शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात जवानांचे कवच

By admin | Updated: August 21, 2015 23:43 IST

सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी ६० जवानांचे कवच लवकरच जिल्ह्यात निर्माण करण्यात येणार असून त्यांना सरकारकडून घसघशीत मानधनही देण्यात येणार आहे

आविष्कार देसाई, अलिबागसागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी ६० जवानांचे कवच लवकरच जिल्ह्यात निर्माण करण्यात येणार असून त्यांना सरकारकडून घसघशीत मानधनही देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील २० लॅण्डिंग पॉइंट्स सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशिल असल्याचे नौदलाने घोषित केले आहे. पैकी १४ लॅण्डिंग पॉइंट्सचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित सहा लॅण्डिंग पॉइंट्सचे सर्वेक्षण अद्याप होणे बाकी आहे. याच ठिकाणी सुरक्षा रक्षक चोवीस तास सागरी किनारपट्टीचे रक्षण करणार आहेत.रायगड जिल्ह्याला १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा काळा इतिहास आहे. श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी समुद्रकिनारी आरडीएक्स उतरविण्यात आले होते. या कारणाने राष्ट्रीय सुरक्षेसाठी सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याचे सरकारच्या लक्षात आले. त्यानुसार जिल्ह्यात अस्तित्वात असणाऱ्या सुमारे अडीच हजार सागरी सुरक्षा दलाच्या बरोबरीनेच आता सागरी सुरक्षा रक्षक काम करणार आहेत.रायगड जिल्हा हा मुंबईला अगदी खेटून असणारा जिल्हा आहे. समुद्रमार्गे हे अंतर फक्त १८ किलोमीटर एवढे आहे. नौदलाने राज्याच्या ७२० सागरी किनारपट्टींचे सर्वेक्षण केले असून त्यापैकी रायगड जिल्ह्यातील २० लॅण्डिंग पॉइंट्स अतिसंवेदनशिल घोषित केले आहेत. एका लॅण्डिंग पॉइंटवर तीन याप्रमाणे येथे ६० सुरक्षा रक्षकांची गरज भासणार आहे. सुरक्षा रक्षकांना घसघशीत १४ हजार रुपयांचे तर, पर्यवेक्षकांना सुमारे १६ हजार रुपयांचे मानधन सरकारकडून देण्यात येणार आहे. जिल्हा सुरक्षा मंडळ या बाह्य यंत्रणेद्वारे ६० सुरक्षा रक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. तीन पाळ््यांमध्ये सुरक्षा रक्षक सागरी किनारपट्टीवर लक्ष ठेवणार आहेत. नौदल, तटरक्षक दल, पोलीस आणि मत्स्य विभाग यांनी संयुक्तपणे १४ लॅण्डिंग पॉइंट्सचे सर्वेक्षण पूर्ण केले आहेत. सहा लॅण्डिंग पॉइंट्सचे सर्वेक्षण होणे बाकी असून ते सर्व श्रीवर्धन तालुक्यातील असल्याची माहिती मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश नाखवा यांनी लोकमतशी बोलताना दिली.सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याच्या प्रक्रियेला गती प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.