शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेबाबत ग्रामविकासाची कुरघोडी

By admin | Updated: September 13, 2016 02:40 IST

प्रस्तावित पनवेल महापालिकेत पनवेल शहर, सिडको वसाहती आणि ३२ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कळंबोली : प्रस्तावित पनवेल महापालिकेत पनवेल शहर, सिडको वसाहती आणि ३२ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुचित करण्यात आले आहे. मात्र ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला स्वतंत्र आदेश निर्गमीत केले आहे. महापालिकेत समाविष्ठ करण्यात आलेल्या गावांची ग्रामसभा घेवून त्यांचे मत घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.प्रस्तावित पनवेल महापालिकेला निवडणूक आयोगाकडून तांत्रिकदृष्टया विरोध होत होता. पनवेल नगरपालिकेच्या प्रभागरचनेला कोकण विभागीय आयुक्तांनी अंतिम मंजुरी दिल्यामुळे महापालिका रेंगळणार असे चित्र निर्माण झाले होते. याबाबत भाजपचे स्थानिक नेते श्रीनंद पटवर्धन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून महापालिकेच्या किती गरजेची आहे, हे स्पष्ट केले आहे. त्यानुसार आठ दिवसाच्या आत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिले. नगविकास विभागाने नैना क्षेत्रातील ३६ गावे वगळून पनवेल नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्तांना पुढील कार्यवाही करण्याबाबत आदेश निर्गमीत केले. नगरविकास विभागाच्या पत्रानुसार कोकण विभागीय आयुक्तांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश देऊन समाविष्ठ करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घेण्याबाबत सुचीत केले. १ आॅक्टोबरपासून महापािलका होण्यासंदर्भात राज्यपालांनी आदेश दिले आहे. त्यानुसार कार्यवाहीही सुरू झाली आहे. मात्र त्यानंतर ग्रामविकास विभागाने २१ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश पारीत केले आहेत. त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व पद रद्द होणार आहे. त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता त्याचबरोबर सदस्यत्व रद्द होत असल्याबद्ल अभिप्राय कळवावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पनवेल महानगरपालिकेत समाविष्ठ करण्यात येणाऱ्या ३२ गावांच्या ग्रामपंचायतीच्या मासिक व ग्रामसभेचे ठराव त्याचबरोबर रायगड जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव पाठविण्याचे सुचीत करण्यात आले आहे. सदर गावचे क्षेत्र समाविष्ठ न करण्याबाबत ग्रामसभेचा आणि ग्रामपंचायत ठराव संमत करण्यात आल्यास त्याबाबत संबंधीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद स्थायी समितीचा संयुक्तिक समर्थन अभिप्राय देण्यास कळविण्यात आले आहे. याकरीता आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची पुर्तता करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मात्र असे असताना ग्रामविकास विभागाने निर्णय झाल्यानंतर ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचे ठराव मागितल्याने संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.