शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
4
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
5
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
6
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
7
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
8
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
9
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
10
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
11
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
12
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
13
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
14
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
15
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
16
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
17
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
18
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
19
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
20
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

माता-बाल संगोपन केंद्राचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 06:27 IST

कोपरखैरणे येथील माता-बाल संगोपन केंद्र दुरुस्तीच्या नावाखाली मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहे. दुरुस्ती की पुनर्बांधणी याबाबत प्रशासनात घोळ सुरू असल्याने केंद्राची रखडपट्टी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोपरखैरणे येथील माता-बाल संगोपन केंद्र दुरुस्तीच्या नावाखाली मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहे. दुरुस्ती की पुनर्बांधणी याबाबत प्रशासनात घोळ सुरू असल्याने केंद्राची रखडपट्टी होत आहे. त्याचा फटका परिसरातील रहिवाशांना बसला आहे.कोपरखैरणे सेक्टर २२ येथे महापालिकेचे माता-बाल संगोपन केंद्र आहे. या केंद्रात कोपरखैरणे, पावणे, महापे, घणसोली तसेच बोनकोडे या परिसरात महिला तपासणीसाठी व प्रसूतीसाठी येतात. परंतु नियमित डागडुजीअभावी केंद्राच्या इमारतीची दयनीय अवस्था झाल्याने दुरुस्तीच्या नावाखाली दोन वर्षांपूर्वी हे केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे या केंद्रावर विसंबून असलेल्या शेकडो रुग्णांना वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात फेºया माराव्या लागत आहे. विशेष म्हणजे २00८-२00९ मध्ये केंद्राच्या इमारतीची डागडुजी करण्यात आली होती. परंतु हे काम अत्यंत तकलादू ठरल्याने काही महिन्यातच इमारतीची पडझड सुरू झाली होती. मागील दोन वर्षांपासून या इमारतीचा वापर होत नसल्याने ती मोडकळीस आली आहे. उंदीर व घुशीने इमारतीच्या चारही बाजूच्या भिंती पोखरल्या आहेत. भिंतीला तडे गेले आहेत. छताला गळती लागली आहे. दरवाजे मोडकळीस आले आहेत. खिडक्यांची तावदाने तुटली आहेत. लोखंडी ग्रील चोरीला गेले आहेत. एकूणच ही इमारत पूर्णत: धोकादायक बनल्याने तिची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. परंतु महापालिकेच्या अभियंता विभागाकडून पुनर्बांधणीऐवजी दुरुस्तीचा मुद्दा पुढे रेटला जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यासंदर्भात कोणताही निर्णय घेत नाहीत. त्यामुळे रहिवाशांनी नाराजी प्रकट केली आहे.केंद्राची इमारत दोन वर्षांपासून वापराविना पडून आहे. त्यामुळे समाजकंटकांकडून इमारतीचा गैरवापर सुरू आहे. याठिकाणी दिवसा एक सुरक्षारक्षक नियुक्त केला आहे. परंतु रात्रीच्या वेळी कोणतीही सुरक्षा नसल्याने इमारतीच्या आवारात गर्दुल्ल्यांचा तळ दिसून येतो. त्यामुळे परिसरात घरफोडी व किरकोळ चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. शिवाय इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणात भंगार टाकण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर वाहनांची बेकायदा पार्किंग केली जात आहे.सध्या केंद्राच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत दुरुस्ती करणे योग्य होणार नाही. कारण यापूर्वी करण्यात आलेली दुरुस्ती कुचकामी ठरली आहे. त्यामुळे पुनर्बांधणी हा एकमेव पर्याय असून प्रशासनाने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी.- देविदास हांडे-पाटील,नगरसेवक,प्रभाग ४२