शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
7
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
8
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
9
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
10
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
11
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
12
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
13
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
14
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
15
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
16
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
17
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
18
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
19
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
20
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र

पावसाळ्यापर्यंत नवीन नळजोडण्या नाहीत

By admin | Updated: January 16, 2016 00:35 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून पाणीकपात लागू केली आहे. उपलब्ध पाण्याचा साठा आगामी पावसाळ्यापर्यंत

नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून पाणीकपात लागू केली आहे. उपलब्ध पाण्याचा साठा आगामी पावसाळ्यापर्यंत पुरावा यादृष्टीने सर्वंकष उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यापर्यंत नवीन नळ जोडण्या न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरणातून महापालिका नवी मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा करते. त्यानुसार मोरबे धरणातून दिवसाला साधारण ४२८ एमएलडी पाणी घेतले जाते. असे असले तरी गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्याने धरणाची पातळी खालावली. सध्या पुढील तीन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा धरणात शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत १९ टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसाला आता ३00 एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जात आहे. पूर्वीच्या पाणीपुरवठ्यात १२८ एमएलडी पाण्याची कपात करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत तब्बल ४00 अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाण्याचा स्वैर वापर करणाऱ्या अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे करीत असताना पावसाळ्यापर्यंत नवीन नळजोडण्या न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात १ लाख २२ हजार अधिकृत नळजोडण्या आहेत. ९७२ किमी लांबीच्या जलवाहिन्यांद्वारे या नळजोडण्यांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु सध्या १९ टक्के पाणीकपात केल्याने ग्राहकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याचा परिणाम म्हणून अनेक वसाहतींना पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेषत: एमआयडीसी परिसरातील झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी समस्या भेडसावताना दिसत आहे.