाडी बेडीसगाव या मुख्य वाडीपासून डोंगरात चार किलोमीटर अंतरावर वसली आहे. बेडीसगाव ही आदिवासी वाडीदेखील वनखात्याच्या दळी जमिनीवर वसली असून, वाघिणीवाडी माथेरानच्या डोंगर रांगेत वसली आहे. ही वाडी जरी कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक म्हणून ओळखली जात असली, तरी या वाडीचा सर्व व्यवहार ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावात होत असतो. शेलू ग्रामपंचायतमधील या वाडीमध्ये जाण्यासाठी असलेला रस्ता हा ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावातून जातो. त्यांची ग्रामपंचायत फक्त शेलू असून, त्यांचा दैनंदिन व्यवहार वांगणी गावाशी संबंधित आहे. वाघिणीवाडी आणि बेडीसगाव येथील आदिवासींना ग्रामपंचायत कार्यालयात यायचे असले, तरी किमान दहा कि.मी.चा फेरा घेऊन यावे लागते, त्यामुळे या वाड्याच्या सोयीसाठी काही वेगळी व्यवस्था कर्जत तालुक्यातील प्रशासनाने करण्याची गरज आहे.बेडीसगाव आणि वाघिणीवाडी येथील अनेक समस्या आदिवासी लोकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. त्यातही वाघिणीवाडी म्हणजे हा प्रदेश आजही पारतंत्र्यात आहे का? असा प्रश्न आदिवासी लोकांचा आहे. कारण वनविभाग आदिवासींच्या शंभर वर्षांपासून वहिवाट असलेल्या रस्त्यातून जाण्याचा रस्ता बनविण्यास हरकत घेत आहेत. वनखाते अस्तित्वात नव्हते. त्या आधी वाघिणीवाडीमध्ये आदिवासी लोकांची वस्ती आहे. माथेरानच्या डोंगर रांगेत वसलेल्या या वाडीमध्ये जाण्यासाठी बेडीसगाव येथून स्थानिक आदिवासीना दीड तास लागतो, तर नव्याने आलेल्यांची वाडीपर्यंत पोहोचताना दमछाक होते. डोंगरात वसलेल्या या वाडीच्या खालच्या बाजूने एक मोठा ओढा पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असतो. पावसाळ्यात वाघिणीवाडीतील लोकांना बेडिसगावपर्यंत येता येत नाही. कारण ओढ्यातून वाट काढून पलीकडे जाणे आदिवासी लोकांनादेखील शक्य होत नाही. तेथे इतर लोकांना, लहान मुलांना ओढा ओलांडणे ही फार दूरची गोष्ट होऊन बसली आहे. वनविभागाने त्या ओढ्यावर लहान साकव बांधण्यासाठी जमीन दिल्यास या आदिवासी लोकांच्या पावसाळ्यातील ये-जा करण्याचा प्रश्न निकाली निघेल. पाऊस जास्त असतो, त्या वेळी जवळपास शहरात जाऊन कामासाठी बाहेर पडणे कठीण होते. त्यामुळे त्यांचा रोजगारदेखील बुडतो.