शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

एनएमएमटीचे खाजगीकरण

By admin | Updated: February 20, 2016 02:11 IST

एनएमएमटीच्या खाजगीकरणाला हिरवा कंदील मिळाला असून सात वर्षांच्या करारावर ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईएनएमएमटीच्या खाजगीकरणाला हिरवा कंदील मिळाला असून सात वर्षांच्या करारावर ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. होणारा तोटा भरुन काढण्याच्या तसेच दर्जात सुधार आणण्याच्या दृष्टीने परिवहनकडून हा प्रयत्न होत असला तरी त्यात कितपत यश मिळेल हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे.सन २०१४ मध्ये महासभेने दिलेल्या प्रशासकीय मंजुरीनुसार परिवहनच्या गाड्या खाजगी ठेकेदारामार्फत चालवल्या जाणार आहेत. याकरिता नोव्हेंबर २०१५ मध्ये ठेकेदारांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जे.एल.एल. या विदेशी कंपनीसह महालक्ष्मी ट्रॅव्हल्स व अ‍ॅन्थोनी यांच्या निविदा प्राप्त झालेल्या. त्यापैकी महालक्ष्मी ट्रॅव्हल्सची निविदा सर्वाधिक कमी दराची असल्याने त्यास मंजुरी मिळाली आहे. यानुसार सात वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची निवड करण्यात आली असून यासंबंधीचा करार महिन्याभरात होणार आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परिवहनच्या झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी देखील मिळाली आहे.जेएनएनयूआरएम कडून परिवहनला मिळणाऱ्या १४५ व इतर ४० अशा १८५ गाड्यांचे खाजगीकरण होणार आहे. या गाड्यांच्या खरेदीसाठी परिवहनला केंद्राकडे भरावा लागणारा ३० टक्के निधी ठेकेदाराकडून घेतला जाणार आहे. यानुसार गाड्यांचा देखभाल खर्च, इंधन खर्च व चालक ठेकेदाराचा असणार आहे. तर वाहक व कलेक्शनचे अधिकार परिवहनकडेच राहणार आहेत. परिवहनकडून ठेकेदाराला प्रति किलोमीटरप्रमाणे रक्कम दिली जाणार आहे. त्यासाठी वोल्व्हो बससाठी ५८ रुपये, साध्या बससाठी ४१ रुपये तर मिडी बससाठी ३१ रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत परिवहनला सरासरी ६० ते ७१ रुपये प्रति किलोमीटर खर्च येतो. करारनामा झाल्यानंतर १५ मार्चपासून या बसेस मार्गावर सुरु करण्याचाही प्रशासनाचा प्रयत्न आहे. केंद्राच्या निर्देशानुसार भोपाळ, इंदोर व ठाणेपाठोपाठ नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने असा निर्णय झालेला आहे. सदर ठेकेदाराला परिवहनचा एक डेपो भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. त्याच ठिकाणी त्याच्या गाड्या उभ्या राहणार असून याचे संपूर्ण नियंत्रण हे परिवहनकडेच असणार आहे.> केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खाजगीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. गाड्यांसाठी मनपाला केंद्राकडे भरावा लागणारा ३० टक्के निधी देखील ठेकेदारच भरणार आहे. खाजगीकरणामुळे एनएमएमटीच्या गाड्यांचा दर्जा सुधारणार आहे. शिवाय आजतागायत तोट्यात चाललेल्या परिवहनलाही नफा होणार आहे.- शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक