शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

कोकण भवनवर आदिवासींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:33 IST

आदिवासींची जंगलातून हकालपट्टी केली जाऊ नये. वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी केली जावी या मागणीसाठी रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यातील आदिवासींनी कोकण भवनवर मोर्चा काढला.

नवी मुंबई : आदिवासींची जंगलातून हकालपट्टी केली जाऊ नये. वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी केली जावी या मागणीसाठी रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यातील आदिवासींनी कोकण भवनवर मोर्चा काढला. शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन उपआयुक्तांना दिले असून ११ मार्चला आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.सर्वोच्च न्यायालयात दाखल रिट याचिकेवर फेब्रुवारीमध्ये दिलेल्या आदेशामध्ये आदिवासींना जंगलातून हटविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला स्थगिती मिळविली असली तरी आदिवासींवरील कारवाईची टांगती तलवार कायम आहे. शासनाने आदिवासींची बाजू न्यायालयात मांडावी. वन हक्क कायदा राज्यात योग्यरीत्या लागू केलेला नाही. मोठ्या प्रमाणात खऱ्या दाव्यांनाही नाकारण्यात आले आहे. अद्याप हजारो दावे प्रलंबित आहेत. ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये हजारो अपील प्रलंबित आहेत. २०१२ मधील अपीलही अद्याप निकाली निघालेली नाहीत. अंशत: नाकारलेल्या दाव्यांचीही फेरतपासणी करण्यात यावी. दळी जमीन व इतर प्रश्नही सोडविण्यात यावेत. जे बिगर आदिवासी पिढ्यानपिढ्या जंगलाच्या जमिनीत लागवड करत आहेत ते आजही वन हक्कांपासून वंचित आहेत. त्यांच्या मागण्याही मान्य कराव्या, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.सर्वहरा जन आंदोलन, श्रमिक मुक्ती संघटना, कष्टकरी संघटना, श्रमिक क्रांती संघटना, जागृत कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित केले होते. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, इंदवी तुळपुळे, सुरेखा दळवी यांच्यासह इतर संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते. आंदोलकांनी उपआयुक्त महसूल सिद्धराम सालीमठ यांना निवेदन दिले. सालीमठ यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून ११ मार्चला सायंकाळी साडेचार वाजता वन हक्क जमीन व इतर प्रश्न सोडविण्यासाठी महसूल आयुक्त जगदीश पाटील व तीन जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.