शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

शिक्षकांनो, एकत्र येऊन लढा

By admin | Updated: December 26, 2016 06:57 IST

गेल्या काही वर्षांत शिक्षकांचे प्रश्न, समस्या वाढल्या आहेत. मात्र, त्यासाठी केवळ मोर्चे, आंदोलने करून उपयोग नाही,

ठाणे : गेल्या काही वर्षांत शिक्षकांचे प्रश्न, समस्या वाढल्या आहेत. मात्र, त्यासाठी केवळ मोर्चे, आंदोलने करून उपयोग नाही, त्यापेक्षा सर्व शिक्षकांनी एकत्र या, परिस्थितीला सामोरे जा, लढा द्या. गरज पडली, तर मी तुम्हाला सहकार्य करीन, असा सल्ला मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी शिक्षकांना दिला. ठाणे आणि पालघर जिह्यातील ६४ शिक्षकांचा सांदिपनी पुरस्कार देऊन गौरव केला.कै. एन. एस. जे. शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे ‘शिक्षक सन्मान दिन’ सोहळा शुक्रवारी सायंकाळी घंटाळी मैदानाच्या पटांगणावर झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. देशमुख होत्या. त्या म्हणाल्या की, ज्ञान-विज्ञानाबरोबरच प्रज्ञान व आत्मज्ञानही असते. शिक्षक मुलांना आत्मज्ञान शिकवतात. आजचा शिक्षक हा गुरुकुलापासून सायबरकुलाकडे चालला आहे. पूर्वी आपल्याला शिक्षण घेण्यासाठी गुरूच्या घरी गुरुकुलात जावे लागत असे. आताच्या युगात गुरूही कॉम्प्युटरच्या आधारे एका क्लिकवर कशी माहिती मिळवता येते, हे शिकवतात. शिक्षणपद्धती कोणतीही असो, प्रत्येक शिक्षक मुलांना घडवतात. शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना आंदोलन करावे लागते. पण अशी वेळ येऊ नये. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावयाला आपण सदैव सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.आज वकील, डॉक्टर, अभियंते, सीए, शिक्षक इत्यादींच्या मुलांना भविष्यात कोण होणार असे विचारले तर कोणीही शिक्षक होणार अशी इच्छा व्यक्त करत नाहीत. ही चूक शिक्षक वा विद्यार्थ्यांची नाही. याचे खरे कारण म्हणजे शिक्षकी पेशाचा हरवलेला सन्मान असे मत शिक्षकमित्र अ‍ॅड. केदार जोशी यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)