शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

संभाजीराजेंची भाषणाची संधी वगळली

By admin | Updated: January 25, 2016 02:44 IST

रायगड महोत्सव साजरा करताना शासनाने येथील सर्व जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपवली होती. यामुळे महोत्सव जरी शासनाचा असला तरी मनमानी मात्र

संदीप जाधव ,  महाड/दासगाव रायगड महोत्सव साजरा करताना शासनाने येथील सर्व जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपवली होती. यामुळे महोत्सव जरी शासनाचा असला तरी मनमानी मात्र ठेकेदाराची चालली. यामुळे रायगड महोत्सवाच्या प्रारंभीपासूनच मान्यवरांना भाषणाची संधी न देणे, स्थानिकांना विश्वासात न घेणे, स्थानिक माध्यमांना बरोबर न घेणे असे प्रकार दिसून आले. उद्घाटन सोहळ्यात माजी मंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री प्रकाश महेता, स्थानिक आमदार भरत गोगावले, शेकाप नेते जयंत पाटील यांना व्यासपीठावर बसवूनही त्यांना बोलण्याची संधी न देता आयोजकांनी त्यांचा अवमानच केला. तर ज्या गावात हा कार्यक्र म पार पडत होता त्या पाचाड गावच्या सरपंच ज्योती गायकवाड यांना व्यासपीठावरही बोलावण्यात आले नाही. हेच सत्र समारोपाच्या कार्यक्र मातही सुरू राहिले. समारोप सोहळ्याला आयोजकांनी कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना निमंत्रित केले होते. त्यांना व्यासपीठावर बोलावण्यातही आले, मात्र बोलण्याची संधी दिली नाही. यामुळे संतप्त झालेल्या संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांची गाडी अडवली. तावडे यांना धारेवर धरून जाहीर माफी मागण्यास भाग पाडले. हीच स्थिती अन्य मान्यवरांच्या बाबतीतदेखील घडली. व्यासपीठावर बसलेल्या विधान परिषद सभापती हरीभाऊ बागडे यांनादेखील भाषणाची संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.