शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कलम ३७० रद्द करण्याची पद्धत चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:01 IST

असीम सरोदे यांचे मत : पनवेलमध्ये कफच्या माध्यमातून चर्चासत्र

पनवेल : केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. हे कलम रद्द करण्याची पद्धत चुकीची असल्याचे परखड मत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. पनवेलमध्ये कफच्या वतीने भारतीय राज्यघटनेतील कलम ३७0 व ३५ अ यावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये आयोजित चर्चासत्रामध्ये अ‍ॅड. असीम सरोदे यांनी परखड मत व्यक्त केले. भारत-पाक सीमेचा वाद अद्याप युनायटेड नेशनमध्ये प्रलंबित आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रहिवासी ते स्वतंत्र काश्मीरचे रहिवासी असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे कलम ३७० रद्द करून भारताने एकप्रकारे आपली सीमा निश्चित केली आहे. अमेरिका हा देश शस्त्रास्त्र विक्र ीवर चालणार आहे. शस्त्राच्या विक्र ीच्या दृष्टीने अमेरिकेला वाटेल तेव्हा भारतात युद्ध घडवून आणू शकतो. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थी करण्याच्या वक्तव्यावर लक्ष देण्याची गरज नसल्याचे सरोदे यांनी सांगितले. ३७० रद्द करण्याची पद्धत चुकीची असल्याचे सांगतानाच कलम ३५ अ रद्द करण्याच्या निर्णयाला असीम सरोदे यांनी पाठिंबा दिला. चर्चासत्रात सहभागी झालेले अ‍ॅड. महेश विश्वकर्मा यांनी देखील कलम ३७0 संदर्भात सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाल्यावर देशात विविध मतांतरे होती. या मतांना आवर घालणे गरजेचे होते. हैदराबाद, गोव्यासारखी राज्ये भारतात विलीन झाली, मात्र जम्मू काश्मीरचा राजा हरी सिंग यांनी काही अटींवर भारतात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामधील कलम ३७0 हा महत्त्वाचा आहे.

सुरक्षा, संवाद आणि परराष्ट्राच्या नीती आदी अधिकार या राज्याला लागू होते. त्यामुळे काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता. त्यामुळे या ठिकाणी जम्मू काश्मीरचा स्वतंत्र असा झेंडा अस्तित्वात होता. कलम ३७0 रद्द करून काश्मीर खऱ्या अर्थाने भारताकडे आल्याचे विश्वकर्मा यांनी सांगितले. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. या चर्चासत्रात मुलाखतकार म्हणून लोकमतचे मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी भूमिका बजावली. दोन्ही वक्त्यांशी संवाद साधत त्यांनी या कलमांचे बारकावे माहिती करून घेतले.

या चर्चासत्रात उपस्थितांनी सरोदे आणि विश्वकर्मा यांना कलम ३७0 च्या रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल विविध प्रश्न विचारले. यामध्ये हा घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही ? काश्मिरी जनतेवर झालेला हा अन्याय आहे का ? भविष्यात या निर्णयाची अंमलबजावणी कधी होईल ? यूएनमध्ये या निर्णयावर चर्चा होईल का ? काश्मिरी पंडितांचे प्रश्न, लडाख आदींसह विविध विषय उपस्थित करण्यात आले. दोन्हीही वक्त्यांनी याविषयावर उपस्थितांना समाधानकारक उत्तरे दिली. या चर्चासत्रावेळी उपस्थितांमध्ये कफचे अध्यक्ष मनोहर लिमये, उपाध्यक्ष अरु ण भिसे, रंजना सडोलीकर, ओरियन मॉलचे मालक मंगेश परु ळेकर आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Article 370कलम 370