शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
3
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
4
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
5
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
6
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
7
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
8
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
9
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
10
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
11
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
12
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
13
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
14
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
15
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
16
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
17
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
18
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
19
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
20
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या

पालिकेत ‘पाणी वाचवा’चा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2015 00:02 IST

स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे शहरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. मोठ्याप्रमाणात पाणीगळती सुरू असून ती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे

नवी मुंबई : स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे शहरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. मोठ्याप्रमाणात पाणीगळती सुरू असून ती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाणीगळती व चोरीची चाौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये केली आहे. काँगे्रस नगरसेविका मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांनी नवी मुंबईमधील पाण्याच्या उधळपट्टीविषयी व पाणी गळतीविषयी लक्षवेधी मांडली होती. दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या लक्षवेधीवर गुरुवारी चर्चा करण्यात आली. स्वच्छतेविषयी नवी मुंबईला देशात तिसरा व राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. परंतु पाण्याच्या नियोजनात मात्र पालिका अपयशी ठरली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून पालिकेने मोरबे ते कळंबोली व पूर्ण शहरात पाइपलाइन टाकली आहे. परंतु यानंतरही प्रचंड पाणीगळती सुरू आहे. लाखो लिटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्यास प्रशासनास अपयश आले आहे. दहा वर्षांत पालिकेचे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई करावी अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा म्हात्रे यांनी दिला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही पालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिकेने २०० कोटी रुपये खर्च करून पाइपलाइन टाकली आहे. परंतु नवीन पाइपलाइन टाकल्यानंतर जुने पाइप काढले का, ते कुठे आहेत? अद्याप दिघा व इतर काही परिसरांत पुरेसे पाणी मिळत नाही. स्काडा सिस्टीम सुरू नाही. प्रशासनाने स्काडा सुरू असल्याचे दाखविल्यास नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचे आव्हानही त्यांनी दिले. सभागृह नेते जयवंत सुतार यांनीही शहरातील पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना केल्या. अनेक नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट केले. महापौर सुधाकर सोनावणे यांनीही सर्व नगरसेवकांच्या मतांचा विचार करून प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केल्या.