शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

भावी पिढी निर्व्यसनी, राष्ट्रभक्त घडली तरच देशाची प्रगती

By admin | Updated: March 14, 2016 01:56 IST

देशातील संस्कृती टिकवायची असल्यास, नव्या पिढीवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. संस्कृती टिकली तरच धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल.

नवी मुंबई : देशातील संस्कृती टिकवायची असल्यास, नव्या पिढीवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. संस्कृती टिकली तरच धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. भावी पिढी निर्व्यसनी व राष्ट्रभक्त घडली तरच देशाची प्रगती होईल, असे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले. ऐरोली सेक्टर १० येथील डी.ए.व्ही. दिवा कोळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्संग सोहळ्यात त्यांनी भाविकांना मौलिक मार्गदर्शन केले. दिवसातील १४ तास घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांना आध्यात्मिक ऊर्जा देण्याचे काम स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गातून केले जात आहे. आदर्श पिढी घडविण्याचे काम स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून घडत आहे. श्री समर्थ सेवा मार्गाची संपूर्ण भारतात १५ हजारांहून अधिक सेवा केंद्रे असल्याने त्यांनी यावेळी सांगितले. सोहळ्यात प्रश्नोत्तरे, श्री दुर्गा सप्तशती पाठ, बालसंस्कार, वास्तुशास्त्र, विवाह संस्कार, मराठी संस्कृती अस्मिता व हस्तशास्त्र या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. महासत्संग सोहळ्यानिमित्त खारीगाव, विटावा, कळवा, पनवेल तसेच संपूर्ण नवी मुंबई परिसरात स्वामी समर्थ रथाची भ्रमंती करण्यात आली. रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी चैत्र पाडव्यापासून ते होळीपर्यंत सर्व सणांची मांडणी करण्यात आली होती. यामध्ये भारतीय संस्कृतीनुसार सण कसे साजरे करावे, याचीही सखोल माहिती देण्यात आली. विश्वकल्याण उन्नतीसाठी स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून देशभरात विविध उपक्र म राबविले जात आहेत. माजी मंत्री गणेश नाईक, खासदार राजन विचारे, आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादीचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष व कार्यक्रमाचे आयोजक राजेश मढवी, नगरसेवक ममित चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.