शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी महापालिकेस विशेष पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:57 IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण : पालिकेच्या कामगिरीचे केले कौतुक

नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविला आहे. या कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाने विशेष पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१९’ मध्ये महानगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवरील अमृत शहरांच्या प्रवर्गात सातवा क्रमांक मिळविला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये राष्ट्रीय मानांकन दोन क्र मांकांनी उंचावले आहे. राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान कायम राखला. देशातील अमृत शहरांमध्ये टॉप टेनमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. यामुळे राज्य शासनाच्या महाराष्ट्र नागरी विकास संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत महापालिकेचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार दिला. या वेळी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, या पूर्वीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. नेत्रा शिर्के, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त तुषार पवार उपस्थित होते.

महापौर जयवंत सुतार यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. यामध्ये सुजान आणि स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रि य सहभागाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगत हा पुरस्कार नागरिकांना समर्पित केला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांनी या दृष्टीने चांगले काम केल्याचा उल्लेख करीत या पुढील काळात राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वोत्तम तीन शहरांमध्ये येण्याचा प्रयत्न राहील असे महापौरांनी सांगितले. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कोणतेही यश संपादन करताना त्यामध्ये सांघिक भावनेचा मोठा सहभाग असतो, असे सांगत शहर स्वच्छतेकरिता सर्व लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी-कर्मचारी, सफाई कामगार तसेच नागरिकांनी एकात्म भावनेने दिलेल्या सक्रि य योगदानामुळेच नवी मुंबई महानगरपालिका नेहमी पुरस्कार प्राप्त करीत असते, असे सांगितले. आगामी स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशात पहिल्या तीन क्र मांकात नवी मुंबई शहर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व यासाठी सर्वांनी सज्ज होऊ या, असे आवाहन केले. या पूर्वीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सुरू केलेली स्वच्छतेची चळवळ पुढे सुरूच ठेवण्यात येईल, असेही स्पष्ट केले.