शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शहरातील कंत्राटी कामगार बेमुदत संपावर

By admin | Updated: October 25, 2016 04:20 IST

कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. किमान वेतन धोरणाची अंमलबजावणीही केली जात नाही. ऐन दिवाळीमध्ये वेतनापासून वंचित राहावे लागल्यामुळे

नवी मुंबई : कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. किमान वेतन धोरणाची अंमलबजावणीही केली जात नाही. ऐन दिवाळीमध्ये वेतनापासून वंचित राहावे लागल्यामुळे संतप्त कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग निर्माण झाले असून पाणीपुरवठा यंत्रणाही विस्कळीत झाली आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कंत्राटी कामगारांनीही रणशिंग फुंकले आहे. साफसफाईच्या ठेक्यांना वाढीव मुदत न देता ते रद्द करण्यात आले आहेत. अनेक कामगारांना तीन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. वारंवार मागणी करूनही वेतन देण्याविषयी काहीही कार्यवाही होत नाही. दसऱ्यामध्ये उधारी पैसे घेवून सण साजरा करावा लागला. दिवाळी काही दिवसांवर आल्यानंतरही पगार न मिळाल्यामुळे व एक वर्षापासून असलेल्या प्रलंबित मागण्यांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अचानक कामगारांनी संप पुकारला आहे. साफसफाई, कचरा वाहतूक, उद्यान,मलेरिया, पाणीपुरवठा, रूग्णालय विभागातील कर्मचाऱ्यांनी काम थांबविले आहे. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिवसभर शहरातील कचरा उचलण्यात आला नाही. रस्त्यांची व उद्यानांची साफसफाई केली नाही. सकाळी पाणीही सोडले नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होवू लागली. नागरिकांच्या विनंतीनंतर कामगारांनी पाणी सोडण्यास होकार दिला. पण लवकरच मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आयुक्तांवरील अविश्वास ठरावाच्या एक दिवस अगोदर कामगारांनी आंदोलन केल्यामुळे त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. अविश्वास ठरावाला कामगारांनी आंदोलनाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला आहे. दिवसभर प्रत्येक सोसायटीमध्ये व रोडवर कचरा पडून असल्यामुळे प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती. महापालिकेमध्ये आणिबाणीची स्थिती असल्यामुळे कामगारांशी चर्चा करण्यासाठी कोणीही जबाबदार नागरिक उपस्थित नाही. अविश्वास ठरावानंतरच या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.