शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

वाहतूक पोलिसांचे ‘पालथ्या घड्यावर पाणी’, नवी मुंबईकरांवर कारवाईचा धाकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 23:44 IST

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई केल्या जात आहेत.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कारवाई व जनजागृती करूनही वाहनचालकांमध्ये बेशिस्तपणाचे दर्शन घडत आहे. चौकांमध्ये वाहतूक पोलीस दिसल्यावरच दिखाव्यासाठी नियमांचे पालन होत आहे. अन्यथा सिग्नल तोडण्यासह इतरही नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. 

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई केल्या जात आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वर्षाला पाच लाखांहून अधिक वाहनचालकांवर वेगवेगळ्या कलमांतर्गत कारवाई होत आहे. त्याशिवाय प्रतिवर्षी रस्ते सुरक्षा अभियान राबवून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून दिले जाते.

यंदा संपूर्ण महिना रस्ते सुरक्षा अभियान राबवून वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. मात्र, हे अभियान म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असल्याची टीका सर्वसामान्यांकडून होत आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाई व जनजागृती करूनदेखील वाहनचालकांना शिस्त लागत नसल्याचाही संताप व्यक्त होत आहे.

नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरात हे चित्र पाहायला मिळत आहे, तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रिक्षा, दुचाकी व खासगी कार यासह अवजड वाहनचालकांचाही समावेश दिसून येत आहे. त्यांच्या बेशिस्तपणाचा त्रास हा सर्वसामान्यांना देखील सहन करावा लागत आहे. त्यातूनच छोट्या मोठ्या अपघाताच्या घटनादेखील घडत आहेत. त्यामुळे अशा बेशिस्त चालकांचे करायचे तरी काय, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. 

बहुतेक अपघात हे वाहन वेगात पळविल्याने होतात. अशा प्रकारात एकाच्या चुकीमुळे दुसऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. लेनची शिस्त न पाळल्याने कोंडी होते; परंतु कारवाई अथवा जनजागृती करूनदेखील अनेकजण दक्ष नागरिक बनत नाहीत.     -  विजय दोंदे. 

बेशिस्त वाहनचालकांमुळे इतरांच्याही जीविताला धोका उद्भवतो. अशा चालकांनी स्वतः जगावे आणि इतरांनाही जगू द्यावे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचा धोका टळू शकतो. प्रत्येकजण जागरूक झाल्यास अपघातांचे प्रमाण नक्कीच घटेल.     - मनोहर सावंत

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईroad transportरस्ते वाहतूक