शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

सीवूड स्थानकात प्रवाशांच्या सुविधांना वाटाण्याच्या अक्षता

By admin | Updated: March 25, 2017 01:41 IST

सीवूड रेल्वे स्टेशन इमारतीमधील दुकाने सुरू करण्यात आली असून, मॉल लवकरच खुला केला जाणार आहे.

नवी मुंबई : सीवूड रेल्वे स्टेशन इमारतीमधील दुकाने सुरू करण्यात आली असून, मॉल लवकरच खुला केला जाणार आहे. व्यावसायिक गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या प्रशासनाने प्रवाशांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष केले आहे. वाहनतळ, तिकीट खिडकी व इतर सुविधा देण्यात आलेल्या नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील सर्वात भव्य रेल्वे स्टेशन म्हणून सीवूड ओळखले जाणार आहे. पाच वर्षांपासून रेल्वे स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. एल अँड टीला ठेका देताना सर्वात प्रथम रेल्वे स्टेशन व प्रवाशांसाठीच्या यंत्रणा उभारण्यास प्राधान्य देण्याची अट घातली होती. पण प्रत्यक्षात प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. व्यावसायिक इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीसाठी तात्पुरते भोगवटा प्रमाणपत्र घेतले असून २३ मार्चला १५ दुकाने सुरू करण्यात आली आहेत. बिग बाजार मॉल लवकरच सुरू केला जाणार आहे. गुरूवारी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रशासनाने केलेल्या घाईमुळे रेल्वे प्रवाशांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सीवूडमधील नागरिक अनेक वर्षांपासून गैरसोय सहन करत आहेत. सिडकोने प्रथम तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे स्थानक उभारले, पण प्रत्यक्षात तिथे रेल्वे थांबत नसल्याने रहिवाशांना आंदोलन करावे लागले. आंदोलनानंतर स्थानक सुरू केले. पण चार ते पाच वर्षांमध्ये तिथे भव्य रेल्वे स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन स्थानकासाठीचे काम सुरू केल्यानंतर दोन्ही बाजूला फक्त एका बाजूने रेल्वे स्टेशनमध्ये जाण्याचा मार्ग ठेवण्यात आला. यामुळे प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागले. रेल्वे स्टेशन इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यानंतर पाच वर्षे झाली तरीही अद्याप रेल्वे प्लॅटफॉर्मकडे जाण्यासाठी योग्य प्रवेशद्वार तयार केलेले नाहीत. ज्येष्ठ नागरिक, अपंगांची गैरसोय होत आहे. प्रवाशांनी अजून किती वर्षे गैरसोय सहन करायची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रेल्वे स्टेशन इमारतीमध्ये कामे मिळविण्यासाठी सर्वजण भांडत आहेत. पण प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी मात्र कोणीही फारसे प्रयत्न करत नाही. प्रत्येक जण राजकीय पद व वशिलेबाजी करून काही जण दमदाटी करून छोटी - मोठी कामे मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वत:ला कामे मिळाली की प्रवाशांच्या सुविधांकडे मात्र कोणीच लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. (प्रतिनिधी)