शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

सीवूडच्या प्रदूषणावर राजकारण्यांचे मौन

By admin | Updated: November 15, 2015 00:02 IST

सीवूड रेल्वे स्टेशनच्या बांधकामामुळे रहिवाशांना प्रदूषणापासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिसरात डेंग्यू, मलेरियाचा फैलाव होऊन एका तरुणाचा मृत्यूही झाला आहे.

नवी मुंबई : सीवूड रेल्वे स्टेशनच्या बांधकामामुळे रहिवाशांना प्रदूषणापासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिसरात डेंग्यू, मलेरियाचा फैलाव होऊन एका तरुणाचा मृत्यूही झाला आहे. नागरिक त्रस्त असताना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मात्र मौन धारण केले आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी या ठिकाणी विविध कंत्राटे घेतली असल्यामुळेच सर्वांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. सिडकोने २०१३ मध्ये सीवूड रेल्वे स्टेशनच्या बांधकामास सुरुवात केली आहे. हार्बर मार्गावरील सर्वात भव्य इमारत उभारली जात आहे. परंतु सदर बांधकाम करताना प्रवाशांना व परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी ठेकेदाराने घेणे आवश्यक आहे. परंतु काम पूर्ण करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात आले असून नागरिकांच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्याचा कालावधी वगळता या परिसरात नियमित धुळीचे साम्राज्य पसरू लागले आहे. धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. धुळीतून वाहने गेल्यानंतर नागरिकांना श्वासही निट घेता येत नाही. याविषयी नागरिकांनी आवाज उठविला की ठेकेदाराकडून रोडवर पाणी मारले जाते. परंतु काही दिवसांनी पुन्हा दुर्लक्ष केले जाते. महापालिकेच्या पावसाळी गटारामध्ये पाणी सोडले जात असून त्याकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांसाठी प्रसाधनगृहाचीही व्यवस्थित सोय नाही. दारावेगावाकडील प्रसाधनगृहाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीचा मार्गही गैरसोयीचा आहे. अपंग नागरिकांना रेल्वे स्टेशनमध्ये ये-जा करताना खूपच त्रास होत आहे. रेल्वे स्टेशनचे व व्यावसायिक इमारतीचे बांधकाम करताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन परिसरात डेंग्यू व मलेरियाची साथ पसरू लागली आहे. डेंग्यूमुळे एक तरुणाचा मृत्यूही झाला आहे. या समस्येकडे सर्वच राजकीय पक्षांचे पदाघिकारी दुर्लक्ष करू लागले आहेत. (प्रतिनिधी)