शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

नेरूळ मलप्रक्रिया केंद्रातील गाळ काढला; नागरिकांची दुर्गंधीपासून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 01:20 IST

महापालिकेने परिसरात स्वच्छता करण्याची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ येथील नवी मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण प्रक्रिया केंद्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिक दुर्गंधीने त्रस्त होते. महापालिकेच्य माध्यमातून मलप्रक्रिया केंद्रातील गाळ काढण्यात आल्याने स्थानिकांची दुर्गंधीतून सुटका झाली आहे. मलप्रक्रिया केंद्रातील परिसराची नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नेरूळ पूर्व आणि पश्चिम भागातीत मलवाहिन्यांतील सांडपाणी नेरूळ सेक्टर २ येथील मलनि:सारण प्रक्रिया केंद्रात सोडण्यात आले आहे. या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. सदर मलप्रकिया केंद्र जुने झाले असून परिसरातील नागरिकांना दुर्गंधीसारख्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मलप्रकिया केंद्र स्थलांतरणाच्या प्रक्रिया २०१२ मध्ये पूर्ण झाल्या होत्या. या कामाला पालिकेच्या महासभेची मंजुरी मिळून कामदेखील सुरू झाले होते. काम अंतिम टप्प्यात आले असताना खारफुटीचा अडथळा येत असल्याने हे काम रखडले होते. त्यानंतर सदर कामाला पुन्हा मंजुरी मिळाली होती, परंतु ते काम पूर्ण होऊ शकले नाही. सदर केंद्र स्थलांतरित होणार असल्याचे सांगून गेल्या काही वर्षांपासून डागडुजीची कामे करण्यात आलेली नाहीत.

मलप्रक्रिया केंद्रातील गाळ काढण्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. मलप्रकिया केंद्रातील गाळाची पातळी वाढल्याने परिसरात दुर्गंधीचे प्रमाणदेखील वाढले आहे. मलनि:सारण केंद्राच्या परिसरात मोकळी जागा मोठ्या प्रमाणावर असून शहरात स्वच्छता अभियान राबविताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जप्त केलेले साहित्य, बॅनर, भंगार वाहने, डेब्रिज टाकण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे. या ठिकाणी सापांचा वावरही वाढला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कोरोना काळात मलनि:सारण केंद्रातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याअनुषंगाने माजी नगरसेविका स्नेहा पालकर यांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार करून मलनि:सारण केंद्रातील गाळ काढण्याची आणि परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली होती.

च्नवी मुंबई महानगरपालिकेने घटनेची तत्काळ दखल घेत शुक्रवारी २९ मे रोजी मलनि:सारण केंद्रातील गाळ काढण्याचे कामसुरू के ले आहे. गाळ काढल्याने परिसरातील दुर्गंधीचे प्रमाण कमी होणार असून स्वच्छतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई