शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

भावी पिढी निर्व्यसनी, राष्ट्रभक्त घडली तरच देशाची प्रगती

By admin | Updated: March 14, 2016 01:56 IST

देशातील संस्कृती टिकवायची असल्यास, नव्या पिढीवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. संस्कृती टिकली तरच धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल.

नवी मुंबई : देशातील संस्कृती टिकवायची असल्यास, नव्या पिढीवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. संस्कृती टिकली तरच धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. भावी पिढी निर्व्यसनी व राष्ट्रभक्त घडली तरच देशाची प्रगती होईल, असे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. ऐरोली सेक्टर १० येथील डी.ए.व्ही. दिवा कोळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्संग सोहळ्यात त्यांनी भाविकांना मौलिक मार्गदर्शन केले. दिवसातील १४ तास घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांना आध्यात्मिक ऊर्जा देण्याचे काम स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गातून केले जात आहे. आदर्श पिढी घडविण्याचे काम स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून घडत आहे. श्री समर्थ सेवा मार्गाची संपूर्ण भारतात १५ हजारांहून अधिक सेवा केंद्रे असल्याने त्यांनी यावेळी सांगितले. सोहळ्यात प्रश्नोत्तरे, श्री दुर्गा सप्तशती पाठ, बालसंस्कार, वास्तुशास्त्र, विवाह संस्कार, मराठी संस्कृती अस्मिता व हस्तशास्त्र या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. महासत्संग सोहळ्यानिमित्त खारीगाव, विटावा, कळवा, पनवेल तसेच संपूर्ण नवी मुंबई परिसरात स्वामी समर्थ रथाची भ्रमंती करण्यात आली. रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी चैत्र पाडव्यापासून ते होळीपर्यंत सर्व सणांची मांडणी करण्यात आली होती. यामध्ये भारतीय संस्कृतीनुसार सण कसे साजरे करावे, याचीही सखोल माहिती देण्यात आली. विश्वकल्याण उन्नतीसाठी स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून देशभरात विविध उपक्र म राबविले जात आहेत. माजी मंत्री गणेश नाईक, खासदार राजन विचारे, आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादीचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक राजेश मढवी, नगरसेवक ममित चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.