शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

महापालिकेबाबत ग्रामविकासाची कुरघोडी

By admin | Updated: September 13, 2016 02:40 IST

प्रस्तावित पनवेल महापालिकेत पनवेल शहर, सिडको वसाहती आणि ३२ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कळंबोली : प्रस्तावित पनवेल महापालिकेत पनवेल शहर, सिडको वसाहती आणि ३२ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुचित करण्यात आले आहे. मात्र ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला स्वतंत्र आदेश निर्गमीत केले आहे. महापालिकेत समाविष्ठ करण्यात आलेल्या गावांची ग्रामसभा घेवून त्यांचे मत घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.प्रस्तावित पनवेल महापालिकेला निवडणूक आयोगाकडून तांत्रिकदृष्टया विरोध होत होता. पनवेल नगरपालिकेच्या प्रभागरचनेला कोकण विभागीय आयुक्तांनी अंतिम मंजुरी दिल्यामुळे महापालिका रेंगळणार असे चित्र निर्माण झाले होते. याबाबत भाजपचे स्थानिक नेते श्रीनंद पटवर्धन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून महापालिकेच्या किती गरजेची आहे, हे स्पष्ट केले आहे. त्यानुसार आठ दिवसाच्या आत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य शासनाला दिले. नगविकास विभागाने नैना क्षेत्रातील ३६ गावे वगळून पनवेल नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्तांना पुढील कार्यवाही करण्याबाबत आदेश निर्गमीत केले. नगरविकास विभागाच्या पत्रानुसार कोकण विभागीय आयुक्तांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश देऊन समाविष्ठ करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घेण्याबाबत सुचीत केले. १ आॅक्टोबरपासून महापािलका होण्यासंदर्भात राज्यपालांनी आदेश दिले आहे. त्यानुसार कार्यवाहीही सुरू झाली आहे. मात्र त्यानंतर ग्रामविकास विभागाने २१ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश पारीत केले आहेत. त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व पद रद्द होणार आहे. त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता त्याचबरोबर सदस्यत्व रद्द होत असल्याबद्ल अभिप्राय कळवावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पनवेल महानगरपालिकेत समाविष्ठ करण्यात येणाऱ्या ३२ गावांच्या ग्रामपंचायतीच्या मासिक व ग्रामसभेचे ठराव त्याचबरोबर रायगड जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव पाठविण्याचे सुचीत करण्यात आले आहे. सदर गावचे क्षेत्र समाविष्ठ न करण्याबाबत ग्रामसभेचा आणि ग्रामपंचायत ठराव संमत करण्यात आल्यास त्याबाबत संबंधीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद स्थायी समितीचा संयुक्तिक समर्थन अभिप्राय देण्यास कळविण्यात आले आहे. याकरीता आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची पुर्तता करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. मात्र असे असताना ग्रामविकास विभागाने निर्णय झाल्यानंतर ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचे ठराव मागितल्याने संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.