शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पनवेल महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना ठोठावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 01:12 IST

४ सप्टेंबर २०१८ साली अर्ज करून प्रभाग अधिकारी आणि जनमाहिती अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला होता. माहिती मिळाली नाही म्हणून प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला.

पनवेल : पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रभाग अधिकारी आणि अभियंत्याचा समावेश आहे. पनवेल महापालिकेत अनेक माहिती अधिकाराचे अर्ज थकीत आहेत. दिलेल्या मुदतीत माहिती दिली जात नाही. कामोठ्यातील रहिवासी  सुनील शिरीषकर यांनी पनवेल महापालिका क्षेत्रातील नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाइकांची  बेकायदा बांधकामाची माहिती मागवली होती. २

४ सप्टेंबर २०१८ साली अर्ज करून प्रभाग अधिकारी आणि जनमाहिती अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला होता. माहिती मिळाली नाही म्हणून प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला. ड प्रभागाकडून त्यांना आवश्यक माहिती देण्यात आली; मात्र अपिलीय अधिकाऱ्याकडे अर्ज करून ३० दिवसांची मुदत दिल्यानंतर अ प्रभाग अधिकारी भगवान पाटील यांनी खुलासा केला; मात्र क प्रभागाचे अधिकारी जयराम पादीर आणि ब प्रभागाचे अधिकारी हरिश्चंद्र कडू यांनी मात्र माहिती दिली नाही. माहिती का पुरविली नाही म्हणून ३० दिवसांत खुलासा करण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त के. बिश्नोई यांनी दिले होते. त्यांच्या आदेशाचे पालन न करता कोणतेच उत्तर या प्रभाग अधिकाऱ्यांनी न दिल्यामुळे त्या दोघांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड करण्याचा आदेश नुकताच देण्यात आला.  माहिती अधिकार अधिनियम कलम २० नुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित दंडाची रक्कम अधिकाऱ्यांच्या वेतनातून  वळती करण्यात यावी, असा आदेश दिला आहे.तक्का गावातील रहिवाशी गणेश वाघिलकर यांनीदेखील तक्का गावातील एका मोबाइल टॉवरच्या परवानगीच्या कागदपत्रांची माहिती मागवली होती. ही माहितीदेखील देण्यात न आल्यामुळे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता जनमाहिती अधिकारी सुधीर साळुंखे यांनादेखील अशाच प्रकारे ५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

इतर अधिकाऱ्यांना धडामाहिती अधिकारात माहिती देण्यास अनेक वेळा टाळाटाळ केली जाते. अशा वेळी अर्जदाराचा वेळदेखील वाया जात असतो. दंडाच्या निर्णयामुळे इतर अधिकाऱ्यांना धडा मिळेल, असे गणेश वाघीलकर यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल