शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात जवानांचे कवच

By admin | Updated: August 21, 2015 23:43 IST

सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी ६० जवानांचे कवच लवकरच जिल्ह्यात निर्माण करण्यात येणार असून त्यांना सरकारकडून घसघशीत मानधनही देण्यात येणार आहे

आविष्कार देसाई, अलिबागसागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी ६० जवानांचे कवच लवकरच जिल्ह्यात निर्माण करण्यात येणार असून त्यांना सरकारकडून घसघशीत मानधनही देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील २० लॅण्डिंग पॉइंट्स सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशिल असल्याचे नौदलाने घोषित केले आहे. पैकी १४ लॅण्डिंग पॉइंट्सचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित सहा लॅण्डिंग पॉइंट्सचे सर्वेक्षण अद्याप होणे बाकी आहे. याच ठिकाणी सुरक्षा रक्षक चोवीस तास सागरी किनारपट्टीचे रक्षण करणार आहेत.रायगड जिल्ह्याला १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा काळा इतिहास आहे. श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी समुद्रकिनारी आरडीएक्स उतरविण्यात आले होते. या कारणाने राष्ट्रीय सुरक्षेसाठी सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याचे सरकारच्या लक्षात आले. त्यानुसार जिल्ह्यात अस्तित्वात असणाऱ्या सुमारे अडीच हजार सागरी सुरक्षा दलाच्या बरोबरीनेच आता सागरी सुरक्षा रक्षक काम करणार आहेत.रायगड जिल्हा हा मुंबईला अगदी खेटून असणारा जिल्हा आहे. समुद्रमार्गे हे अंतर फक्त १८ किलोमीटर एवढे आहे. नौदलाने राज्याच्या ७२० सागरी किनारपट्टींचे सर्वेक्षण केले असून त्यापैकी रायगड जिल्ह्यातील २० लॅण्डिंग पॉइंट्स अतिसंवेदनशिल घोषित केले आहेत. एका लॅण्डिंग पॉइंटवर तीन याप्रमाणे येथे ६० सुरक्षा रक्षकांची गरज भासणार आहे. सुरक्षा रक्षकांना घसघशीत १४ हजार रुपयांचे तर, पर्यवेक्षकांना सुमारे १६ हजार रुपयांचे मानधन सरकारकडून देण्यात येणार आहे. जिल्हा सुरक्षा मंडळ या बाह्य यंत्रणेद्वारे ६० सुरक्षा रक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. तीन पाळ््यांमध्ये सुरक्षा रक्षक सागरी किनारपट्टीवर लक्ष ठेवणार आहेत. नौदल, तटरक्षक दल, पोलीस आणि मत्स्य विभाग यांनी संयुक्तपणे १४ लॅण्डिंग पॉइंट्सचे सर्वेक्षण पूर्ण केले आहेत. सहा लॅण्डिंग पॉइंट्सचे सर्वेक्षण होणे बाकी असून ते सर्व श्रीवर्धन तालुक्यातील असल्याची माहिती मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश नाखवा यांनी लोकमतशी बोलताना दिली.सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याच्या प्रक्रियेला गती प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.