शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

ट्रॅव्हल्समुळे वाहतुकीचा बोजवारा

By admin | Updated: May 21, 2017 03:29 IST

खासगी वाहनांमुळे शहरातील मुख्य मार्गावर वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. रस्त्यावर जागा भेटेल त्या ठिकाणी, पुलाखाली अथवा एसटीच्या बसथांब्यावर या खासगी

- सूर्यकांत वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : खासगी वाहनांमुळे शहरातील मुख्य मार्गावर वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. रस्त्यावर जागा भेटेल त्या ठिकाणी, पुलाखाली अथवा एसटीच्या बसथांब्यावर या खासगी वाहनांनी ताबा मिळवला आहे. यामुळे इतर वाहनचालकांसह सामान्य प्रवाशांना त्रास होत असतानाही आरटीओ, तसेच वाहतूक पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामागे अर्थपूर्ण कारण असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.खासगी ट्रॅव्हल्सला टप्प्याने प्रवासी थांबे करण्याला व वसाहतीअंतर्गतच्या मार्गावर प्रवेशाला बंदी आहे. असे असतानाही नवी मुंबईत मात्र खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. शहरातील मुख्य रस्ते, तसेच वसाहतीअंतर्गतचे रस्ते त्यांना जनू आंदणच दिल्याचे भासत आहे. मुंबई, ठाणे येथून पुणे, सातारा अथवा कोल्हापूर येथे जाणारी खासगी वाहने नवी मुंबई मार्गेच जातात. दिवसाच्या तुलनेत रात्री चालवल्या जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा त्यात सर्वाधिक समावेश आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्हा व तालुक्यात जाणाऱ्या अशा ट्रॅव्हल्सची संख्या शेकडोंच्या घरात आहे. या सर्वच ट्रॅव्हल्स ठाणे-बेलापूर मार्गे अथवा सायन-पनवेल मार्गाने जातात. मात्र, मुंबई अथवा ठाणे येथून प्रवासी घेऊन निघाल्यानंतर या ट्रॅव्हल्स प्रवाशांच्या शोधात नवी मुंबईत प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी थांबवल्या जातात. त्यामध्ये ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे तलाव, कोपरखैरणे रेल्वेस्थानक या ठिकाणी, तर सायन-पनवेल मार्गावर वाशी पुलाखाली, सानपाडा पुलाखाली, नेरुळ, सीबीडी व कामोठे हे खासगी ट्रॅव्हल्सचे बेकायदेशीर थांबे बनले आहेत. त्याशिवाय पनवेल डेपोसमोरील पुलाखाली खांदा कॉलनीच्या मार्गावरही या ट्रॅव्हल्स थांबवल्या जातात. या सर्व ठिकाणी एका वेळी पाच ते दहा खासगी ट्रॅव्हल्स थांबत असल्यामुळे संपूर्ण मार्ग अडवला जाऊन, इतर वाहनांच्या मार्गात अडथळा होत आहे. यासंदर्भात अनेकांनी ठिकठिकाणी तक्रारीही केलेल्या आहेत. त्यानंतरही आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून या अवैध प्रवासीवाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर एकदाही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे यामागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण दडलेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच कोपरखैरणे व घणसोली नोडमध्येही ट्रॅव्हल्सचे अवैध थांबे तयार होऊ लागले आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश नागरिक घणसोली व कोपरखैरणेत स्थायिक झालेले आहेत. त्यांना थेट गावापर्यंत प्रवासाची सुविधा देण्याच्या बहाण्याने त्यांच्याच परिचितांपैकी अनेकांनी ट्रॅव्हल्स सुरू केल्या आहेत. या ट्रॅव्हल्स रात्री ९ वाजल्यानंतर ठिकठिकाणी रस्त्यावर थांबत असल्याचे दिसत आहे. त्यात सतत रहदारी असलेल्या कोपरखैरणेतील तीन टाकी चौक, घणसोलीतील सिम्पलेक्स चौक या ठिकाणांचा समावेश आहे.