शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांसाठीच्या योजना ईटीसीच्या छताखाली

By admin | Updated: February 25, 2017 03:24 IST

शहरातील सर्व प्रकारच्या दिव्यांग (अपंग) व्यक्तींसाठी योजना राबविण्याची जबाबदारी ईटीसी केंद्रावर सोपविण्यात आली आहे.

नामदेव मोरे,  नवी मुंबई शहरातील सर्व प्रकारच्या दिव्यांग (अपंग) व्यक्तींसाठी योजना राबविण्याची जबाबदारी ईटीसी केंद्रावर सोपविण्यात आली आहे. साधारणत: ८०० विद्यार्थी व इतर ४५०० नागरिकांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी अर्थसंकल्पात १६ कोटी ३५ लाख रुपये तरतूद केली आहे. प्रत्येक वर्षी या विभागासाठी सढळ हाताने निधी उपलब्ध करून दिला जातो; पण या खर्चामधून खरोखर पुनर्वसनाचा उद्देश साध्य होत आहे का? याच्या पाहणीसाठी व नियंत्रणासाठीची कोणतीही यंत्रणा सद्यस्थितीमध्ये पालिकेकडे नाही. शहरातील विशेष मुलांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने २००७मध्ये ईटीसी अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू केले. विशेष मुलांची शाळा म्हणूनच आतापर्यंत हे केंद्र ओळखले जात होते; परंतु आमदार मंदा म्हात्रे यांनी केंद्राला भेट देऊन तेथील कारभारावर घेतलेल्या आक्षेपानंतर केंद्र संचालिका वर्षा भगत यांनी ही शाळा नसून, पुनर्वसन केंद्र असल्याचे स्पष्टीकरण दिले. शाळेचे केंद्रात रूपांतर कधी व कसे झाले याची माहिती एकाही लोकप्रतिनिधींना सांगता येत नाही, यामुळे केंद्र वादग्रस्त ठरले असून पालक संघटनांनी थेट न्यायालयातच धाव घेतली आहे. महापालिकेला पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार मिळवून देणाऱ्या व आतापर्यंत पालिकेचा आदर्श प्रकल्प म्हणून नावलौकिक असलेले केंद्र वादग्रस्त ठरू लागले आहे. सीवूड सेक्टर ५०मधील शाळेच्या इमारतीमध्ये नवीन केंद्र सुरू करण्यास नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे तेथे उपकेंद्र सुरू करण्याचा प्रयत्न फसला आहे. याशिवाय ईटीसी केंद्रातील संचालिका इतर महापालिका व देशातील संस्थांमध्ये मार्गदर्शक म्हणून जाण्यासही सर्वसाधारण सभेने विरोध दर्शविला आहे. तुम्हाला तुमचे जे कौशल्य दाखवायचे आहे ते येथेच दाखवा, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले आहे. विशेष मुलांसाठीची शाळा म्हणून सुरू केलेल्या ईटीसीच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठीच्या सर्व योजना राबविण्याची जबाबदारी दिली आहे. या केंद्रासाठी पालिकेने अर्थसंकल्पात नेहमीच भरीव तरतूद केली आहे. पुढील वर्षीसाठी १६ कोटी ३५ लाखांची तरतूद केली आहे. महापालिकेने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणे गतवर्षी शाळेमध्ये ७३८ विद्यार्थी शिक्षण घेत होते. अपंगांसाठीच्या इतर योजनांचा लाभ जवळपास ४७७५ नागरिकांनी घेतला आहे. पुढील वर्षीसाठी लाभार्थ्यांची संख्या एवढीच राहिली व अर्थसंकल्पातील खर्चाशी तुलना केली, तर एका व्यक्तीसाठी सरासरी ३० हजार रुपये खर्च होणार आहे. फक्त विद्यार्थ्यांच्या खर्चाशी तुलना केली, तर हा आकडा पाचपट वाढत आहे. एवढा प्रचंड खर्च करून चालविण्यात येत असलेल्या केंद्राच्या माध्यमातून खरोखर अपंगांचा विकास होत आहे का व विशेष मुलांचे पुनर्वसन होत आहे का? याकडे पालिका प्रशासन लक्षच देत नाही.