शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये साथीचे तीन बळी

By admin | Updated: November 1, 2014 22:29 IST

स्वच्छ भारत अभियानास 2 ऑक्टोबरपासून देशपातळीवर धूमधडाक्यात सुरुवात झाली खरी, मात्र आजही खेडय़ातील भारत अस्वच्छतेच्या गर्तेत अडकला आहे.

पेण : स्वच्छ भारत अभियानास 2 ऑक्टोबरपासून देशपातळीवर धूमधडाक्यात सुरुवात झाली खरी, मात्र आजही खेडय़ातील भारत अस्वच्छतेच्या गर्तेत अडकला आहे.  अस्वच्छता दूर कोणी करायची, कच:यांचे ढीग कोणी उचलायचे, यासाठी ग्राम प्रशासन व जनतेत एकसंधता नसल्याने या अस्वच्छतेमुळे तापाच्या साथीत बळी जात आहेत. गेल्यावर्षी 16 बळी गेले. यावर्षी सुरुवातीलाच 3 जणांचा मृत्यू झाल्याने अस्वच्छता हीच सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरल्याचे चित्र पेणमध्ये आहे.
गावचा व शहरांचा घनकचरा दिवसेंदिवस वाढत आहे. आणि यातूनच साथीच्या रोगांची लागण होताना दिसत आहे. पेणच्या मळेघर गावात भीमाबाई म्हात्रे (56) व रेश्मा मोकल (32) तर उचेडे गावातील बाळाजी परशुराम म्हात्रे (56) या तीन रुग्णांचा तापसदृश्य साथीने मृत्यू झाला. 
मळेघर गावात सांडपाणी व कच:याचे ढीग जागोजागी आढळले. गावाच्या शेजारी असलेल्या परिसरातील अस्वच्छता, त्याचबरोबरीने काश्मिरे गावातही असेच कच:याचे ढीग पसरले आहेत. स्वच्छता कोणी करायची, हा प्रश्न ऐरणीवरचा आहे. ग्रामपंचायत, तेथील लोकप्रतिनिधी गावकरी यांच्या एकत्रित सहभागाचा प्रश्न असूनही जोतो जबाबदारी झटकताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणा गावात गेले दोन दिवस तळ ठोकून आहे. वाशी आरोग्य केंद्राच्या डॉ. आरती माने, आरोग्य सुपरवायझर एन. एल. पाटील, के. जी. भोईर, डी. पी. म्हात्रे व अन्य अशा आठ कर्मचारीवर्गाने 174 घरांना भेटी देवून प्रतिबंधक औषधाचे वाटप केले आहे. 1क् रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी ठाणो येथे पाठविले. 13 रुग्णांवर उपचार झाले आहे.
 
सगळीकडे कचरा
या परिसरात फेरफटका मारला असता जागोजागची अस्वच्छता लक्ष वेधून घेत आहे. गावे स्वच्छ व्हावीत यासाठी गावानेच पुढाकार घ्यावा. ग्रामपंचायतीने यासाठी गावाला विश्वासात घेणो ही काळाची गरज व्हावी. आपले सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणो आवश्यक आहे.