शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

टोल कर्मचाऱ्यांना कामावरून काढले नाही, खारघर टोल कंत्राटदाराचे पोलिसांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:35 IST

टोल सुरू झाल्यापासून या ठिकाणी कार्यरत असलेले हे कर्मचारी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचे कारण पुढे करीत कंत्राटदार या कर्मचा-यांना तोंडीच तुम्ही कामावर येऊ नका, असे सांगू लागले.

पनवेल : लॉकडाऊनचे कारण पुढे करून सायन-पनवेल महामार्गावरील खारघर टोल नाक्यावर टोल वसूल करणा-या डीआर सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपनीने ३९ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा आरोप केला होता. कंत्राटदाराच्या या भूमिकेमुळे संबंधित कर्मचा-यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशा-यानंतर कंत्राटदारामार्फत पोलिसांना पत्र देऊन या कर्मचाºयांना कामावरून काढले नसल्याची सावध भूमिका घेतली आहे.टोल सुरू झाल्यापासून या ठिकाणी कार्यरत असलेले हे कर्मचारी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचे कारण पुढे करीत कंत्राटदार या कर्मचाºयांना तोंडीच तुम्ही कामावर येऊ नका, असे सांगू लागले. एकीकडे कोविडच्या साथीत आपली जबाबदारी पार पडणाºया या कर्मचाºयांना एकाएकी कामावरून कमी केल्याचे सांगितल्यावर मोठा धक्का बसला.लॉकडाऊनच्या परिस्थितीत एकाएकी बेरोजगार झाल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित कर्मचाºयांनी स्थानिक नगरसेवक अ‍ॅडव्होकेट नरेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला. खारघर पोलीस, डीआर सर्व्हिसेस तसेच एमएसआरडीए आदींना या कर्मचाºयांनी आंदोलनाचे पत्र दिले होते. आंदोलनाच्या इशाºयानंतर टोल वसूल करणारी कंत्राटदार कंपनी डीआर सर्व्हिसेस यांनी पोलीस प्रशासन तसेच नगरसेवक अ‍ॅडव्होकेट नरेश ठाकूर यांना पत्र लिहून संबंधित कामगारांना कामावरून कमी केले नसल्याचा दावा केला आहे. कोविड काळात खबरदारी म्हणून टोलवर कर्मचारी संख्या १ ते ३ ने कमी केली असल्याचा दावा ठेकेदारांनी केला आहे. दरम्यान, संबंधित कर्मचाºयांचे थकीत वेतन, १६ महिन्यांचा पीएफ याबाबत कंत्राटदारामार्फत काहीच माहिती दिली गेली नसल्याने कर्मचाºयांची आंदोलनाची भूमिका कायम असल्याचे नगरसेवक ठाकू र यांनी सांगितले.मागील सात वर्षांपासून टोलवर काम करणारे सर्व कर्मचारी स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत. वेगवेगळ्या पदांवर काम करणाºया ३९ कर्मचाºयांपैकी १७ कर्मचारी टोल सुरू झाल्यापासून तर २३ कर्मचारी मागील दोन वर्षांपासून काम करीत आहेत. मात्र, एकीकडे टोल वसुली सुरू असताना आमचा पगार कपात का केला जातो, असा प्रश्न या ठिकाणी कार्यरत असलेल्या जयेश ठाकूर या कर्मचाºयाने उपस्थित केला आहे. कोविड काळात टोल नाक्यावर तात्पुरत्या स्वरूपात कामगार कमी केले असले तरी आम्ही आजतागायत प्रामाणिकपणे आमचे काम केले आहे. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये आम्ही आमची सेवा बजावली असल्याने आम्हाला नियमित पगार कंत्राटदार कंपनीने दिला पाहिजे. दरम्यान, कंत्राटदाराने आपली भूमिका मांडताना कोणत्याही कर्मचाºयाला कामावरून काढले नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना कर्मचाºयांसह शासकीय यंत्रणेला अंधारात ठेवल्याचा आरोप नगरसेवक ठाकूर यांनी के ला. कामावरून काढून टाकले नाही, तर या कर्मचाºयांचे वेतन का रोखून धरण्यात आले आहे हे कंत्राटदार कंपनीने स्पष्ट करावे, असे ठाकू र यांनी म्हटले आहे.लॉकडाऊनमध्ये कोणत्याही आस्थापनांमार्फत कर्मचाºयांवर अन्याय होणार नाही याकरिता शासनाचे निर्देश आहेत. मात्र, कंत्राटदार कंपनी लॉकडाऊनचे कारण पुढे करीत या कर्मचाºयांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत आहे. या कर्मचाºयांचे पगार रोखून धरले आहेत. आंदोलनाच्या इशाºयानंतर या कर्मचाºयांना कामावरून काढले नसल्याचा खुलासा कंत्राटदाराने केला आहे. तसे असल्यास या कर्मचाºयांना चालू महिन्याचे वेतन देण्यात यावे; अन्यथा आमची आंदोलनाची भूमिका ठाम आहे.- अ‍ॅडव्होकेट नरेश ठाकूर, स्थानिक नगरसेवक

टॅग्स :tollplazaटोलनाकाNavi Mumbaiनवी मुंबई