शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

माता-बाल संगोपन केंद्राचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 06:27 IST

कोपरखैरणे येथील माता-बाल संगोपन केंद्र दुरुस्तीच्या नावाखाली मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहे. दुरुस्ती की पुनर्बांधणी याबाबत प्रशासनात घोळ सुरू असल्याने केंद्राची रखडपट्टी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोपरखैरणे येथील माता-बाल संगोपन केंद्र दुरुस्तीच्या नावाखाली मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहे. दुरुस्ती की पुनर्बांधणी याबाबत प्रशासनात घोळ सुरू असल्याने केंद्राची रखडपट्टी होत आहे. त्याचा फटका परिसरातील रहिवाशांना बसला आहे.कोपरखैरणे सेक्टर २२ येथे महापालिकेचे माता-बाल संगोपन केंद्र आहे. या केंद्रात कोपरखैरणे, पावणे, महापे, घणसोली तसेच बोनकोडे या परिसरात महिला तपासणीसाठी व प्रसूतीसाठी येतात. परंतु नियमित डागडुजीअभावी केंद्राच्या इमारतीची दयनीय अवस्था झाल्याने दुरुस्तीच्या नावाखाली दोन वर्षांपूर्वी हे केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे या केंद्रावर विसंबून असलेल्या शेकडो रुग्णांना वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात फेºया माराव्या लागत आहे. विशेष म्हणजे २00८-२00९ मध्ये केंद्राच्या इमारतीची डागडुजी करण्यात आली होती. परंतु हे काम अत्यंत तकलादू ठरल्याने काही महिन्यातच इमारतीची पडझड सुरू झाली होती. मागील दोन वर्षांपासून या इमारतीचा वापर होत नसल्याने ती मोडकळीस आली आहे. उंदीर व घुशीने इमारतीच्या चारही बाजूच्या भिंती पोखरल्या आहेत. भिंतीला तडे गेले आहेत. छताला गळती लागली आहे. दरवाजे मोडकळीस आले आहेत. खिडक्यांची तावदाने तुटली आहेत. लोखंडी ग्रील चोरीला गेले आहेत. एकूणच ही इमारत पूर्णत: धोकादायक बनल्याने तिची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. परंतु महापालिकेच्या अभियंता विभागाकडून पुनर्बांधणीऐवजी दुरुस्तीचा मुद्दा पुढे रेटला जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यासंदर्भात कोणताही निर्णय घेत नाहीत. त्यामुळे रहिवाशांनी नाराजी प्रकट केली आहे.केंद्राची इमारत दोन वर्षांपासून वापराविना पडून आहे. त्यामुळे समाजकंटकांकडून इमारतीचा गैरवापर सुरू आहे. याठिकाणी दिवसा एक सुरक्षारक्षक नियुक्त केला आहे. परंतु रात्रीच्या वेळी कोणतीही सुरक्षा नसल्याने इमारतीच्या आवारात गर्दुल्ल्यांचा तळ दिसून येतो. त्यामुळे परिसरात घरफोडी व किरकोळ चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. शिवाय इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणात भंगार टाकण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर वाहनांची बेकायदा पार्किंग केली जात आहे.सध्या केंद्राच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत दुरुस्ती करणे योग्य होणार नाही. कारण यापूर्वी करण्यात आलेली दुरुस्ती कुचकामी ठरली आहे. त्यामुळे पुनर्बांधणी हा एकमेव पर्याय असून प्रशासनाने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी.- देविदास हांडे-पाटील,नगरसेवक,प्रभाग ४२