शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
3
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
4
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
5
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
6
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
7
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
8
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
9
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
10
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
11
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
12
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
13
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
14
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
15
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
16
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
17
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
18
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
19
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
20
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला

कलम ३७० रद्द करण्याची पद्धत चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:01 IST

असीम सरोदे यांचे मत : पनवेलमध्ये कफच्या माध्यमातून चर्चासत्र

पनवेल : केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. हे कलम रद्द करण्याची पद्धत चुकीची असल्याचे परखड मत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे. पनवेलमध्ये कफच्या वतीने भारतीय राज्यघटनेतील कलम ३७0 व ३५ अ यावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.

पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये आयोजित चर्चासत्रामध्ये अ‍ॅड. असीम सरोदे यांनी परखड मत व्यक्त केले. भारत-पाक सीमेचा वाद अद्याप युनायटेड नेशनमध्ये प्रलंबित आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रहिवासी ते स्वतंत्र काश्मीरचे रहिवासी असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे कलम ३७० रद्द करून भारताने एकप्रकारे आपली सीमा निश्चित केली आहे. अमेरिका हा देश शस्त्रास्त्र विक्र ीवर चालणार आहे. शस्त्राच्या विक्र ीच्या दृष्टीने अमेरिकेला वाटेल तेव्हा भारतात युद्ध घडवून आणू शकतो. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थी करण्याच्या वक्तव्यावर लक्ष देण्याची गरज नसल्याचे सरोदे यांनी सांगितले. ३७० रद्द करण्याची पद्धत चुकीची असल्याचे सांगतानाच कलम ३५ अ रद्द करण्याच्या निर्णयाला असीम सरोदे यांनी पाठिंबा दिला. चर्चासत्रात सहभागी झालेले अ‍ॅड. महेश विश्वकर्मा यांनी देखील कलम ३७0 संदर्भात सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाल्यावर देशात विविध मतांतरे होती. या मतांना आवर घालणे गरजेचे होते. हैदराबाद, गोव्यासारखी राज्ये भारतात विलीन झाली, मात्र जम्मू काश्मीरचा राजा हरी सिंग यांनी काही अटींवर भारतात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामधील कलम ३७0 हा महत्त्वाचा आहे.

सुरक्षा, संवाद आणि परराष्ट्राच्या नीती आदी अधिकार या राज्याला लागू होते. त्यामुळे काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता. त्यामुळे या ठिकाणी जम्मू काश्मीरचा स्वतंत्र असा झेंडा अस्तित्वात होता. कलम ३७0 रद्द करून काश्मीर खऱ्या अर्थाने भारताकडे आल्याचे विश्वकर्मा यांनी सांगितले. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. या चर्चासत्रात मुलाखतकार म्हणून लोकमतचे मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी भूमिका बजावली. दोन्ही वक्त्यांशी संवाद साधत त्यांनी या कलमांचे बारकावे माहिती करून घेतले.

या चर्चासत्रात उपस्थितांनी सरोदे आणि विश्वकर्मा यांना कलम ३७0 च्या रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल विविध प्रश्न विचारले. यामध्ये हा घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही ? काश्मिरी जनतेवर झालेला हा अन्याय आहे का ? भविष्यात या निर्णयाची अंमलबजावणी कधी होईल ? यूएनमध्ये या निर्णयावर चर्चा होईल का ? काश्मिरी पंडितांचे प्रश्न, लडाख आदींसह विविध विषय उपस्थित करण्यात आले. दोन्हीही वक्त्यांनी याविषयावर उपस्थितांना समाधानकारक उत्तरे दिली. या चर्चासत्रावेळी उपस्थितांमध्ये कफचे अध्यक्ष मनोहर लिमये, उपाध्यक्ष अरु ण भिसे, रंजना सडोलीकर, ओरियन मॉलचे मालक मंगेश परु ळेकर आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Article 370कलम 370