शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

पालिकेत ‘पाणी वाचवा’चा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2015 00:02 IST

स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे शहरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. मोठ्याप्रमाणात पाणीगळती सुरू असून ती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे

नवी मुंबई : स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे शहरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. मोठ्याप्रमाणात पाणीगळती सुरू असून ती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाणीगळती व चोरीची चाौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये केली आहे. काँगे्रस नगरसेविका मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांनी नवी मुंबईमधील पाण्याच्या उधळपट्टीविषयी व पाणी गळतीविषयी लक्षवेधी मांडली होती. दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या लक्षवेधीवर गुरुवारी चर्चा करण्यात आली. स्वच्छतेविषयी नवी मुंबईला देशात तिसरा व राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. परंतु पाण्याच्या नियोजनात मात्र पालिका अपयशी ठरली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून पालिकेने मोरबे ते कळंबोली व पूर्ण शहरात पाइपलाइन टाकली आहे. परंतु यानंतरही प्रचंड पाणीगळती सुरू आहे. लाखो लिटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्यास प्रशासनास अपयश आले आहे. दहा वर्षांत पालिकेचे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई करावी अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा म्हात्रे यांनी दिला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही पालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिकेने २०० कोटी रुपये खर्च करून पाइपलाइन टाकली आहे. परंतु नवीन पाइपलाइन टाकल्यानंतर जुने पाइप काढले का, ते कुठे आहेत? अद्याप दिघा व इतर काही परिसरांत पुरेसे पाणी मिळत नाही. स्काडा सिस्टीम सुरू नाही. प्रशासनाने स्काडा सुरू असल्याचे दाखविल्यास नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचे आव्हानही त्यांनी दिले. सभागृह नेते जयवंत सुतार यांनीही शहरातील पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना केल्या. अनेक नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट केले. महापौर सुधाकर सोनावणे यांनीही सर्व नगरसेवकांच्या मतांचा विचार करून प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केल्या.