शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

बोगस घरवाटप प्रकरणी युनियन वादात

By admin | Updated: September 8, 2016 03:20 IST

माथाडींच्या बोगस घरवाटप प्रकरणी मुख्य सूत्रधाराच्या अटकेनंतर इतर ५९ जणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये माथाडी युनियनच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या नावाचा देखील

सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई माथाडींच्या बोगस घरवाटप प्रकरणी मुख्य सूत्रधाराच्या अटकेनंतर इतर ५९ जणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीमध्ये माथाडी युनियनच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या नावाचा देखील उल्लेख आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह माथाडी कामगारांच्याच फसवणूक प्रकरणी भविष्यात युनियन वादात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.माथाडी कामगारांसाठी असलेली घरे नेत्यांच्या कोट्यातून बिगर माथाडींना देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक झालेली आहे. याप्रकरणी १०४ जणांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल होताच एपीएमसी पोलिसांनी दिलीप यादव याला अटक केली आहे. तो राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचा कर्मचारी आहे. नेत्यांशी असलेल्या घरगुती संबंधाचा फायदा घेत त्याने अनेकांचा विश्वास संपादित केला होता. त्याच्या अटकेनंतर अधिक ५९ जणांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे बोगस घरवाटप प्रकरणात अद्यापपर्यंत १६३ जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी नोंदवलेल्या तक्रारीत राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांच्या देखील नावाचा उल्लेख आहे. घरांच्या बहाण्याने यादवने अनेकांना कोट्यवधीचा गंडा घातल्यानंतर त्याच्या शोधात अनेक जण युनियन कार्यालयात जात होते. यावेळी देशमुख यांनी त्यांची भेट घेवून तुमचे काम होईल, काळजी करू नका असे आश्वासन दिले होते. शिवाय त्यानंतर फसवणूक झालेल्यांपैकी काहींची नेत्यांसोबत बैठक देखील घडवून आणली होती. याच बैठकीत यादवने घेतलेल्या रकमेची परतफेड करण्याची जबाबदारी संतोष जाधव याच्यावर देण्यात आली होती. मात्र त्यातूनही काहीच निष्पन्न न झाल्यामुळे अखेर पाच महिन्यांनी संबंधितांनी यादव व चव्हाण यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. या प्रकारामुळे माथाडी कामगार युनियन भविष्यात वादात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यादव हा सध्या पोलिसांच्या अटकेत असून देशमुख यांना देखील पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. देशमुख हे माथाडी नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे या दोघांचेही निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. यामुळे पोलिसांमार्फत त्यांची चौकशी झाल्यास या घोटाळ्याची महत्त्वपूर्ण माहिती उघड होण्याची शक्यता तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बोगस घरवाटप प्रकरणात देशमुख यांच्या नावाच्या उल्लेखामुळे दोन्ही नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात देशमुख यांंच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.