शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

खारफुटीला लावली आग

By admin | Updated: February 29, 2016 02:15 IST

पनवेलमधील विमानतळ परिसरात जंगलास आग लावून खारफुटी नष्ट केली जात आहे. चार ते पाच एकर परिसरातील जंगल नष्ट केले असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली

नामदेव मोरे,  नवी मुंबईपनवेलमधील विमानतळ परिसरात जंगलास आग लावून खारफुटी नष्ट केली जात आहे. चार ते पाच एकर परिसरातील जंगल नष्ट केले असल्याने पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. खारफुटीचे जंगल हे खाडी किनारी वसलेल्या शहरांची कवचकुंडले म्हणून ओळखली जातात. त्सुनामी व इतर वादळांच्या दरम्यान समुद्राचे पाणी शहरात जाण्यापासून रक्षण केले जाते. याशिवाय वातावरणातील कार्बन वेगळा करण्याचेही महत्त्वाचे काम केले जाते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ४७६७ हेक्टर जमिनीवर खारफुटीचे जंगल आहे. त्यापासून प्रतिवर्षी जवळपास ३ दशलक्ष मेट्रिक टन कार्बन वेगळा केला जात आहे. नवी मुंबईमध्ये पर्यावरणप्रेमींच्या दक्षतेमुळे खारफुटीचे रक्षण केले जात आहे. परंतु पनवेल परिसरात विकासाच्या नावाखाली खारफुटी नष्ट केली जात आहे. सिडकोच्या प्रस्तावित विमानतळासाठी तब्बल ६१५ हेक्टर जमिनीवरील ( त्यामधील २५० हेक्टर दाट जंगल) खारफुटी हटविली जाणार आहे. पर्यावरण विभागाने येथील वृक्षांची इतर ठिकाणी लागवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिडकोनेही वाघीवली बेटावर २४५ हेक्टर जमिनीवर व कामोठेमध्ये ३१० हेक्टर जमिनीवर मँग्रोज पार्क उभारण्याची घोषणा केली आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र विमानतळ परिसरातील जंगल नष्ट करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. खारफुटीला आग लावली जात आहे. आगीमध्ये अर्धवट जळालेले वृक्ष तोडून नेले जात आहेत. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराकडे वनविभाग व सिडको प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. विमानतळ परिसरातील चिंचपाडा गावच्या हद्दीत १५ दिवसामध्ये खारफुटीची कत्तल सुरू झाली आहे. सर्वप्रथम जंगलास आग लावून वृक्ष सुकवले जात आहेत. सुकलेले वृक्ष तोडून मैदान तयार केले जात आहे. दोन आठवड्यात जवळपास ५ ते ६ एकर जमिनीवरील खारफुटी नष्ट केली आहे. पर्यावरणाचा सुरू असलेला ऱ्हास रोखण्यासाठी सिडको व वनविभागाचे कर्मचारी काहीच उपाययोजना करत नाहीत. पनवेल तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली खारफुटी नष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक ठिकाणी डेब्रिज टाकून तर काही ठिकाणी वृक्षतोड सुरू आहे. मोठ्या प्रमाणातील जंगल विमानतळासाठी व उरलेले विकासाच्या नावाखाली नष्ट केले जात आहेत. यामुळे भविष्यात त्सुनामीसारखी वादळे आल्यास पूर्ण पनवेल तालुका पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय जंगलच राहिले नाही तर प्रदूषण थांबवायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.विमानतळाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. चिंचपाडा परिसरातील खारफुटी जाळून नष्ट केल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. सिडको, वनविभाग व इतर विभागांमधील कोणाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झाला असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. - सुकुमार किल्लेदार, अध्यक्षसेव्ह मँग्रोज अँड नवी मुंबई एक्झिस्टंस