शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

सत्ताधाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 02:46 IST

शिक्षण, आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा या विषयांशी संबंधित प्रश्नांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले. विशेष म्हणजे विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून

अलिबाग : शिक्षण, आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा या विषयांशी संबंधित प्रश्नांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरले. विशेष म्हणजे विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून सत्ताधारी पक्षातील शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील सदस्यांमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट चित्र शिवतीर्थावर दिसून आले.रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरेश टोकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. विरोधक असणाऱ्या शिवसेनेने असंतुष्ट सदस्यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याचे मनसुबे आखले आहेत. जिल्हा परिषदेमधील असणाऱ्या सभापतीपदी आणि अध्यक्ष-उपाध्यक्षपदी आपलीच वर्णी लागावी, यासाठी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सदस्य आक्रमक झाले आहेत. अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद श्यामकांत भोकरे यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारच्या बैठकीत सज्जड दम दिला होता. तसेच अध्यक्षपदी वर्णी लावण्याबाबत कोणताही शब्द दिला नसल्याचे तटकरे यांनी भोकरे यांनी सांगितले होते. त्यामुळे नाराजीच्या सुरात असलेले श्यामकांत भोकरे आजच्या बैठकीत आपल्याच सत्ताधाऱ्यांवर आक्रमक झाल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी मागील बैठकीत दिलेल्या आश्वासनाची कोणती पूर्तता करण्यात आली, जिल्ह्यातील विश्रामगृहे महिला बचत गटांना चालविण्यासाठी देण्याच्या योजनेचे काय झाले, असे प्रश्न करीत त्यांनी सुरुवातीलाच तोफ डागली. त्यानंतर शिवसेनेनेही पेटलेल्या वातावरणाचा फायदा घेत सत्ताधाऱ्यांवर चौफेर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांना शेकापचे एकनाथ देशेकर यांनी साथ दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर विरोधकांसह स्वकीयही आक्रमक झाल्याचे दिसून आले. शिक्षण, आरोग्य, बांधकाम, समाजकल्याण, पाणीपुरवठा या प्रश्नांचे चारही बाजूंनी होणारे हल्ले परतावून लावताना सत्ताधारी आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली.रायगडावर शिवाजी महाराजांना सलामी देण्याचे तसेच गडावर नगारे वाजविणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनाबाबत ठोस कारवाई का झाली नाही, असा प्रश्न शिवसेनेचे सूर्यकांत कालगुडे यांनी विचारला. त्यावेळी कार्यवाही सुरू असल्याचे मोघम उत्तर प्रशासानाने दिल्याने कालगुडे संतप्त झाले. खासदारही तुमच्याच पक्षाचे असल्याने त्यांच्याकडून काम करून घ्या, असे उत्तर शेकापचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी दिल्याने कालगुडे प्रचंड खवळले. हे काम जिल्हा परिषदेचे असल्याने तुम्हीच केले पाहिजे, असे महेंद्र दळवी यांनी खडसावले. शिवाजी महाराजांच्या विषय असल्याने भोकरे यांनीही त्यामध्ये उडी घेत विरोधकांना चांगलेच बळ दिले. याप्रसंगी बांधकाम सभापती चित्रा पाटील, गीता जाधव आदींसह अधिकारी उपस्थित होते.पाणीपट्टी रद्द करा : पेण तालुक्यात खारेपाटातील ४४ गावांना पाणी मिळत नाही. त्यामुळे त्या गावांतून घेण्यात येणारी पाणीपट्टी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर ठराव घेऊन सरकारला कळविण्यात येईल, असे सभागृहाने सांगितले. तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र पाटील यांनी रस्ते आणि पाण्यासाठी ४० कोटी रुपये आणले होते. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या शेकापने ते रोखल्याचे सदस्या कौसल्या पाटील यांनी सांगितले. त्यावर नीलिमा पाटील आक्रमक झाल्या. १० पैशाचाही निधी आला नसून, मागील फायली सभागृहाने तपासाव्यात, असे आव्हान पाटील यांनी दिले.हिश्शाचा फंड विकासासाठी खर्च करावा : पनवेल आणि उरण तालुक्यांतील काही गावांचा समावेश हा सिडकोमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्या गावांना जिल्हा परिषदेमधील फंड न देता त्या गावांच्या हिश्शाचा फंड अन्य गावांच्या विकासासाठी खर्च करावा. यासाठी ठराव घ्यावा, अशी मागणी सदस्य राजेंद्र पाटील यांनी केली. पेण-जोहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूरी द्यावी, त्याचप्रमाणे रोहे-रोठे येथे गेली १३ वर्षे ग्रामसेवक पदावर असलेले दीपक चिपळूणकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ग्रामसेवकांना पुरस्कार देताना त्याचे चारित्र्य पडतळून पाहा, अशा मागण्या करण्यात आल्या.