शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नदी शुद्धीकरण कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 03:29 IST

पनवेलमधील गाढी नदीचे शुद्धीकरण व अतिक्रमण हटविण्याची मोहीम एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली होती. परंतु यासाठीचा आराखडा, निधी व लोकसहभागाविषयीचे नियोजन नसल्याने मोहीम

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

पनवेलमधील गाढी नदीचे शुद्धीकरण व अतिक्रमण हटविण्याची मोहीम एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली होती. परंतु यासाठीचा आराखडा, निधी व लोकसहभागाविषयीचे नियोजन नसल्याने मोहीम ठप्प झाली आहे. नैना, प्रस्तावित महापालिका व विमानतळामुळे परिसराचा झपाट्याने विकास होत असून विकासाच्या हव्यासापोटी गाढी, काळुंद्रीसह कासाडी नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलचे नाव जगाच्या नकाशावर चर्चेत आले आहे. देशातील सर्वात झपाट्याने विकसित होणारे महानगर म्हणून या परिसराची ओळख निर्माण झाली आहे. बांधकामासह पायाभूत सुविधेसाठी पुढील पाच वर्षांत देशातील सर्वात जास्त गुंतवणूक याच परिसरात होणार आहे. सिडकोच्या माध्यमातून ६० हजार कोटींचे प्रकल्प राबविले जाणार आहेत. विकासाची प्रचंड संधी असल्याने या परिसरामध्ये गुंतवणूक करण्यासाठी पहिली पसंती मिळू लागली आहे. शेती हद्दपार होऊन जमिनीवर टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. सिमेंट काँक्रिटचे जंगल उभारताना निसर्गाचा ऱ्हास केला जात आहे. पनवेल तालुक्यातून तीन प्रमुख नद्या वाहत आहेत. यामधील गाढी नदी शेकडो वर्षांपासून पनवेलकरांची तहान भागवत आहे. परंतु आता तिच्या पात्रामध्ये अतिक्रमण झाले आहे. शहरातील कचरा व डेब्रीजही नदीमध्ये टाकले जात आहे. नदीचे पाणी दूषित झाले आहे. गाढीचे जलशुद्धीकरण व परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने एप्रिलमध्ये विशेष मोहीम सुरू केली होती. ८ एप्रिलला अधिकारी व लोकप्रतिनिधींनी गाढी नदीची परिक्रमा करून जलशुद्धीकरण कार्यक्रमाची सुरुवात केली होती. उगमापासून खाडीपर्यंत नदीचे सर्वेक्षण करून पात्रामधील अतिक्रमणांची यादी तयार केली जाणार होती. गाढी अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. गाळ काढण्याचे काम सुरू झाले, परंतु ठोस आराखडाच नसल्याने सद्य:स्थितीमध्ये हे काम थांबले आहे. पावसाळ्यानंतरच जलशुद्धीकरणाची मोहीम राबविली जाणार आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमधून धावणाऱ्या कासाडी नदीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांचे दूषित पाणी नदीमध्ये सोडले जात आहे. नदीमधून निळे व काळे पाणी वाहत असल्याचे सदैव निदर्शनास येत आहे. संकेतस्थळावरून नद्या गायब - रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जिल्ह्यातील नद्यांची माहिती देण्यात आली आहे. या यादीमध्ये पनवेल तालुक्यामधील गाढी, काळुंद्री व कासाडी नदीचा उल्लेखही नाही. जिल्ह्याच्या नकाशावरूनच नद्या गायब झाल्या असून याकडे लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करू लागले आहेत. नकाशावर नद्या नसतील तर भविष्यात या नद्यांना ओढे ठरवून त्यांचे अस्तित्व संपविण्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. नदीचे पात्र अतिक्रमणमुक्त ठेवले नाही तर भविष्यात पूर आल्यानंतर व भरतीच्या प्रसंगी पूर्ण शहर पाण्यात जाण्याची शक्यता असून या नद्यांची मिठी होण्यापूर्वीच शासनाने लक्ष देण्याची मागणी पनवेलकरांकडून केली जात आहे. नदी शुद्धीकरणासाठी आराखडा गाढी, काळुंद्री व कासाडी नदीचे शुद्धीकरण व पात्रातील अतिक्रमण हटविण्यासाठी शासनाने ठोस आराखडा तयार करण्याची गरज आहे. उगमापासून ते खाडीपर्यंत सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. अतिक्रमण हटविणे, गाळ काढणे, नदीमध्ये केमिकल कंपनीतील दूषित पाणी, मलनि:सारण पाणी सोडण्यापासून प्रतिबंध करण्यासह ठोस धोरणांची गरज आहे. बांधकामांसाठी प्रतिबंध नदीच्या पात्रापासून किती मीटर अंतर मोकळे सोडले पाहिजे याविषयी धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीमध्ये नदीच्या काठाला लागून बांधकामे सुरू झाली आहेत. यामुळे नदीच्या पात्राचा आकार कमी होऊ लागला आहे. यामुळे निश्चित धोरण करणे आवश्यक असून सर्व अतिक्रमणे काढून टाकण्याची गरज आहे. प्रशासनाचे प्रयत्न कौतुकास्पद पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाढी नदीच्या शुद्धीकरणासाठी व पात्र अतिक्रमणमुक्त करण्यासाठीच्या कामाला सुरुवात केली आहे. सध्या काम बंद असले तरी त्यांनी यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. नदी अतिक्रमणमुक्त करणे व प्रदूषण रोखण्यासाठी त्यांच्याकडील यंत्रणा पुरेशी नसून यासाठी शासनाने ठोस धोरण आखण्याची आवश्यकता आहे. कासाडी नदीमध्येही अनेक ठिकाणी डेब्रीज टाकले जात आहे. डेब्रीजच्या भरावामुळे दिवसेंदिवस पात्र अरुंद होऊ लागले आहे. काळुुंद्री नदीचे पात्रही दूषित झाले आहे. या तीन प्रमुख नद्यांसोबत उलवे नदीही विमानतळ परिसरातून वाहत आहे. परंतु उलवे नदीसुद्धा कागदावरच असून तिच्या पात्राला ओढ्याचे स्वरूप आले आहे. पनवेल तालुका खाडीकिनारी वसला आहे.

पनवेल तालुक्यातील नद्यांची स्थिती - कासाडी नदीमध्ये सोडले जाते केमिकल कंपन्यांमधील पाणी - गाढीसह काळुंद्रीमध्ये सांडपाणी सोडण्यासाठी वापर - नदीच्या पात्राला लागून बांधकाम सुरू - नदीमध्ये डेब्रीजचा भराव टाकण्यास सुरुवात - प्रदूषणामुळे माशांसह इतर जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात - नदी पात्रातील अतिक्रमणामुळे पूर येण्याची भीती - प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई करण्यास टाळाटाळ