शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

महिनाभरात हजार बोअरवेल

By admin | Updated: April 4, 2016 02:02 IST

शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका व नागरिकांनी एका महिन्यात एक हजारापेक्षा जास्त बोअरवेल व हातपंप खोदले आहेत. यामुळे जमिनीची अक्षरश: चाळण झाली

उल्हासनगर : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका व नागरिकांनी एका महिन्यात एक हजारापेक्षा जास्त बोअरवेल व हातपंप खोदले आहेत. यामुळे जमिनीची अक्षरश: चाळण झाली असून भूगर्भातील पाण्याची पातळी ४०० फुटांपर्यंत गेली आहे. तर, अनेक ठिकाणी बोअरवेलला पाणीच लागत नसल्याने एप्रिल-मे महिन्यांत पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेकडे पाण्याचा पर्यायी स्रोत नसल्याने त्यांना एमआयडीसीच्या मनमानी कारभारावर अवलंबून राहावे लागत आहे. पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी टंचाईची झळ कमी करण्यासाठी जुन्या बोअरवेल व हातपंपांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहे. तसेच प्रत्येक प्रभागात तीन बोअरवेल खोदण्याला मान्यता दिली. मात्र, नागरिकांच्या मागणीनुसार एका प्रभागात सहापेक्षा जास्त बोअरवेल खोदण्यात येत आहे. पालिकेने एका महिन्यात ३०० पेक्षा जास्त तर लहान-मोठ्या कारखान्यांनी ७०० पेक्षा जास्त बोअरवेल खोदल्याची चर्चा आहे. >शहरातून बारमाही वाहणारी उल्हास नदी आहे. अशा वेळी नदीपात्रातून पाणी न उचलता किनारी बोअरवेल खोदून त्याद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्याची मागणी आयुक्तांकडे होत आहे. नदीकिनाऱ्यावरील पाणी पिण्यास योग्य असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले असून स्वत:चा पाणीस्रोत उभारण्याची मागणी पालिकेकडे होत आहे. नवीन बोअरवेल व हातपंप खोदण्यावर पालिकेने वेळीच निर्बंध न घातल्यास भूगर्भातील पाणीपातळी ४०० फुटांपेक्षा जास्त खोल जाईल, असे तज्ज्ञ सांगत आहेत. > मनसेचे शहराध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी नवीन बोअरवेल व हातपंप खोदण्याऐवजी जुन्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. बहुतांश नवीन बोअरवेलला पाणी लागत नसल्याने पालिकेचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत. मात्र, ज्या जुन्या बोअरवेल व हातपंपांना मुबलक पाणी आहे, त्यांची दुरुस्ती केल्यास टंचाईग्रस्त नागरिकांना दिलासा मिळेल. पालिकेने वेळीच कारवाई सुरू न केल्यास आंदोलनाचे शस्त्र पुुन्हा हाती घ्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.