शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

सातबाऱ्यातून परस्पर शेतकऱ्यांची नावे गायब

By admin | Updated: August 8, 2016 02:48 IST

वाघिवलीमधील ६६ शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी समोर येवू लागल्या आहेत. १९५७ च्या जागी १९५२ असा उल्लेख करून कुळांची नावे सातबारा उताऱ्यावरून कमी केली आहेत

नामदेव मोरे, नवी मुंबईवाघिवलीमधील ६६ शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी अनेक धक्कादायक गोष्टी समोर येवू लागल्या आहेत. १९५७ च्या जागी १९५२ असा उल्लेख करून कुळांची नावे सातबारा उताऱ्यावरून कमी केली आहेत. सिडकोने या परिसरातील जमीन फेब्रुवारी १९९९ मध्ये भूसंपादनातून वगळली व सहा महिन्यात पुन्हा संपादित केली असल्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून न्याय देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागितल्यामुळे वाघिवली गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ज्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संघर्ष करून कूळ कायदा बनविण्यास सरकारला भाग पाडले, त्याच जिल्ह्याचा भाग असलेल्या वाघिवली गावातील ६६ कुळांना भूमिहीन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे १९५७ मध्ये कुळांची वहिवाट निराळी असल्याने कुळांचा हिस्सा वेगळा केला असल्याचा उल्लेख आहे. परंतु नंतर १९५७ च्या ठिकाणी खाडाखोड करून १९५२ असा उल्लेख केला आहे. यानंतर शेतकरी जमीन कसत नसल्याचे कारण देवून त्यांचे कूळ म्हणून नाव वगळण्यात आले आहे. यानंतर शासनाने नवी मुंबई वसविण्यासाठी ९५ गावांमधील सर्व जमीन संपादित केली. यामध्ये वाघिवलीमधील १५२ एकर जमीनही घेतली होती. ७ डिसेंबर ७० मध्ये सातबारा उताऱ्यावर त्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर जवळपास २९ वर्षांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये ही जमीन संपादनातून वगळण्यात आली. भूसंपादनाचा शिक्का वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाने जमीन संपादनातून वगळली व जुलैमध्ये ती मुंदडा यांच्या वारसदारांच्या नावावर केली. परंतु मार्चमध्ये पुन्हा ही जमीन संपादित करण्याची नोटीस काढण्यात आली. याविषयी संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून नोव्हेंबर २००० मध्ये पुन्हा संपादित केली आहे. संरक्षित कुळांची नावे वगळणे, जमिनीचे संपादन, पुन्हा भूसंपादन रद्द करून एक वर्षात पुन्हा जमीन ताब्यात घेण्याचा एकूण व्यवहार संशयास्पद असून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठीचा कट असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सिडकोने १९७० मध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली त्या सर्वांना अद्याप साडेबारा टक्के योजनेचे भूखंड वाटप केलेले नाहीत. जमीन उपलब्ध नाही, जमिनीवर अतिक्रमण असल्याचे सांगून शेतकऱ्यांना भूखंड वाटपात दिरंगाई केली जात आहे. परंतु वाघिवली प्रकरणामध्ये जमीन संपादित केल्यानंतर ९ वर्षांमध्येच साडेबारा टक्के योजनेचे भूखंड संबंधितांना देण्यात आले. विशेष म्हणजे इतर सर्व प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या गावाला लागून भूखंड दिले जात असताना रायगड जिल्ह्यातील या गावातील भूखंड ठाणे जिल्ह्यात समावेश असलेल्या बेलापूरमध्ये भूखंड दिले आहेत. अशिक्षित व अल्पशिक्षित शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. १९७० मध्ये शासनाने नवी मुंबई प्रकल्पासाठी ही जमीन संपादित केली३ फेब्रुवारी १९९९ मध्ये शासनाने ही जमीन संपादनातून वगळलीमार्च २००० मध्ये पुन्हा जमीन संपादन करण्याची कार्यवाही सुरू नोव्हेंबर २००० मध्ये शासनाने पुन्हा जमीन संपादित केलीएप्रिल २००७ ते २00९ मध्ये साडेबारा टक्केचे भूखंड कुळांऐवजी त्यांच्या मालकांना मंजूरभूखंड मंजूर होताच त्रिपक्षीय करार करून तो विकासाला देण्यात आला वाघिवलीमधील शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार केलीविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंंडकर यांनी लक्षवेधी मांडून चौकशीची मागणी केलीसिडकोने २०१४ मध्ये विकासकास कारणे दाखवा नोटीस काढली२०१५ मध्ये सिडकोने या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.