शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

स्वच्छतेसाठी महापालिकेस विशेष पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:57 IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण : पालिकेच्या कामगिरीचे केले कौतुक

नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविला आहे. या कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाने विशेष पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१९’ मध्ये महानगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवरील अमृत शहरांच्या प्रवर्गात सातवा क्रमांक मिळविला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये राष्ट्रीय मानांकन दोन क्र मांकांनी उंचावले आहे. राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान कायम राखला. देशातील अमृत शहरांमध्ये टॉप टेनमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. यामुळे राज्य शासनाच्या महाराष्ट्र नागरी विकास संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत महापालिकेचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार दिला. या वेळी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, या पूर्वीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. नेत्रा शिर्के, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त तुषार पवार उपस्थित होते.

महापौर जयवंत सुतार यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. यामध्ये सुजान आणि स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रि य सहभागाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगत हा पुरस्कार नागरिकांना समर्पित केला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांनी या दृष्टीने चांगले काम केल्याचा उल्लेख करीत या पुढील काळात राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वोत्तम तीन शहरांमध्ये येण्याचा प्रयत्न राहील असे महापौरांनी सांगितले. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कोणतेही यश संपादन करताना त्यामध्ये सांघिक भावनेचा मोठा सहभाग असतो, असे सांगत शहर स्वच्छतेकरिता सर्व लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी-कर्मचारी, सफाई कामगार तसेच नागरिकांनी एकात्म भावनेने दिलेल्या सक्रि य योगदानामुळेच नवी मुंबई महानगरपालिका नेहमी पुरस्कार प्राप्त करीत असते, असे सांगितले. आगामी स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशात पहिल्या तीन क्र मांकात नवी मुंबई शहर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व यासाठी सर्वांनी सज्ज होऊ या, असे आवाहन केले. या पूर्वीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सुरू केलेली स्वच्छतेची चळवळ पुढे सुरूच ठेवण्यात येईल, असेही स्पष्ट केले.