शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
3
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
4
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
5
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
6
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
7
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
8
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
9
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
10
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
11
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
12
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
13
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
14
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
15
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
16
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
17
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
18
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
19
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
20
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई

पालिकेच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची मनमानी

By admin | Updated: October 26, 2016 05:26 IST

अविश्वास ठरावाच्या दरम्यान महापालिकेच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची मनमानी सुरू होती. पालिकेच्या नावाखाली खाजगी वाहने आतमध्ये सोडण्यात आली. वाहनांची तपासणी

नवी मुंबई : अविश्वास ठरावाच्या दरम्यान महापालिकेच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची मनमानी सुरू होती. पालिकेच्या नावाखाली खाजगी वाहने आतमध्ये सोडण्यात आली. वाहनांची तपासणी न केल्यामुळे नगरसेवकांना मुंढेंच्या निषेधाचे फलक आतमध्ये घेवून जाता आले. पोलिसांची मनमानी सुरू असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. महापालिका मुख्यालयास पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. अविश्वास ठरावादरम्यान नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी जमावबंदी आदेश जारी केला होेता. मुख्यालयात जाणाऱ्या सर्वांची तपासणी करून सोडण्याचे आदेश होते. पण पोलीस गेटवर उभे राहून तपासणी न करता मनमानी करत होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मुख्यालय आवारामध्ये वाहन घेवून जाण्यास मनाई केली. अनेक माजी नगरसेवकांना गेटवरच अडविण्यात आले. पण कर्मचाऱ्यांच्या नावाखाली खाजगी गाड्या आतमध्ये जात असताना त्यांना अडविलेही नाही व तपासणीही करण्यात आली नाही. जमावबंदी आदेश असल्याने पालिका प्रशासन सांगेल त्यांचीच वाहने आतमध्ये सोडण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले. पण यावेळी पक्षपात करून वाहने आतमध्ये सोडली जात होती. पोलीस अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशीही वाद घातला. आतमध्ये जाणारी वाहने तपासली जात नसल्याचे निदर्शनास आणून देताच आम्हाला शिकवू नका, आम्ही काय करायचे ते पाहू असे सांगण्यात येत होते. आतमध्ये जाणाऱ्या वाहनांवर पालिकेचा स्टिकर नव्हता. यामुळे पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली. नगरसेवकांची वाहने तपासली नसल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांचा निषेध करणारे फलक सभागृहात नेण्यात यश आले. सभागृहात फलक झळकावून निषेध करण्यात आला. पोलिसांच्या अकार्र्यक्षमतेवर यावेळी टीका झाली. (प्रतिनिधी)नांगरे, सप्रेंची बघ्याची भूमिका मनपाच्या मुख्यालयावर पालिकेने सहाय्यक आयुक्त दत्तात्रय नांगरे व महेंद्र सप्रे यांची नियुक्ती केली होती. पण पोलीस प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी व इतर नागरिकांशी वाद घालत असताना या दोघांनीही बघ्याची भूमिका घेतली. कर्मचाऱ्यांच्या नावाखाली बिनधास्तपणे खाजगी वाहने आतमध्ये सोडण्यात आली. या दोन्ही अधिकाऱ्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. मुख्यालयात आलेल्या नागरिकांची नोंद नाहीअविश्वास ठरावाच्या वेळी मुख्यालयात आलेल्या नागरिकांची नोंद ठेवण्यात आली नाही. आतमध्ये येणाऱ्या नागरिकांची बॅग व वाहनांची तपासणी केली जात नव्हती. पोलीस रीतसरपणे परवानगी मागणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवित होते. आतमध्ये आलेल्यांची नोंदच ठेवली नसल्यानेही सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.