शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीवाडी रस्त्यापासून वंचित

By admin | Updated: September 9, 2016 03:11 IST

मुंबईपासून रेल्वेने ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघिणीवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. दळी जमिनीवर वसलेल्या या वाडीच्या चोहोबाजूला वनजमीन असून

विजय मांडे , कर्जतमुंबईपासून रेल्वेने ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघिणीवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. दळी जमिनीवर वसलेल्या या वाडीच्या चोहोबाजूला वनजमीन असून, रस्त्याच्या सोयीपासून ही वाडी वंचित आहे. वनखात्याचे जाचक कायदे आदिवासी वाडीसाठी शिथिल होत नसल्याने, आम्ही पारतंत्र्यात राहतो का? असा उद्विग्न सवाल आदिवासी बांधव विचारत आहेत.वाघिणीवाडी ही कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायतमध्ये असलेली आदिवासीवाडी बेडीसगाव या मुख्य वाडीपासून डोंगरात चार किलोमीटर अंतरावर वसली आहे. बेडीसगाव ही आदिवासी वाडीदेखील वनखात्याच्या दळी जमिनीवर वसली असून, वाघिणीवाडी माथेरानच्या डोंगर रांगेत वसली आहे. ही वाडी जरी कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक म्हणून ओळखली जात असली, तरी या वाडीचा सर्व व्यवहार ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावात होत असतो. शेलू ग्रामपंचायतमधील या वाडीमध्ये जाण्यासाठी असलेला रस्ता हा ठाणे जिल्ह्यातील वांगणी गावातून जातो. त्यांची ग्रामपंचायत फक्त शेलू असून, त्यांचा दैनंदिन व्यवहार वांगणी गावाशी संबंधित आहे. वाघिणीवाडी आणि बेडीसगाव येथील आदिवासींना ग्रामपंचायत कार्यालयात यायचे असले, तरी किमान दहा कि.मी.चा फेरा घेऊन यावे लागते, त्यामुळे या वाड्याच्या सोयीसाठी काही वेगळी व्यवस्था कर्जत तालुक्यातील प्रशासनाने करण्याची गरज आहे.बेडीसगाव आणि वाघिणीवाडी येथील अनेक समस्या आदिवासी लोकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. त्यातही वाघिणीवाडी म्हणजे हा प्रदेश आजही पारतंत्र्यात आहे का? असा प्रश्न आदिवासी लोकांचा आहे. कारण वनविभाग आदिवासींच्या शंभर वर्षांपासून वहिवाट असलेल्या रस्त्यातून जाण्याचा रस्ता बनविण्यास हरकत घेत आहेत. वनखाते अस्तित्वात नव्हते. त्या आधी वाघिणीवाडीमध्ये आदिवासी लोकांची वस्ती आहे. माथेरानच्या डोंगर रांगेत वसलेल्या या वाडीमध्ये जाण्यासाठी बेडीसगाव येथून स्थानिक आदिवासीना दीड तास लागतो, तर नव्याने आलेल्यांची वाडीपर्यंत पोहोचताना दमछाक होते. डोंगरात वसलेल्या या वाडीच्या खालच्या बाजूने एक मोठा ओढा पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असतो. पावसाळ्यात वाघिणीवाडीतील लोकांना बेडिसगावपर्यंत येता येत नाही. कारण ओढ्यातून वाट काढून पलीकडे जाणे आदिवासी लोकांनादेखील शक्य होत नाही. तेथे इतर लोकांना, लहान मुलांना ओढा ओलांडणे ही फार दूरची गोष्ट होऊन बसली आहे. वनविभागाने त्या ओढ्यावर लहान साकव बांधण्यासाठी जमीन दिल्यास या आदिवासी लोकांच्या पावसाळ्यातील ये-जा करण्याचा प्रश्न निकाली निघेल. पाऊस जास्त असतो, त्या वेळी जवळपास शहरात जाऊन कामासाठी बाहेर पडणे कठीण होते. त्यामुळे त्यांचा रोजगारदेखील बुडतो.