शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

रायगड महोत्सव म्हणजे गावची जत्राच!

By admin | Updated: January 25, 2016 02:43 IST

हाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक विभागाने रायगड महोत्सवाचे आयोजन केले होते. आज या महोत्सवाची सांगता झाली.

दासगाव(सिकंदर अनवारे) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक विभागाने रायगड महोत्सवाचे आयोजन केले होते. आज या महोत्सवाची सांगता झाली. पाचाड येथे तयार केलेली शिवसृष्टी म्हणजे केवळ दिखावाच होता. केवळ स्टॉल आणि स्टेज शो याव्यतरिक्त कोणतेच वेगळेपण नसल्याने हा महोत्सव म्हणजे गावची जत्राच असल्याची प्रतिक्रीया स्थानिक तसेच पर्यटकांतून उमटत होती. पाचाडमधील दुकानदार, हॉटेल व्यवसायीक तसेच या शिवसृष्टीतील स्टॉलधारकांना अल्प प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सुर उमटत होता. राजा शिव छत्रपती या मालिकेतील सेट उभे करून नितीन देसाई यांनी व्यवसाय केला आणि शासनाने पर्यटकांना उल्लु बनवले.गेली तिन दिवस चाललेल्या रायगड महोत्सवाला शेवटच्या दोन दिवसात प्रतिसाद मिळाला मात्र याठिकाणी आलेल्या प्रत्येक शिवप्रेमीमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. आगाऊ बुकींगमुळे किल्ल्यावर जाणे शक्य नसल्याने पाचाड येथे प्रचंड गर्दी झाली. यामुळे कोंझर ते पाचाड या घाटात जवळपास एक तासाची वाहतुक कोंडी झाली. यामध्ये त्रस्त झालेल्या पर्यटकांना पाचाडमध्ये आल्यानंतर केवळ खाद्यपदार्थांच्या स्टॉल व्यतरीक्त कांहीच वेगळेपण न दिसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. याठिकाणी केवळ शस्त्रप्रदर्शनालाच रांगा लागल्या होत्या. याठिकाणी काढण्यात आलेली रांगोळी धुळ बसल्याने ही रांगोळी धुळीने काढलेली आहे का अशी स्थिती निर्माण झाली होती. या धुळीमुळे खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे पर्यटकांनी पाठ फिरवली. यामुळे स्टॉलधारकांना अल्प प्रतिसाद मिळाला. तर किल्ले रायगडावरील बाजार पेठेत चिनी फेंगशुईच्या मुती, अष्टविनायाकातील गणपती मुर्ती, टीफीनचा पितळी डबा, रॉकेलवर चालणारा कंदील, हŸाीच्या सोंडेवरील झालर, आणि आजच्या काळातील मिठाई अशा वस्तु मांडण्यात आल्या होत्या. खरोखरच या वस्तु शिवकालात आणि राजधानीच्या बाजार पेठेत विक्रीसाठी होत्या का? असा प्रश्न पर्यटक करीत होते. याठिकाणी कांही सामाजीक संस्थांनी २० रूपयांची पाणी बाटली १० रूपयांत विकणे सुरू केले तर पाचाड ते रोप वे दरम्यान नितीन देसाई यंनी मोफत गाडी सुरू केली यामुळे स्थानिक व्यवसायीकांना याचा चांगलाच फटका बसला.केवळ स्टॉल व सायंकाळी होत असलेल्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण पाहता वेगळेपण असे काहीच नव्हते. परंतु महाड तालुक्यात शासनाने प्रथमच अशा प्रकारचा दिलेला मोठा कार्यक्रम व नितीन देसाईंच्या कलाप्रकारांचे आकर्षण यासाठी शनिवार - रविवार या दोन दिवसात रायगडमधील नागरीकांनी गर्दी केली होती. रायगड वगळता रस्त्यावर इतर जिल्हातील गाड्या दिसत नव्हत्या. शासनाचा कार्यक्रम असला तरी स्थानिकांना डावलून केलेल्या या कार्यक्रमात स्थानिक प्रशासनालाही कवडीमोल किंमत देण्यात आली. स्टेज शो असलेल्या ठिकाणी देखील ठेकेदाराच्या कामगारांचीच मनमानी होत असल्याने अनेक अधिकाऽयांना बाहेरून कार्यक्रम पाहण्याची पाळी आली.