शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त नवी मुंबईच्या आश्रयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 03:13 IST

दुष्काळाने आमच्यावर उपासमारीची वेळ आली बाबा... आमच्या मुलांच्या शिक्षणाचं बी दिवाळं निघालं... समदी शेती कोरडी पडली...विहिरी, नद्या कोरड्या ठाक झाल्या...

वैभव गायकर,पनवेलगावात पिण्यासाठी पाणी नाही...मून आम्ही इतं या शहरात आलो...दोन वेळ पोट भरलं तरी खूप हाय... जागा मिळतं तेथं रात्र काढतो..रोजंदारी करून मिळतं ते काम करत आम्ही दिवस पुढे ढकलत हाव... ही व्यथा मांडली आहे बीड जिल्ह्यातील अष्टी तालुक्यात असलेल्या मैदा गावातून स्थलांतरित झालेल्या सचिन दहिफळे यांनी.राज्यभरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असून सर्वात जास्त नुकसान शेतीचे झाले आहे. मराठवाडा, विदर्भात दुष्काळ असून हाताला काहीही काम मिळत नसल्याने अनेकांनी शहरांची वाट धरली आहे. रोजगार व कामधंद्यांच्या शोधात दुष्काळग्रस्त नवी मुंबई स्थलांतरित झाले असून मिळेत ते काम करताना दिसून येत आहेत. काही दुष्काळग्रस्त नवी मुंबईतील आपल्या नातेवाइकांकडे राहत आहेत तर काही जण रेल्वे स्थानक, बस डेपोमध्ये वास्तव्य करत आहेत.एकट्या बीड जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त गावातील रहिवासी नवी मुंबईत स्थलांतरित झाले आहेत. एकट्या नवी मुंबईत चार ते पाच हजार दुष्काळग्रस्त आले आहेत.गावात पाणी नसल्याने शेती तसेच सर्वच प्रकारची कामे ठप्प झाली आहेत. कर्ज घेवून पिकवलेली शेती पाण्याअभावी वाळून गेली. पिण्याच्या पाण्यासाठी ५ ते १० किमीची पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळ आणि वाढत्या समस्या पाहता दुष्काळग्रस्तांनी थेट नवी मुंबईत स्थलांतर केले आहे. वाशी, नेरूळ, खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेलसारख्या शहरात रोजगाराच्या संधी शोधत आहेत. जवळपास ५० कुटुंबे याठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या अशी मागणी ते करीत आहेत. सध्या रसवंतीच्या गाड्या चालवून काही जण आपला उदरनिर्वाह करीत आहेत, तर काही जण रोजंदारीची मजुरी काम करून पोटाची खळगी भरत आहेत. महिलांनी देखील यामध्ये पुढाकार घेतला असून पुरु षांच्या खांद्याला खांदा लावून त्या मेहनत करताना दिसत आहेत. जालना जिल्ह्यातून रांजणी या गावात शेतमजुरी करणारे विठ्ठल पाटोळे हे देखील मागील तीन महिन्यांपासून जुई कामोठे याठिकाणी राहत आहेत. दुष्काळामुळे रोजंदारी नसल्याने या ठिकाणी आल्याचे त्यांनी सांगितलं. सोबत दोन मुली, पत्नी असे त्यांचे कुटुंब आहे. जुई गावात भाड्याच्या खोलीत राहून सध्या उसाची रसवंती चालवत आहेत. लाकडी चरख्याद्वारे उसाचा रस काढून दिवसाला ३०० ते ४०० रुपये रोजगार मिळवत आहेत. दुष्काळाचे सावट दूर झाले की आम्ही याठिकाणाहून पुन्हा आमच्या गावी जावू, मात्र गावची परिस्थिती हलाखीची असल्याने आम्ही नाईलाजास्तव याठिकाणी राहत आहोत, असेही ते म्हणाले.