शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

संभाजीराजेंची भाषणाची संधी वगळली

By admin | Updated: January 25, 2016 02:44 IST

रायगड महोत्सव साजरा करताना शासनाने येथील सर्व जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपवली होती. यामुळे महोत्सव जरी शासनाचा असला तरी मनमानी मात्र

संदीप जाधव ,  महाड/दासगाव रायगड महोत्सव साजरा करताना शासनाने येथील सर्व जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपवली होती. यामुळे महोत्सव जरी शासनाचा असला तरी मनमानी मात्र ठेकेदाराची चालली. यामुळे रायगड महोत्सवाच्या प्रारंभीपासूनच मान्यवरांना भाषणाची संधी न देणे, स्थानिकांना विश्वासात न घेणे, स्थानिक माध्यमांना बरोबर न घेणे असे प्रकार दिसून आले. उद्घाटन सोहळ्यात माजी मंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री प्रकाश महेता, स्थानिक आमदार भरत गोगावले, शेकाप नेते जयंत पाटील यांना व्यासपीठावर बसवूनही त्यांना बोलण्याची संधी न देता आयोजकांनी त्यांचा अवमानच केला. तर ज्या गावात हा कार्यक्र म पार पडत होता त्या पाचाड गावच्या सरपंच ज्योती गायकवाड यांना व्यासपीठावरही बोलावण्यात आले नाही. हेच सत्र समारोपाच्या कार्यक्र मातही सुरू राहिले. समारोप सोहळ्याला आयोजकांनी कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना निमंत्रित केले होते. त्यांना व्यासपीठावर बोलावण्यातही आले, मात्र बोलण्याची संधी दिली नाही. यामुळे संतप्त झालेल्या संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांची गाडी अडवली. तावडे यांना धारेवर धरून जाहीर माफी मागण्यास भाग पाडले. हीच स्थिती अन्य मान्यवरांच्या बाबतीतदेखील घडली. व्यासपीठावर बसलेल्या विधान परिषद सभापती हरीभाऊ बागडे यांनादेखील भाषणाची संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.