शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शिक्षकांनो, एकत्र येऊन लढा

By admin | Updated: December 26, 2016 06:57 IST

गेल्या काही वर्षांत शिक्षकांचे प्रश्न, समस्या वाढल्या आहेत. मात्र, त्यासाठी केवळ मोर्चे, आंदोलने करून उपयोग नाही,

ठाणे : गेल्या काही वर्षांत शिक्षकांचे प्रश्न, समस्या वाढल्या आहेत. मात्र, त्यासाठी केवळ मोर्चे, आंदोलने करून उपयोग नाही, त्यापेक्षा सर्व शिक्षकांनी एकत्र या, परिस्थितीला सामोरे जा, लढा द्या. गरज पडली, तर मी तुम्हाला सहकार्य करीन, असा सल्ला मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी शिक्षकांना दिला. ठाणे आणि पालघर जिह्यातील ६४ शिक्षकांचा सांदिपनी पुरस्कार देऊन गौरव केला.कै. एन. एस. जे. शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे ‘शिक्षक सन्मान दिन’ सोहळा शुक्रवारी सायंकाळी घंटाळी मैदानाच्या पटांगणावर झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. देशमुख होत्या. त्या म्हणाल्या की, ज्ञान-विज्ञानाबरोबरच प्रज्ञान व आत्मज्ञानही असते. शिक्षक मुलांना आत्मज्ञान शिकवतात. आजचा शिक्षक हा गुरुकुलापासून सायबरकुलाकडे चालला आहे. पूर्वी आपल्याला शिक्षण घेण्यासाठी गुरूच्या घरी गुरुकुलात जावे लागत असे. आताच्या युगात गुरूही कॉम्प्युटरच्या आधारे एका क्लिकवर कशी माहिती मिळवता येते, हे शिकवतात. शिक्षणपद्धती कोणतीही असो, प्रत्येक शिक्षक मुलांना घडवतात. शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना आंदोलन करावे लागते. पण अशी वेळ येऊ नये. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावयाला आपण सदैव सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.आज वकील, डॉक्टर, अभियंते, सीए, शिक्षक इत्यादींच्या मुलांना भविष्यात कोण होणार असे विचारले तर कोणीही शिक्षक होणार अशी इच्छा व्यक्त करत नाहीत. ही चूक शिक्षक वा विद्यार्थ्यांची नाही. याचे खरे कारण म्हणजे शिक्षकी पेशाचा हरवलेला सन्मान असे मत शिक्षकमित्र अ‍ॅड. केदार जोशी यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)