शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

स्वच्छतेसाठी महापालिकेस विशेष पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:57 IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण : पालिकेच्या कामगिरीचे केले कौतुक

नवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविला आहे. या कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाने विशेष पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१९’ मध्ये महानगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवरील अमृत शहरांच्या प्रवर्गात सातवा क्रमांक मिळविला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये राष्ट्रीय मानांकन दोन क्र मांकांनी उंचावले आहे. राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान कायम राखला. देशातील अमृत शहरांमध्ये टॉप टेनमध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर आहे. यामुळे राज्य शासनाच्या महाराष्ट्र नागरी विकास संचालनालय, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत महापालिकेचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार दिला. या वेळी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, या पूर्वीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. नेत्रा शिर्के, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त तुषार पवार उपस्थित होते.

महापौर जयवंत सुतार यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. यामध्ये सुजान आणि स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रि य सहभागाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगत हा पुरस्कार नागरिकांना समर्पित केला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांनी या दृष्टीने चांगले काम केल्याचा उल्लेख करीत या पुढील काळात राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वोत्तम तीन शहरांमध्ये येण्याचा प्रयत्न राहील असे महापौरांनी सांगितले. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कोणतेही यश संपादन करताना त्यामध्ये सांघिक भावनेचा मोठा सहभाग असतो, असे सांगत शहर स्वच्छतेकरिता सर्व लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी-कर्मचारी, सफाई कामगार तसेच नागरिकांनी एकात्म भावनेने दिलेल्या सक्रि य योगदानामुळेच नवी मुंबई महानगरपालिका नेहमी पुरस्कार प्राप्त करीत असते, असे सांगितले. आगामी स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशात पहिल्या तीन क्र मांकात नवी मुंबई शहर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व यासाठी सर्वांनी सज्ज होऊ या, असे आवाहन केले. या पूर्वीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सुरू केलेली स्वच्छतेची चळवळ पुढे सुरूच ठेवण्यात येईल, असेही स्पष्ट केले.