शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

नाट्यगृह रखडविण्याचे नाटक

By admin | Updated: March 3, 2016 02:52 IST

ऐरोलीमध्ये ५४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नाट्यगृहाचे काम रखडविण्याची नाटकबाजी सुरू आहे. काम पूर्ण करण्याची मुदत संपत आली तरी अद्याप पाया भरण्याचे कामही पूर्ण झालेले नाही

नवी मुंबई : ऐरोलीमध्ये ५४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नाट्यगृहाचे काम रखडविण्याची नाटकबाजी सुरू आहे. काम पूर्ण करण्याची मुदत संपत आली तरी अद्याप पाया भरण्याचे कामही पूर्ण झालेले नाही. गतवर्षी अर्थसंकल्पात १५ कोटी ९६ लाख रुपयांची तरतूद केली, पण प्रत्यक्षात ३८ लाख रुपयांचेच काम केले असून पुढील वर्षीसाठीही फक्त १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नवी मुुंबईमध्ये विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागांमधील कामे रखडविली जात असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक करू लागले आहेत. ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये असताना त्यांच्या प्रभागात तब्बल ५४ कोटी रुपये खर्च करून नाट्यगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१४ मध्ये नाट्यगृहाचे काम सुरू केले होते. एका वर्षामध्ये काम पूर्ण होणे आवश्यक होते, परंतु प्रत्यक्षात मात्र एक वर्षापासून काम ठप्प झाले आहे. महानगरपालिकेने २०१३ मध्ये २९ लाख ३७ हजार रुपये खर्च केले होते. पुढील २०१४ मध्ये ११ लाख ७७ हजार रुपये खर्च केले. गतवर्षी अर्थसंकल्पामध्ये तब्बल १५ कोटी ९६ लाख रुपयांची तरतूद केली होती. परंतु डिसेंबरपर्यंत फक्त ३८ लाख रुपये खर्च झाले आहेत. महापालिका निवडणुकीनंतर येथील काम थांबविण्यात आले आहे. मढवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे हे काम थांबविले असल्याची चर्चा ऐरोलीमध्ये सुरू झाली आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या राजकारणामध्ये ऐरोलीकरांचे मात्र नुकसान होऊ लागले आहे. महापालिकेने २०१५ - १६ च्या अर्थसंकल्पामध्येही या कामासाठी फक्त १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे यावर्षीही नाट्यगृहाचे काम रखडविण्यात येणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिका एकही प्रकल्प वेळेत पूर्ण करीत नाही. कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे कामावरील खर्च प्रचंड वाढत आहे. यापूर्वी महापालिका मुख्यालय, वंडर्स पार्क, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नेरूळ, बेलापूरमधील रुग्णालये यांचा खर्च प्रचंड वाढला होता. ऐरोलीमधील नाट्यगृहाचे काम रखडवून या प्रकल्पाचा खर्चही वाढविण्याचे षड्यंत्र सुरू असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. महापालिकेकडे पैसे नव्हते तर या कामाचे भूमिपूजन का केले, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसह वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.