शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

आदिवासींना मिळाला न्याय

By admin | Updated: October 14, 2016 06:46 IST

रानसईमधील आदिवासींची व्यथा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर शासकीय यंत्रणांनीही गंभीर दखल घेतली आहे. रेशनिंगसाठी सहा किलोमीटर

नवी मुंबई : रानसईमधील आदिवासींची व्यथा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर शासकीय यंत्रणांनीही गंभीर दखल घेतली आहे. रेशनिंगसाठी सहा किलोमीटर होणारी पायपीट थांबविण्यात आली आहे. यापुढे थेट पाड्यांवर धान्य वाटप केले जाणार असून त्याची सुरवातही केली आहे. उरण तालुक्यामधील सागाची वाडी, खैरकाठी, भुऱ्याची वाडी, मार्गाची वाडी, बंगल्याची वाडी व खोंडावाडी येथील आदिवासींना प्राथमिक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. गावात जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने येथील आदिवासींना रेशनिंगचे धान्य घेण्यासाठी सहा किलोमीटर चालून चिरनेरमध्ये जावे लागत होते. तेथेही अनेक वेळा पूर्ण धान्य मिळत नसल्याचे लोकमतने निदर्शनास आणून दिले होते.या घटनेची गंभीर दखल उरणच्या तहसीलदार सविता गोडे यांनी घेतली. प्रत्यक्ष पाड्यांवर जावून तेथील नागरिकांशी संवाद सांधला. नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या. तहसीलदारांनी रानसई येथे जावून आदिवासींना ८५० किलो तांदूळ व ३४२ किलो गहू वाटप केले. ३४२ कार्डधारकांना प्रत्येकी २५ किलो तांदूळ व १० किलो गव्हाचे स्वतंत्र पॅकेट करून त्याचे वितरण केले. तहसीलदार सविता गोडे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, रानसईमध्ये जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नसल्याने तेथे धान्य घेवून जाता येत नसल्याचे दुकानदाराने सांगितले होते. पण आदिवासींना धान्य घेण्यासाठी सहा किलोमीटर चालावे लागू नये यासाठी पाड्यांवरच धान्य वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी पिकअप व्हॅनचा वापर केला जाणार आहे. रॉकेलही पाड्यावरच वितरीत करण्यासाठीच्या सूचना संबंधित दुकानदारांना दिल्या असून या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)