शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

माता-बाल संगोपन केंद्राचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 06:27 IST

कोपरखैरणे येथील माता-बाल संगोपन केंद्र दुरुस्तीच्या नावाखाली मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहे. दुरुस्ती की पुनर्बांधणी याबाबत प्रशासनात घोळ सुरू असल्याने केंद्राची रखडपट्टी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोपरखैरणे येथील माता-बाल संगोपन केंद्र दुरुस्तीच्या नावाखाली मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आले आहे. दुरुस्ती की पुनर्बांधणी याबाबत प्रशासनात घोळ सुरू असल्याने केंद्राची रखडपट्टी होत आहे. त्याचा फटका परिसरातील रहिवाशांना बसला आहे.कोपरखैरणे सेक्टर २२ येथे महापालिकेचे माता-बाल संगोपन केंद्र आहे. या केंद्रात कोपरखैरणे, पावणे, महापे, घणसोली तसेच बोनकोडे या परिसरात महिला तपासणीसाठी व प्रसूतीसाठी येतात. परंतु नियमित डागडुजीअभावी केंद्राच्या इमारतीची दयनीय अवस्था झाल्याने दुरुस्तीच्या नावाखाली दोन वर्षांपूर्वी हे केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे या केंद्रावर विसंबून असलेल्या शेकडो रुग्णांना वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात फेºया माराव्या लागत आहे. विशेष म्हणजे २00८-२00९ मध्ये केंद्राच्या इमारतीची डागडुजी करण्यात आली होती. परंतु हे काम अत्यंत तकलादू ठरल्याने काही महिन्यातच इमारतीची पडझड सुरू झाली होती. मागील दोन वर्षांपासून या इमारतीचा वापर होत नसल्याने ती मोडकळीस आली आहे. उंदीर व घुशीने इमारतीच्या चारही बाजूच्या भिंती पोखरल्या आहेत. भिंतीला तडे गेले आहेत. छताला गळती लागली आहे. दरवाजे मोडकळीस आले आहेत. खिडक्यांची तावदाने तुटली आहेत. लोखंडी ग्रील चोरीला गेले आहेत. एकूणच ही इमारत पूर्णत: धोकादायक बनल्याने तिची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. परंतु महापालिकेच्या अभियंता विभागाकडून पुनर्बांधणीऐवजी दुरुस्तीचा मुद्दा पुढे रेटला जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यासंदर्भात कोणताही निर्णय घेत नाहीत. त्यामुळे रहिवाशांनी नाराजी प्रकट केली आहे.केंद्राची इमारत दोन वर्षांपासून वापराविना पडून आहे. त्यामुळे समाजकंटकांकडून इमारतीचा गैरवापर सुरू आहे. याठिकाणी दिवसा एक सुरक्षारक्षक नियुक्त केला आहे. परंतु रात्रीच्या वेळी कोणतीही सुरक्षा नसल्याने इमारतीच्या आवारात गर्दुल्ल्यांचा तळ दिसून येतो. त्यामुळे परिसरात घरफोडी व किरकोळ चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. शिवाय इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणात भंगार टाकण्यात आले आहे. प्रवेशद्वारावर वाहनांची बेकायदा पार्किंग केली जात आहे.सध्या केंद्राच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत दुरुस्ती करणे योग्य होणार नाही. कारण यापूर्वी करण्यात आलेली दुरुस्ती कुचकामी ठरली आहे. त्यामुळे पुनर्बांधणी हा एकमेव पर्याय असून प्रशासनाने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी.- देविदास हांडे-पाटील,नगरसेवक,प्रभाग ४२