शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांचे ‘पालथ्या घड्यावर पाणी’, नवी मुंबईकरांवर कारवाईचा धाकच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 23:44 IST

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई केल्या जात आहेत.

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कारवाई व जनजागृती करूनही वाहनचालकांमध्ये बेशिस्तपणाचे दर्शन घडत आहे. चौकांमध्ये वाहतूक पोलीस दिसल्यावरच दिखाव्यासाठी नियमांचे पालन होत आहे. अन्यथा सिग्नल तोडण्यासह इतरही नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. 

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई केल्या जात आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वर्षाला पाच लाखांहून अधिक वाहनचालकांवर वेगवेगळ्या कलमांतर्गत कारवाई होत आहे. त्याशिवाय प्रतिवर्षी रस्ते सुरक्षा अभियान राबवून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून दिले जाते.

यंदा संपूर्ण महिना रस्ते सुरक्षा अभियान राबवून वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. मात्र, हे अभियान म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असल्याची टीका सर्वसामान्यांकडून होत आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाई व जनजागृती करूनदेखील वाहनचालकांना शिस्त लागत नसल्याचाही संताप व्यक्त होत आहे.

नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरात हे चित्र पाहायला मिळत आहे, तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रिक्षा, दुचाकी व खासगी कार यासह अवजड वाहनचालकांचाही समावेश दिसून येत आहे. त्यांच्या बेशिस्तपणाचा त्रास हा सर्वसामान्यांना देखील सहन करावा लागत आहे. त्यातूनच छोट्या मोठ्या अपघाताच्या घटनादेखील घडत आहेत. त्यामुळे अशा बेशिस्त चालकांचे करायचे तरी काय, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. 

बहुतेक अपघात हे वाहन वेगात पळविल्याने होतात. अशा प्रकारात एकाच्या चुकीमुळे दुसऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. लेनची शिस्त न पाळल्याने कोंडी होते; परंतु कारवाई अथवा जनजागृती करूनदेखील अनेकजण दक्ष नागरिक बनत नाहीत.     -  विजय दोंदे. 

बेशिस्त वाहनचालकांमुळे इतरांच्याही जीविताला धोका उद्भवतो. अशा चालकांनी स्वतः जगावे आणि इतरांनाही जगू द्यावे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचा धोका टळू शकतो. प्रत्येकजण जागरूक झाल्यास अपघातांचे प्रमाण नक्कीच घटेल.     - मनोहर सावंत

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईroad transportरस्ते वाहतूक