शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

उरण तालुक्यात शांततेत मतदान

By admin | Updated: February 22, 2017 06:46 IST

तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ अशा १२ जागांसाठी दुपारी

उरण : तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ अशा १२ जागांसाठी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५६.८४ टक्के मतदान झाले. मतदानाची अंतिम टक्केवारी ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. शांततेत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत ४३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतपेटीत बंद झाले आहे. उरण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाची सर्वत्रच सकाळपासूनच धामधूम सुरू झाली होती. सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पुढारी, उमेदवार आणि त्यांचे समर्थक सकाळपासूनच कामाला लागले होते. मतदानासाठी विविध मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्राबाहेर सर्वत्र राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी लगबग सुरू झाली होती. सकाळपासून मतदानाला झालेली गर्दी दुपारी १ वाजल्यानंतर ओसरल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर मतदानाचा जोर वाढला. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५५,०९५ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये २८,३४० स्त्री आणि २६,७५५ पुरुष मतदारांचा समावेश होता. दुपारपर्यंत ५६.८४ टक्के मतदान झाले होते. शेवटची आकडेवारी हाती आली नसली तरी मतदानाचा टक्का ६५ पर्यंत पोहोचण्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.