शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

नेरूळ मलप्रक्रिया केंद्रातील गाळ काढला; नागरिकांची दुर्गंधीपासून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 01:20 IST

महापालिकेने परिसरात स्वच्छता करण्याची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ येथील नवी मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण प्रक्रिया केंद्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिक दुर्गंधीने त्रस्त होते. महापालिकेच्य माध्यमातून मलप्रक्रिया केंद्रातील गाळ काढण्यात आल्याने स्थानिकांची दुर्गंधीतून सुटका झाली आहे. मलप्रक्रिया केंद्रातील परिसराची नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नेरूळ पूर्व आणि पश्चिम भागातीत मलवाहिन्यांतील सांडपाणी नेरूळ सेक्टर २ येथील मलनि:सारण प्रक्रिया केंद्रात सोडण्यात आले आहे. या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. सदर मलप्रकिया केंद्र जुने झाले असून परिसरातील नागरिकांना दुर्गंधीसारख्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मलप्रकिया केंद्र स्थलांतरणाच्या प्रक्रिया २०१२ मध्ये पूर्ण झाल्या होत्या. या कामाला पालिकेच्या महासभेची मंजुरी मिळून कामदेखील सुरू झाले होते. काम अंतिम टप्प्यात आले असताना खारफुटीचा अडथळा येत असल्याने हे काम रखडले होते. त्यानंतर सदर कामाला पुन्हा मंजुरी मिळाली होती, परंतु ते काम पूर्ण होऊ शकले नाही. सदर केंद्र स्थलांतरित होणार असल्याचे सांगून गेल्या काही वर्षांपासून डागडुजीची कामे करण्यात आलेली नाहीत.

मलप्रक्रिया केंद्रातील गाळ काढण्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. मलप्रकिया केंद्रातील गाळाची पातळी वाढल्याने परिसरात दुर्गंधीचे प्रमाणदेखील वाढले आहे. मलनि:सारण केंद्राच्या परिसरात मोकळी जागा मोठ्या प्रमाणावर असून शहरात स्वच्छता अभियान राबविताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जप्त केलेले साहित्य, बॅनर, भंगार वाहने, डेब्रिज टाकण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे. या ठिकाणी सापांचा वावरही वाढला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कोरोना काळात मलनि:सारण केंद्रातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याअनुषंगाने माजी नगरसेविका स्नेहा पालकर यांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार करून मलनि:सारण केंद्रातील गाळ काढण्याची आणि परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली होती.

च्नवी मुंबई महानगरपालिकेने घटनेची तत्काळ दखल घेत शुक्रवारी २९ मे रोजी मलनि:सारण केंद्रातील गाळ काढण्याचे कामसुरू के ले आहे. गाळ काढल्याने परिसरातील दुर्गंधीचे प्रमाण कमी होणार असून स्वच्छतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई