शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

शहरातील कंत्राटी कामगार बेमुदत संपावर

By admin | Updated: October 25, 2016 04:20 IST

कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. किमान वेतन धोरणाची अंमलबजावणीही केली जात नाही. ऐन दिवाळीमध्ये वेतनापासून वंचित राहावे लागल्यामुळे

नवी मुंबई : कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. किमान वेतन धोरणाची अंमलबजावणीही केली जात नाही. ऐन दिवाळीमध्ये वेतनापासून वंचित राहावे लागल्यामुळे संतप्त कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग निर्माण झाले असून पाणीपुरवठा यंत्रणाही विस्कळीत झाली आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कंत्राटी कामगारांनीही रणशिंग फुंकले आहे. साफसफाईच्या ठेक्यांना वाढीव मुदत न देता ते रद्द करण्यात आले आहेत. अनेक कामगारांना तीन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. वारंवार मागणी करूनही वेतन देण्याविषयी काहीही कार्यवाही होत नाही. दसऱ्यामध्ये उधारी पैसे घेवून सण साजरा करावा लागला. दिवाळी काही दिवसांवर आल्यानंतरही पगार न मिळाल्यामुळे व एक वर्षापासून असलेल्या प्रलंबित मागण्यांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अचानक कामगारांनी संप पुकारला आहे. साफसफाई, कचरा वाहतूक, उद्यान,मलेरिया, पाणीपुरवठा, रूग्णालय विभागातील कर्मचाऱ्यांनी काम थांबविले आहे. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिवसभर शहरातील कचरा उचलण्यात आला नाही. रस्त्यांची व उद्यानांची साफसफाई केली नाही. सकाळी पाणीही सोडले नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होवू लागली. नागरिकांच्या विनंतीनंतर कामगारांनी पाणी सोडण्यास होकार दिला. पण लवकरच मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आयुक्तांवरील अविश्वास ठरावाच्या एक दिवस अगोदर कामगारांनी आंदोलन केल्यामुळे त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. अविश्वास ठरावाला कामगारांनी आंदोलनाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला आहे. दिवसभर प्रत्येक सोसायटीमध्ये व रोडवर कचरा पडून असल्यामुळे प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती. महापालिकेमध्ये आणिबाणीची स्थिती असल्यामुळे कामगारांशी चर्चा करण्यासाठी कोणीही जबाबदार नागरिक उपस्थित नाही. अविश्वास ठरावानंतरच या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.