शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पोलीस बंदोबस्तात कचरा वाहतूक

By admin | Updated: October 28, 2016 03:58 IST

शहरवासीयांच्या असंतोषामुळे महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये कचऱ्याचे ढीग उचलण्यास सुरवात केली. यानंतरही आंदोलकांची गुंडगिरी सुरूच असून नेरूळ

नवी मुंबई : शहरवासीयांच्या असंतोषामुळे महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये कचऱ्याचे ढीग उचलण्यास सुरवात केली. यानंतरही आंदोलकांची गुंडगिरी सुरूच असून नेरूळ व इतर काही ठिकाणी कचरा उचलणाऱ्या कामगारांना मारहाण करण्यात आली. चार महिने पगार मिळाला नसल्याचे कारण देवून शहरातील कंत्राटी कामगारांनी रविवारपासून साफसफाईची कामे थांबविली असून कचरा वाहतूकही बंद केली आहे. कचरा न उचलल्याने शहरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. सोसायट्यांमधील स्थितीही गंभीर झाली आहे. आंदोलन करणाऱ्या कामगारांना आवाहन करूनही संप मागे घेण्यात आला नाही. बुधवारी तुर्भे हनुमाननगर येथे शिवसेना शाखा प्रमुख महेश कोठीवाले व तय्यब पटेल यांनी स्वखर्चाने कचरा उचलण्याचा प्रयत्न करताच आंदोलकांनी तीव्र विरोध केला. कचरा उचलणार नाही व उचलू देणार नाही या भूमिकेमुळे शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. असंतोषाचा उद्रेक होवू नये यासाठी पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये कचरा उचलण्यास सुरवात केली. दिवसभर ५०० टन कचरा उचलण्यात आला. रात्री उशिरापर्यंत कचरा वाहतूक सुरू होती. कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची काम करण्याची तयारी होती, पण साफसफाई करणाऱ्या कामगारांनी त्यांना काम करण्यास विरोध केला होता. कचऱ्याचे ढीग साचल्याशिवाय आंदोलनाचे परिणाम दिसणार नसल्यामुळे दादागिरी करून कोणालाच काम करू दिले जात नव्हते. गुरूवारीही आंदोलकांनी नेरूळमध्ये काम करणाऱ्या कामगाराला मारहाण केली. एक कामगार जखमी झाला आहे. कोपरखैरणे व बेलापूरमध्येही कचरा उचलण्यावरून संघर्ष निर्माण झाला होता. अखेर पालिका प्रशासनाने विरोध करणाऱ्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करण्यास सुरवात केल्यामुळे कचरा उचलण्यासाठीचा विरोध कमी झाला. (प्रतिनिधी)कार्यालयात कचरा आंदोलकांनी वाशी विभाग कार्यालयामध्ये कचरा टाकला. याशिवाय शहरातील कचरा कुंड्या उलट्या करून कचरा रस्त्यावर पसरविला. शहरवासीयांची अडवणूक करण्यासाठी हे सर्व प्रकार केल्याने नागरिकांमध्ये कामगारांविषयी असलेली सहानुभूती कमी होवू लागली आहे.