शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

रायगडच्या नकाशातूनही गाढी नदी गायब !

By admin | Updated: February 14, 2016 03:10 IST

वर्षानुवर्ष पनवेलकरांची तहान भागविणाऱ्या गाढी नदीचे अस्तित्व अतिक्रमण व प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. विमानतळासाठी नदीचे पात्र बदलण्याच्या हालचाली

- नामदेव मोरे,  नवी मुंबईवर्षानुवर्ष पनवेलकरांची तहान भागविणाऱ्या गाढी नदीचे अस्तित्व अतिक्रमण व प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. विमानतळासाठी नदीचे पात्र बदलण्याच्या हालचाली सुरू असताना जिल्ह्याच्या नकाशामध्येही गाढी नदीचा समावेश नाही. नदीचे अस्तित्वच नाकारले असल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.मुंबई, नवी मुंबई व रायगड परिसरातील विकासकामांसाठी येथील पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास सुरू आहे. सिडकोची स्थापना झाल्यानंतर ठाणे-बेलापूर एमआयडीसीमधील व उरण तालुक्यातील डोेंगर पोखरण्यास सुरुवात केली. येथील डोंगराचे अस्तित्वच नष्ट होत आले आहे. यानंतर मँग्रोज व मोठ्या नाल्यांवर अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली. ‘लोकमत’ने गाढी नदीच्या काठावर झालेली अतिक्रमणे व नदीपात्रातील प्रदूषणाविषयी वृत्त प्रसिद्ध करताच पर्यावरणप्रेमींनी नदीचे अस्तित्व टिकले पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली आहे. अनेकांनी फोन करून गाढी नदीमधील अतिक्रमण व प्रदूषणापेक्षा शासनाने तिचे अस्तित्वच नाकारल्याची माहिती देण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ, रायगड जिल्ह्याचे संकेतस्थळ व राज्य शासनाच्या जिल्हानिहाय नद्यांच्या नकाशावर गाढी नदीला स्थानच देण्यात आलेले नाही. गाढी नदी हाच पनवेलकरांचा मुख्य जलस्रोत असल्याचा उल्लेख ४४६ वर्षांपूर्वीच्या दस्तऐवजामध्ये सापडला. शासनाला नदीचा विसर पडल्याने नकाशावरून गाढी गायब केल्यामुळे यापाठीमागे षडयंत्र असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.१० नद्यांचाच उल्लेख रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर व राज्य शासनाच्या जिल्ह्याच्या सविस्तर नकाशावर फक्त १० नद्यांचाच उल्लेख आहे. यामध्ये उल्हास, काळू, पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, सावित्री, घोड व गंधार यांचा समावेश आहे. पनवेलमधील गाढी, मोरबे धरण ज्या नदीवर बांधले त्या मुर्बी नदीचा उल्लेखच नाही. पनवेल हे भविष्यात महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख केंद्र असणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक प्रकल्प येथे उभे राहात आहेत. गाडी नदी ही या शहराचा श्वास आहे. तिचे अस्तित्व नष्ट झाल्यास भविष्यात मिठीप्रमाणे या परिसरात पूर येऊन प्रचंड जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व पनवेलकरांसह पर्यावरणप्रेमींनी गाडी बचाव अभियान राबविण्याची गरज आहे. - सुकुमार किल्लेदार, अध्यक्ष, सेव्ह मँग्रोज अँड नवी मुंबई एक्झिस्टन्स