शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

‘संथारा’ प्रथेवरील बंदी हटवण्यासाठी मूक मोर्चा

By admin | Updated: August 25, 2015 01:01 IST

‘संथारा’ प्रथेवर राजस्थान उच्च न्यायालयाने आणलेली बंदी उठवण्यासाठी सोमवारी देशभर जैन समाजाने मूक मोर्चा काढला. त्यानुसार नवी मुंबईतही वाशी ते कोपर

नवी मुंबई : ‘संथारा’ प्रथेवर राजस्थान उच्च न्यायालयाने आणलेली बंदी उठवण्यासाठी सोमवारी देशभर जैन समाजाने मूक मोर्चा काढला. त्यानुसार नवी मुंबईतही वाशी ते कोपरखैरणेदरम्यान मूक मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये जैन समाजाच्या शेकडो बांधवांनी सहभाग घेतला होता. सल्लेखना/ संथारा ही आत्महत्या नसून धर्म साधना असल्याची भावना जैन समाजात आहे. त्यानुसार जीवनाच्या अखेरच्या क्षणी अन्नत्याग करून मृत्यू स्वीकारण्याची प्रथा जैन धर्माच्या सर्वच समाजात आहेत. परंतु राजस्थानच्या उच्च न्यायालयाने संथारा प्रथेला आत्महत्या ठरवत त्यावर बंदी आणली आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी जैन समाजाच्या वतीने देशभर मूक आंदोलन करण्यात आले. संथारावर लादलेल्या बंदीचा फेरविचार व्हावा असे जैन धर्माच्या दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथी या जैन धर्मातील सर्वच समाजाचे म्हणणे आहे. यानुसार त्यांच्या भावना शासनापर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने हा मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शेकडो जैन बांधवांनी सहभाग घेतला होता. वाशीतील जैन मंदिरातून निघालेला हा मूक मोर्चा वाशी शिवाजी चौक येथून कोपरखैरणेपर्यंत पायी चालत काढण्यात आला. त्यामध्ये माजी खासदार संजीव नाईक यांनीही जैन धर्मीयांना पाठिंबा दर्शवत मूक मोर्चात सहभाग घेतला. मूक मोर्चाच्या या पदयात्रेत लहान मुलांसह, तरुण, ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या.सल्लेखना/ संथारा ही जैन धर्माची साधना मानले जाते. सूक्ष्म जीवालाही आघात होवू नये अशी जैन धर्माची भावना असते. परंतु जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत धर्माचे साधक राहण्यासाठी स्वईच्छेने अनेक जण संथारा करतात. ही आत्महत्या किंवा इच्छामरण नसल्याचे समाजाचे म्हणणे आहे. परंतु याची प्रक्रिया व उद्देश समजून न घेताच राजस्थान न्यायालयाने त्यावर बंदीचा घेतलेला निर्णय जैन समाजावर अन्यायकारक असल्याचेही समाज प्रमुखांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निर्णयावर न्यायालयाने फेरविचार घ्यावा याकरिता जैन समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शांतीनाथ जांगडे, लवकेश जैन, प्रवीण शहा, राजेश शहा, नरेशभाई संघवी, अशोक डांगी, राजावत, सुभाष मगदूम, नीलेश गाला आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कोपरखैरणे सेक्टर २ येथून बसद्वारे हा मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. त्याठिकाणी समाजाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. संथारा ही आत्महत्या नसून धर्माचे वृत असल्याने त्यावरील बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)