शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

‘संथारा’ प्रथेवरील बंदी हटवण्यासाठी मूक मोर्चा

By admin | Updated: August 25, 2015 01:01 IST

‘संथारा’ प्रथेवर राजस्थान उच्च न्यायालयाने आणलेली बंदी उठवण्यासाठी सोमवारी देशभर जैन समाजाने मूक मोर्चा काढला. त्यानुसार नवी मुंबईतही वाशी ते कोपर

नवी मुंबई : ‘संथारा’ प्रथेवर राजस्थान उच्च न्यायालयाने आणलेली बंदी उठवण्यासाठी सोमवारी देशभर जैन समाजाने मूक मोर्चा काढला. त्यानुसार नवी मुंबईतही वाशी ते कोपरखैरणेदरम्यान मूक मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये जैन समाजाच्या शेकडो बांधवांनी सहभाग घेतला होता. सल्लेखना/ संथारा ही आत्महत्या नसून धर्म साधना असल्याची भावना जैन समाजात आहे. त्यानुसार जीवनाच्या अखेरच्या क्षणी अन्नत्याग करून मृत्यू स्वीकारण्याची प्रथा जैन धर्माच्या सर्वच समाजात आहेत. परंतु राजस्थानच्या उच्च न्यायालयाने संथारा प्रथेला आत्महत्या ठरवत त्यावर बंदी आणली आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी जैन समाजाच्या वतीने देशभर मूक आंदोलन करण्यात आले. संथारावर लादलेल्या बंदीचा फेरविचार व्हावा असे जैन धर्माच्या दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथी या जैन धर्मातील सर्वच समाजाचे म्हणणे आहे. यानुसार त्यांच्या भावना शासनापर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शेकडो जैन बांधवांनी सहभाग घेतला होता. वाशीतील जैन मंदिरातून निघालेला हा मूक मोर्चा वाशी शिवाजी चौक येथून कोपरखैरणेपर्यंत पायी चालत काढण्यात आला. त्यामध्ये माजी खासदार संजीव नाईक यांनीही जैन धर्मीयांना पाठिंबा दर्शवत मूक मोर्चात सहभाग घेतला. मूक मोर्चाच्या या पदयात्रेत लहान मुलांसह, तरुण, ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या.सल्लेखना/ संथारा ही जैन धर्माची साधना मानले जाते. सूक्ष्म जीवालाही आघात होवू नये अशी जैन धर्माची भावना असते. परंतु जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत धर्माचे साधक राहण्यासाठी स्वईच्छेने अनेक जण संथारा करतात. ही आत्महत्या किंवा इच्छामरण नसल्याचे समाजाचे म्हणणे आहे. परंतु याची प्रक्रिया व उद्देश समजून न घेताच राजस्थान न्यायालयाने त्यावर बंदीचा घेतलेला निर्णय जैन समाजावर अन्यायकारक असल्याचेही समाज प्रमुखांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निर्णयावर न्यायालयाने फेरविचार घ्यावा याकरिता जैन समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शांतीनाथ जांगडे, लवकेश जैन, प्रवीण शहा, राजेश शहा, नरेशभाई संघवी, अशोक डांगी, राजावत, सुभाष मगदूम, नीलेश गाला आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कोपरखैरणे सेक्टर २ येथून बसद्वारे हा मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. त्याठिकाणी समाजाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. संथारा ही आत्महत्या नसून धर्माचे वृत असल्याने त्यावरील बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)