शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ऐरोलीतील नाट्यगृहाच्या भूखंडाचा झाला तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 23:47 IST

सहा वर्षे काम बंद; ५४ कोटी ४६ लाखांची फेरनिविदा

नवी मुंबई : ऐरोली सेक्टर-५ येथील नाट्यगृहासाठी आरक्षित मोकळ्या भूखंडावर गेल्या ६ वर्षांपासून बांधकाम करण्यात न आल्याने, आता त्या भूखंडाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वीच्या ठेकेदाराच्या आडमुठे धोरणामुळे ही वास्तू ठरावीक कालावधीत उभारण्यात महापालिकेच्या संबंधित विभागाला सपशेल अपयश आल्याचे ऐरोलीकरांना नाट्यगृहासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.नवी मुंबई महापालिकेचे वाशीत विष्णुदास भावे हे एकमेव नाट्यगृह आहे.या नाट्यगृहाबरोबरच ऐरोली परिसरातही एक नाट्यगृह असावे, यासाठी पालिकेने सहा वर्षांपूर्वी अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्याच्या कामाला सुरुवात केली. ऐरोलीच्या मध्यभागी सेक्टर ५ येथील भूखंड क्रमांक ३७ वर २८९३.२९ क्षेत्रफळावर हे नाट्यगृह उभारले जात आहे. २०१४ मध्ये नाट्यगृहाच्या उभारणीला मे. महावीर रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनीने सुरुवात केली. बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खड्डा खोदला. मात्र, त्यानंतर आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगत कंत्राटदाराने पुढे या नाट्यगृहाचे काम केलेच नाही. पालिकेने सहा वेळा नाट्यगृहाच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या. प्रतिसाद न मिळाल्यामुळे सहा वर्षे काम रखडले आहे.दोन मजल्याचे हे नाट्यगृह बांधण्यासाठी सहा वर्षांपूर्वी दोन ३३ कोटी रुपयांचा प्रस्ताव होता. आता चार मजल्याचे नाट्यगृह बांधण्यात येणार असून, त्यासाठी ५४ कोटी ४६ लाख रुपयांची ऑनलाइन फेरनिविदा मागविली आहे. येत्या दोन वर्षांत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.- गिरीश गुमास्ते, कार्यकारी अभियंता, ऐरोली विभागया खड्ड्यात दोन वर्षांपूर्वी एका महिलेने मुलासहित आत्महत्या केली. त्यानंतर, आणखी एका महिलेनेने आत्महत्या केली. यावरून नाट्यगृहाच्या जागेवर असलेल्या खड्ड्यांची खोली लक्षात येते. नंतर त्या ठिकाणी चारही बाजूने ठिकठिकाणी पत्रे लावण्यात आले आहेत.- संजय शेळके, अध्यक्ष, माऊली व्यापारी संकुल, ऐरोली