शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
4
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
5
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
6
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
7
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
8
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
9
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
10
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
11
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
12
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
13
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
14
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
15
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
16
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
17
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
18
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
19
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
20
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया

नाट्यगृह रखडविण्याचे नाटक

By admin | Updated: March 3, 2016 02:52 IST

ऐरोलीमध्ये ५४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नाट्यगृहाचे काम रखडविण्याची नाटकबाजी सुरू आहे. काम पूर्ण करण्याची मुदत संपत आली तरी अद्याप पाया भरण्याचे कामही पूर्ण झालेले नाही

नवी मुंबई : ऐरोलीमध्ये ५४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नाट्यगृहाचे काम रखडविण्याची नाटकबाजी सुरू आहे. काम पूर्ण करण्याची मुदत संपत आली तरी अद्याप पाया भरण्याचे कामही पूर्ण झालेले नाही. गतवर्षी अर्थसंकल्पात १५ कोटी ९६ लाख रुपयांची तरतूद केली, पण प्रत्यक्षात ३८ लाख रुपयांचेच काम केले असून पुढील वर्षीसाठीही फक्त १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नवी मुुंबईमध्ये विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागांमधील कामे रखडविली जात असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक करू लागले आहेत. ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये असताना त्यांच्या प्रभागात तब्बल ५४ कोटी रुपये खर्च करून नाट्यगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१४ मध्ये नाट्यगृहाचे काम सुरू केले होते. एका वर्षामध्ये काम पूर्ण होणे आवश्यक होते, परंतु प्रत्यक्षात मात्र एक वर्षापासून काम ठप्प झाले आहे. महानगरपालिकेने २०१३ मध्ये २९ लाख ३७ हजार रुपये खर्च केले होते. पुढील २०१४ मध्ये ११ लाख ७७ हजार रुपये खर्च केले. गतवर्षी अर्थसंकल्पामध्ये तब्बल १५ कोटी ९६ लाख रुपयांची तरतूद केली होती. परंतु डिसेंबरपर्यंत फक्त ३८ लाख रुपये खर्च झाले आहेत. महापालिका निवडणुकीनंतर येथील काम थांबविण्यात आले आहे. मढवी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे हे काम थांबविले असल्याची चर्चा ऐरोलीमध्ये सुरू झाली आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या राजकारणामध्ये ऐरोलीकरांचे मात्र नुकसान होऊ लागले आहे. महापालिकेने २०१५ - १६ च्या अर्थसंकल्पामध्येही या कामासाठी फक्त १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे यावर्षीही नाट्यगृहाचे काम रखडविण्यात येणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिका एकही प्रकल्प वेळेत पूर्ण करीत नाही. कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे कामावरील खर्च प्रचंड वाढत आहे. यापूर्वी महापालिका मुख्यालय, वंडर्स पार्क, ठाणे-बेलापूर रोड, ऐरोली, नेरूळ, बेलापूरमधील रुग्णालये यांचा खर्च प्रचंड वाढला होता. ऐरोलीमधील नाट्यगृहाचे काम रखडवून या प्रकल्पाचा खर्चही वाढविण्याचे षड्यंत्र सुरू असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. महापालिकेकडे पैसे नव्हते तर या कामाचे भूमिपूजन का केले, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसह वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.