शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

विद्यार्थ्यांची होतेय पायपीट

By admin | Updated: February 4, 2016 02:44 IST

स्मार्ट नवी मुंबईमधील झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोज ४ ते ८ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. दगडखाण ते शाळेपर्यंत जाण्यासाठी वाहतुकीचे साधन नसल्याने मुलांची रोजच दमछाक होत आहे.

नामदेव मोरे,  नवी मुंबई स्मार्ट नवी मुंबईमधील झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोज ४ ते ८ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. दगडखाण ते शाळेपर्यंत जाण्यासाठी वाहतुकीचे साधन नसल्याने मुलांची रोजच दमछाक होत आहे. प्राथमिक शिक्षणाची समाधानकारक सोय असली तरी माध्यमिक शिक्षणासाठी भटकंती करण्याशिवाय पर्याय नसून अनेक ठिकाणी महामार्ग व रेल्वे रूळ ओलांडून जावे लागत आहे. घरापासून एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर शाळा असावी अशी तरतूद आहे. नेरूळ पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर महापालिकेच्या चार व तेवढ्याच खाजगी शाळा आहेत. परंतु दुसरीकडे झोपडपट्टी परिसरात महापालिकेच्या प्राथमिक शाळाही वस्तीपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहेत. फक्त तीनच माध्यमिक शाळा आहेत. ठाणे बेलापूर रोड व नेरूळ ते तुर्भेपर्यंतचा महामार्ग गरिबी व श्रीमंतीची रेषा बनली आहे. रोडच्या एका बाजूला घराजवळ शाळा आहे. तर दुसऱ्या बाजूला खाणमजूर व झोपडपट्टीमधील मुलांना पायपीट करावी लागत आहे. स्कूल बस परवडत नाही तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची काहीही सोय नाही. अशा स्थितीमध्ये या विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.खाजगी कंपन्यांची मदतपावणेमध्ये शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या परिसरातील खाजगी कंपन्यांनी त्यांची वाहने उपलब्ध करून दिली आहेत. सकाळ, दुपार व सायंकाळ ही वाहने मुलांना मोफत शाळेपर्यंत घेवून जातात व पुन्हा घरी सोडतात. परंतु हा अपवाद वगळता इतर ठिकाणी अद्याप लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यापैकी कोणीच मदतीसाठी पुढे येत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. सायन - पनवेल महामार्गावर नेरूळमध्ये सकाळी शेकडो मुले रस्ता ओलांडून शिरवणेमध्ये माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी जात असतात. रमेश मेटल, महात्मा गांधी नगर, नोबल क्वारीमधून चार किलोमीटर अंतर पार करून ही मुले शाळेत पोहचतात. दगडखाणीमधील या मुलांचे आई - वडील रोजंदारीवर काम करून संसार चालवितात. मुलांना शाळेत सोडणे व पुन्हा घेवून येण्याएवढा वेळ त्यांच्याजवळ नसतो. यामुळे या विद्यार्थ्यांना एकट्यानेच रोड ओलांडून जावे लागत आहे. घरापासून शाळा खूपच लांब असल्यामुळे अनेकांना सातवी ते आठवीनंतर शाळा सोडावी लागत आहे. प्रवासामध्ये जास्त वेळ जात असल्यामुळे त्याचा परिणाम अभ्यासावरही होत आहे. शिक्षण मंत्र्यांना अहवाल इंदिरानगरमधील शिवसेना कार्यकर्ते महेश कोठीवाले व संतोष नेटके यांनी नेरूळ शिवाजीनगर ते दिघा परिसरातील झोपडपट्टी व तेथून महापालिकांच्या शाळेसाठी मुलांना किती अंतर पायी चालावे लागते याचे सर्वेक्षण सुरू केले आहे. शाळेपर्यंत जाण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा अहवाल तयार करून आयुक्त, महापौर, विरोधी पक्षनेते व शिक्षण मंत्र्यांना देणार असल्याची माहिती या तरुणांनी दिली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यातदगडखाणीमधील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणासाठी २ ते ४ किलोमीटर व माध्यमिक शिक्षणासाठी ४ ते ८ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. तुर्भे नाक्यावर रेल्वे पटरी, नेरूळमध्ये महामार्ग व इतर ठिकाणी ठाणे बेलापूर रोड ओलांडून जावे लागत आहे. एमआयडीसीमध्येही अवजड वाहनांचे प्रमाण जास्त असते. विद्यार्थ्यांसोबत पालक नसल्याने अनेक वेळा अपघात झाले आहेत. बोनसरीमध्ये दोघांना जीव गमवावा लागला आहे. तुर्भे रेल्वे अपघातामध्ये प्रत्येक वर्षी एका तरी विद्यार्थ्याचा मृत्यू होत आहे.